शुक्रवार, २४ जुलै, २०२०

                          अण्णाभाऊंना भारतरत्न का मिळावा

मित्रहो
         बहुतांश पुढारी नेते अण्णाभाऊं कडे फक्त एक महान लेखक व कवी या दृष्टिकोनाने पाहतात पण याच्या पलीकडेही अण्णाभाऊंचे योगदान हे फार मोलाचे आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी येथील शेतकरी कष्टकरी कामगार यांची व्यापक चळवळ उभी केली व एक मोठा निकराचा लढा अण्णाभाऊंनी दिला लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णा भाऊंनी आपल्या पहाडी आवाजाने शाहिरी सादर करून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जनजागृती केली त्यामध्ये शाहीर शंकर भाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर शाहीर पट्टे बापूराव कुलकर्णी यांनी अण्णाभाऊंना मोलाची साथ दिली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी अण्णाभाऊंनी एक मोठा क्रांतीचा लढा या महाराष्ट्रात उभा केला व अखेर ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली 15 ऑगस्ट 1947 साली हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947 साली अण्णाभाऊंनी आझाद मैदान मुंबई येथे 20 हजार लोकांचा मोर्चा काढला व त्यामध्ये यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है ही प्रमुख घोषणा देण्यात आली अण्णाभाऊ आपल्या वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत असं म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून येथील दलित कष्टकरी कामगार यांच्या तळहातावरती तरलेली आहे बंगालच्या फाळणीनंतर बंगालची हाक हा पोवाडा लिहून अण्णाभाऊंनी मानवतेचे दर्शन या जगाला घडवलं तसेच गोवा मुक्तिसंग्राम व हैदराबाद मुक्तिसंग्राम यामध्ये अण्णाभाऊंचे अमुलाग्र योगदान आहे तसेच छत्रपती शिवबांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकात डफावरची थाप मारून गाणारे अण्णाभाऊ होते छत्रपती शिवरायांचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे अण्णाभाऊ साठे होते अण्णाभाऊ हे महान लेखक व कवी होतेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन अण्णाभाऊ हे एक थोर महान समाजसुधारक थोर महान क्रांतिकारक होते. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनातून येथील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या वरती घाव घातला व जे नायक-नायिका काळाच्या पडद्याआड गेले होते त्यांना अण्णाभाऊंनी पुन्हा जिवंत केलं अण्णाभाऊंनी ज्या प्रकारे आपल्या फकीरा कादंबरीत फकिराला जे स्थान दिलं तसेच स्थान शंकर पाटील व विष्णुपंत कुलकर्णी यांनाही दिले या भारताची संस्कृती खर्‍या अर्थाने कोणी जगासमोर मांडली असेल तर ती आण्णाभाऊंनी मांडली आहे आणि म्हणूनच भारतरत्न या पुरस्काराचे खरे हक्कदार साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हेच आहेत 2019-20 हे अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे देशभरातून अण्णाभाऊंच्या अनुयायांकडून अण्णा भाऊंना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतरत्न ची मागणी केली जाते व शासनाने या मागणीला अनुसरून अण्णा भाऊंना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन अण्णाभाऊंचा गौरव करावा अशी मी शासनास विनंती करतो

          सुरज साठे
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे
       जन्मभूमी वाटेगाव
         9370626619

रविवार, २८ जून, २०२०

जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा 02, संभाजी नगर 02, रामनगर विनकर कॉलनी 01, नरिमननगर 01,रहेमान गंज 01,आनंदनगर 03, समर्थनगर02, लक्कडकोट04,खडकपुरा 03 अशा एकुण 19 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नळगल्ली 01, संजोग नगर 01, क्रांती नगर 01,यशोधरा नगर 01, खडकपुरा 05,अंबड रोड जालना 01, मंगळबाजार 02,रहेमान गंज 15, योगेश नगर 01, सत्यनारायण चाळ 01,मस्तगड 01,दानाबाजार 10,पानशेंद्रा ता. जालना येथील 01,भारज बु ता जाफ्राबाद येथील 01, अशा एकूण 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4012 असुन  सध्या रुग्णालयात-130,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1563, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–46, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5063 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–42 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-504, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4503 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-52, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1420.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1255, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-33, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-213, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-19, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-336, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-142 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13087, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.आजसंस्थासत्मवक अलगीकरणात असलेल्या0 व्यखक्तींबची संख्या  213 असून /संस्थारनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_03,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-13,मॉडेल स्कूल परतुर-10,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-16,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-17,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 20,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय  महविद्यालय जाफ्राबाद 12.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 888 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 49 हजार 530 असा   एकुण 4 लाख 76 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना,ब्युरोचीफ :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायययोजना नियम 2020 मधील तरतुदीनुसार जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरिकांची वाहतुक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

बाजार गेवराई येथील नवतरूण शेतकऱ्यांची आत्महात्या..!


बदनापूर,ब्युरोचीफ :- बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे दिनांक 28 सकाळी 03:00 दरम्यान जोरदार पावसामुळे सदर शेतकऱ्याच्या कापुस बाजरी आदी पिके वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामुळे निराश होऊन सदर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले  व आपल्या राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले नातेवाईकांनी उपचारासाठी औरंगाबाद रूग्णालयात नेत असताना  रस्त्याच प्राणज्योत मावळली सदर शेतकऱ्यांच्या  नवतरूण शेतकरी बळीराम ज्ञानेश्वर कान्हेरे वय 24 राहात्या  दिनांक 28 संकाळी: 11:00 वाजेदरम्याण घरी असलेल्या मोनोसिल नावचे मागिल वर्षीची आणलेल्या औषध प्राशन केले सदर शेतकऱ्यांचे  वडील  अशिक्षित असल्याने सदर बळीराम हा  शेती व अथिंक  व्यवहारात हा नवतरूण शेतकरी करत होता सदर  त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे.

