बुधवार, २५ मार्च, २०२०

जालना जिल्ह्यात बंदनापुर तालुक्यातील उज्जैनपुरी ग्रामस्थांनी                  कुंपण टाकून गावचा रस्ता केला बंद.
बदनापूर प्रतिनिधी:-कोरोनाची दहशत ही जगभर पसरली आहे.जालना जिल्ह्यात बंदनापुर तालुक्यातील
उज्जैनपुरी येथे येत्या दोन दिवसांत येऊन ठेपलेली यात्रा अखेर रोकडोबा महाराज यात्रा एक मताने ठराव पास करुन रद्द करण्यात आली आहे.बदनापुर तालुक्यातील उज्जैनपुरी ग्रामस्थांनी कुंपण टाकून गावचा रस्ता बंद केला आहे.  बाहेरच्या लोकांना गावात बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील लोकांनी बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्तींनी आत येण्यास मज्जाव केला आहे.कोरोना पार्श्वभूमीवर उज्जैनपुरीत बाहेरुन येणार्यास केली गाव बंदी... एक मताने ठराव पास करून केली गाव बंदी. रोकडोबा महाराज यात्रा रद्द करुन  गावकऱ्यांकडून बंदी केली कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर उज्जैनपुरी गावात बाहेरून कुणीही येनार नाही गावातून बाहेर जायचे नाही रोज गावात दवंडी पिठवली जात आहे.. नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाई करण्यात येईल, याप्रकारे ग्रामसेवक सरपंच गावकरी मंडळी रोज त्याचा परिने कोरोना जन जागृती  करून राहून गाव बंदी केली जात आहे. या गावांत रोकडोबा महाराज यात्रा निमित्त पुणे मुंबई या ठिकाणी वरुन भाविक दर्शनासाठी येतात कोरोनाचा पार्श्वभूमी भाविक गावात येऊ नाही यासाठी गाव बंदी केली आहे  असे सरपंच कैलास शिदे जगनाथ शिदे  विष्णू शिदे मलका र्मालकर्जुन गालट बाबासाहेब शिदे  भिका जाधव बाबुराव शिंदे प्रदीप मुळे सुरेश मुळे  यासह   गावकऱ्यांनी सांगितले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...