रविवार, २८ जून, २०२०

बदनापूर शहरासहित लागत असलेल्या गावावर पुन्हा धोधो पाऊस


नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत भर


बदनापूर,ब्युरोचीफ :-  बदनापूर शहरासह लगत असलेले गावावर पावसाचा पुन्हा मारा आज दु. 03: 45 वाजेला पावसाची सुरुवात झाली असून आधीच अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात पुन्हा पावसाचा भर पडला पुन्हा नदीनाले एक झाल्याचे चित्र निर्माण झाले शेतामध्ये पाणी साचल्याने तलावाच स्वरूप निर्माण झाले. दुधा नदीचा आणखीन ओघ वाढला तर अधिक पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडी पावसाने दिलासा द्यायला हवा जेणेकरून शेतकरी हा शेतात पेरलेल्या पिकांचं नुकसान होणार नाही अशीच चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांची गावागावातून व चव्हाट्यावर होत आहे.काळ्या आईच्या गर्भात नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत आहे.की पेरलेलं पीक उगतका नाही जमिनीतच सोडून जाते असे चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे. म्हणून तरी पावसाने थोडा दिलासा द्यायला हवा अशी ही आता चर्चाला उधाण आल आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...