बदनापूर शहरासहित लागत असलेल्या गावावर पुन्हा धोधो पाऊस


नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत भर


बदनापूर,ब्युरोचीफ :-  बदनापूर शहरासह लगत असलेले गावावर पावसाचा पुन्हा मारा आज दु. 03: 45 वाजेला पावसाची सुरुवात झाली असून आधीच अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात पुन्हा पावसाचा भर पडला पुन्हा नदीनाले एक झाल्याचे चित्र निर्माण झाले शेतामध्ये पाणी साचल्याने तलावाच स्वरूप निर्माण झाले. दुधा नदीचा आणखीन ओघ वाढला तर अधिक पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडी पावसाने दिलासा द्यायला हवा जेणेकरून शेतकरी हा शेतात पेरलेल्या पिकांचं नुकसान होणार नाही अशीच चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांची गावागावातून व चव्हाट्यावर होत आहे.काळ्या आईच्या गर्भात नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत आहे.की पेरलेलं पीक उगतका नाही जमिनीतच सोडून जाते असे चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे. म्हणून तरी पावसाने थोडा दिलासा द्यायला हवा अशी ही आता चर्चाला उधाण आल आहे.

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी दिले रोहयो मंत्र्यांना निवेदन.


बदनापूर,ब्युरोचीफ:- तालुक्यातिल अतिवृषटी झालेल्या गावाना रो.ह.यो.मंत्री मा.संदीपानजी भुमरे साहेब भेट दिली अस्ता मनसे जालना जिल्हया च्या वतिने निवेदन दिले व तालुक्यातिल सर्व शेतकरया चे नुक़सान झालेली माहीती सांगीतली व मंत्री महोदयानी पूर्ण निवेदन वाचले व उद्याच्या क़ॅबीनेट मधे ही सर्व माहीती देउन तत्क़ाळ मदत जाहीर करतो या  दौरया वेळी सोबत मा. माज़ी मंत्री सन्नमांनिय अर्जुनरावजी भाऊ खोतकर ,आमदार नारायणरावजी कुचे साहेब,मा.आमदार संतोष जी सांबरे साहेब ,शिवसेना जिल्हा प्रमुख मा.भास्कररावजी अंबेकर साहेब,जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे साहेब,मनसे चे ज़िल्हाध्यक्ष गजानन गिते ,कॅाग्रेंस चे जेष्ट नेते भिमराव जी आबा डोंगरे साहेब , भानुदासरावजी घुगे नाना,सभापती जयप्रकाश दादा चव्हान ,भाऊसाहेबजी पाऊलबुधे ,सरपंच राजुबापू जर्हाड,शिवसेना तालुका संघटक नंदुभाउ दाभाडे,बालाभाऊ परदेशी,निव्रती महाराज डाके,शेतकरी संघटनेचे संतोष आबा चव्हान,राष्ट्रवादी चे नारायण राव अवघड़,शिवाजीराव कराड़ ,मनसे चे गोविंद काळे,तहसीलदार छ्याया ताई पवार ,व शासन प्रशासनातील सर्व अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते व पत्रकार बांधव उपस्थित होते..


जालना औरंगाबाद रोडवर सारथी पेट्रोलपंप समोर बाप लेकाचा अपघात


बापचा जाग्यावर मृत्यू तर मुलगा जखमी.

बदनापूर ब्युरोचीफ :- बदनापूर मधील पाडळी येथील साधारण कुटुंबातील आप्पा लक्ष्मण सिरसाठ व परमेश्वर आप्पा साहेब सिरसाठ हे दोघे बाप लेक जालना औद्योगिक वसाहतीत रुपम स्टील कंपनी मध्ये अनेक वर्षांपासून मजुरी कामानिमित्त दुचाकीवरून जाय ये करत असे परंतु  काल काळाने घाला घातला आणि होत्याच नव्हतं झाल.
  दि.27: वार शनिवार रोजी दोघे बाप लेक कामा वरून घराकडे येत असताना सायंकाळी 8:00 वाजता  औरंगाबाद- जालना रोडवरील महिको कंपनी च्या लगत असणारा सारथी पेट्रोपम वर दुचाकीत पेट्रोल टाकून निघाले आणि काही हाकेच्या आंतरावर हावे रोड वरती अचानक पाठीमाघून येणाऱ्या अनोळखी गाडीने धडक दिली त्यात  अप्पासाहेब लक्ष्मण सिरसाठ यांना डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर  अवस्थेत जाग्यावर मृत्यू झाला तर मुलगा परमेश्वर आप्पासाहेब शिरसाट हा  जखमी अवस्थेत असताना जालना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
अप्पासाहेब लक्ष्मण शिरसाट यांना जालना सिविल हॉस्पिटल  येथे दाखल करण्यात आले परंतु डॉ यांनी मृत्यू झाले असे सांगितले येथे पीएम करण्यात आले असता दि.28 रोजी आज सकाळी 11:30 वाजता पाडळी गावी येथे त्यांच्या पार्थिवर अंतिम संस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी दोन सुना आहे..
तर संपूर्ण पाडळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...