गुरुवार, २१ मे, २०२०


जिल्ह्यातील किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करा - मनसेची मागणी.




परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
जालना जिल्ह्यातील सर्वच किराणा दुकानदाराने विनाकारण भाव वाढून दिले आहेत त्यांची चौकशी करून परवाने रद्द करून किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करण्या बाबतचे निवेदन महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई त्यांच्याकडे ई -मेल द्वारे तक्रार केली आहे. तक्रारीत पुढे म्हटले आहे की,
जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यातील किराणा दुकानदाराने विनाकारण भाव वाढून दिले आहेत. जीवनावश्यक व इतर प्रत्येक वस्तू महागे २० ते ३०% भावा वाढ करून दिली आहे. भाव का वाढवले याचे उत्तर दुकानदार स्पष्टपणे देतात की सध्या स्टॉक नाही सगळे काही बंद आहे त्यामुळे आम्हाला मिळणारा माल वाढीव भावाने मिळत आहे. खरे तर असे काही नाही जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा आहे परंतु कमी कशी करावी कसं लुटता येईल लोकांना याचं प्रफॅक्ट ज्ञान या लोकांना अवगत आहे. खरंच किराणा दुकानदार नशीबवान आहेत लॉकडॉउन काळात किराणा दुकान चालू ठेवण्याची परवानगी सरकारने किराणा दुकानदाराला दिली आहे इतर सगळे दुकाने काही दिवसा पर्यंत बंद होते यांना योगायोगाने व्यापार करण्याची संधी मिळाली परंतु त्या संधित सुद्धा हात धुऊन घेण्याचे काम किराणा दुकानदारांनी चालू ठेवल्याले आहे जनता बिचारी फार प्रमाणिक असते एखाद्या दुकानदाराकडे एखादी व्यक्ती गेली किराणा वस्तूंची यादी दुकानदाराकडे देते आणि सर्व वस्तू घेतल्यानंतर किती बिल झाले असे विचारून बिल देऊन टाकतात दुकानदाराने वस्तू काय भावने लावल्यात हेसुद्धा लोक बघत नाहीत. किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जी शासकीय यंत्रणा काम करते अगदी कुचकामी आहे या यंत्रणेच्या काय हेतु आहे हेच लक्षात येत नाही कारण ह्या सगळ्या सर्व गोष्टी सर्रास चालू असताना जालना जिल्ह्यातील तालुक्यात तुरळक २% किराणा दुकानदार कारवाई झालेली दिसून आलेली आहे.परंतु ९८% किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या या यंत्रणेने कारवाई का केली नाही. याची सुद्धा चौकशी करून या यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी. कारण “जड हि खराब है पेड नही” या म्हणी प्रमाणे किराणा व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. यामुळे दुकानदार सर्रास गैरव्यवहार करीत आहेत.असेही दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढे असे आहे की, साखर ३७ ते ३८ किलो.गोड तेल १२० लिटर. शेंगदाणे १३० किलो. तुरदाळ, चनादाळ, मुगदाळ या दाळीमध्ये चक्क २० ते ३० टक्के वाढ.काही वस्तू मध्ये तर ५० ते ६० टक्के वाढ केली आहे त्या मध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखू. सिगारेट तंबाखूची पुडी किंमत दहा रुपये की सध्या ३० रुपयाला मिळते. सिगारेटचे खादे पाकिट ९५ रुपये किंमत असेल ते सध्या १८० रुपयाला मिळते. अशाप्रकारे जालना जिल्ह्यात किराणा दुकानदार लुटालूट करीत आहेत. जालना जिल्ह्यातील जनतेला वेठीस धरल्यामुळे किराणा दुकानदारांवर कारवाई करावी. व या की किराणा दुकानदारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणेवर निष्काळजीपणा केल्या बद्दल निलंबनाची कारवाई करावी. जेणेकरून जनतेचे पिळवणूक थांबेन या पूर्वी ही जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे किराणा दुकानदार बाबत निवेदन देऊ तक्रार करण्यात आली होती. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील किराणा दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असेही शेवटी दिलेल्या महाराष्ट्र नवं निर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...