बुधवार, २५ मार्च, २०२०


कोरोनातून वाचला परंतु भूकबळी मेला...
बंद काळातील हातावरील मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना किमान १०००० हजार रुपये अर्थ सहाय्य
द्या- अँड.संदीप ताजणे
बहुजन समाज पार्टी च्या वतीने मागणी. मुख्यमंत्री महोदयांना निवेदन
जालना प्रतिनिधी :-फुले ,शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात असे होवू नये म्हणून ज्यांचा ऊदरनिर्वाह दैनंदिन कष्टावर आधारित आहे़ अशा कष्टकरी असंघटीत ( शेतमजूर, बांधकाम करणारे, रिक्षावाले, टक्सीवाले, भटकंती करणारे)मजुरांना
लॉकडाऊनच्या कालावधीत दहा हजार रुपये द्यावेत अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांनी मुख्यमंत्री ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे. अधिक माहिती अशी की,राज्य सरकार तथा सरकारने ही २१ दिवसा पर्यंत संपूर्ण देशा सह राज्यात लॉक डाऊन घोशीत केले आहे .आपन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या स्तरावर कोरोना  संसर्गाला रोखण्यासाठी उपाय - योजना आखल्या आहे या राज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी भूषणावह असुन त्या तंतोतंत राबविल्यास कोरोनाच्या विरोधातील या लढाईमधे आपणास नक्कीच विजय प्राप्त करता रोईल . मात्र ज्या लोकांना आपल्या घरात राहण्याचे आदेश केले आहेत.त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह दररोज काम केल्याशिवाय शक्य नाही आशा कामगार शेतमजूर, हातगाडीवाले बिगारी, टॅक्सीवाले,रिक्षावाले, बांधकाम कामगार, यांच्यासह असंघटित सबंधित क्षेत्रातले असलेली सर्व मजूर पुढील एकवीस दिवसापर्यंत उपासमारीची परिस्थिती ओडल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाने वाचला आणि भुकेने मेला अशी परिस्थिती आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात येऊ नये.याकरिता वरील सर्व हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना त्यांच्या कुटुंबांना शासनाने १०,००० हजार रुपये मानधन लॉक डाऊन काळात द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही व तसेच शासकीय धान्य, वितरण प्रणाली मार्फत वाटायचे धान्य प्रत्येकाच्या घरी पोचल्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी च्या वतिने या निवेदनात केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...