शनिवार, ९ मे, २०२०

     10 मे रोजी जालना शहराच्या हद्दीमध्ये संचारबंदी
      जिल्हाधिकारी रविंद बिनवडे यांचे आदेश जारी.
      

जालना,प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात लॉकडाउनमुळे  अडकलेल्या उत्तर प्रदेशातील कामगारांना जालना जिल्ह्यातून उत्तरप्रदेश राज्यात विशेष श्रमिक ट्रेनने उद्या दि.10 मे 2020 रोजी पाठविण्यात येणार असून त्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(३) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून दि. 10 मे 2020 रोजी सकाळी 10:00 ते साय. 6:00 वाजेपर्यंत जालना शहरातील हद्दीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.  या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा, रुग्णालय, दवाखाने, औषधाची दुकाने, व उत्तर प्रदेश या राज्यातून मजूर किंवा कामगार ज्याना संबधीत तहसीलदार यांचे मार्फत ऑफलाईन पासेस निर्गमित केलेले आहेत या व्यक्ती तसेच अत्यावश्यक सेवेतील पास किंवा परवाना दिलेल्या व्यक्ती यांना सुट राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...