बुधवार, २५ मार्च, २०२०

   बाजारातील गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा नविनऊपाय
जालना/ प्रतिनिधी:- कोरोणाचा विषाणूचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसाचा लाॕक डाऊन संपूर्ण देशामध्ये लागू केल्यानंतर राज्य सरकार व जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जालना शहरातील सर्व नागरिकांना आपापल्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तरीपण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सूट दिलेली आहे म्हणून बरेच नागरिक अशा वस्तू खरेदीसाठी बाहेर निघत आहेत व गर्दी करताना दिसून येत आहेत. म्हणून जालना शहरातील लतीफ शहा बाजार येथे काही जागरूक नागरिकांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून पोलीस प्रशासनासमोर काही मुद्दे मांडले असता त्यातून असा मार्ग काढण्यात आला आहे की, येथील लतिफ शहा बाजार येथील जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने उघडी आहेत परंतु त्यावर गर्दी होऊ नये म्हणून सकाळी ६:०० (सहा) ते दुपारी १२:०० (बारा) वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५:००(पाच) वाजल्यापासून ते ७:३० (साडेसात) वाजल्या पर्यंत ह्या जीवनावश्यक वस्तूंची गर्दी न करता नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे भान ठेवून व कोरोना विषाणू बाबतच्या सर्व सूचनांचे पालन करून ह्या वेळेतच खरेदी करावी असे ठरवण्यात आले आहे.यावेळेस साह्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार साहेब, हेडकॉन्स्टेबल कैलाश जवळे, नाईक कॉन्स्टेबल रमेश राठोड, पो.खरात तसेच  अख्तर लिडर, उस्मान नेता, आयुब खान साहब, नगरसेवक अमीर पाशा ई. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...