गुरुवार, २ एप्रिल, २०२०

भुकेने व्याकुळ नागरिकांच्या मदतीला न्यायदेवता ही सरसावली
                           बीड हॅलो रिपोर्टर चा दणका
बीड हॅलो रिपोर्टर च्या बातमीची न्यायमूर्ती ने घेतली दखल.

नांदेड (भगवान कांबळे ):-  कोरोना सारख्या
महामारीत संपूर्ण भारतभर लॉक डाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबाची हेळसांड होत होती त्यावेळी हॅलो रिपोर्टर मध्ये दि.31 मार्च  2020 रोजी भोकरमध्ये १५० मजुरांची लॉकडाऊनमुळे फरफट;पोटापाण्याचा प्रश्न बनतोय गंभीर हि बातमी प्रकाशित करण्यात आली होती. व त्या बातमी ची दखल घेऊन भोकर येथील न्यायदेवतानी  गरजू लोकांच्या मदतीला उतरलेली दिसून आली.
  बूधवार दिनांक 1एप्रिल   रोजी भोकर शहरात बाहेरील जिल्ह्यातून येऊन उपजीविका करणारे व मोलमजुरी करणारे असंख्य नागरिक तंबू ठोकून असल्याचे व त्याची उपासमार होत असल्याचे दिसून आल्यावरून भोकर येथील जिल्हा न्यायाधीश

श्री मुजीब शेख यांनी अशा 35 ते 40 गरजू कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना एक आठवडा पुरेल एवढे तांदूळ, गहू, तेल, साखर, तुरदाळ, चहापत्ती, बिस्कीटचे पुडे, अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मानवतेचा संदेश दिला आहे. भोकर शहरातील बटाळा रोड,उमरीरोड,किनवट रोड, नांदेड रोडवरील मोलमजुरी करून नागरिक असल्याची कुणकुण न्यायाधीश महोदयांना लागताच त्यांनी तात्काळ आपला ताफा घेऊन प्रत्यक्ष तंबू ठोकून असलेल्या मजूरा पर्यंत जाऊन त्यांना मदत दिल्याने मजुरी करून जीवन जगणाऱ्या नागरिकांचे डोळे पाणावले होते, प्रत्यक्षात न्यायदेवता आमच्या घरी येऊन आम्हाला न्याय दिल्याची भावना अनेक नागरिकांनी हॅलो रिपोर्टर शी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी न्यायाधीश श्री मुजीब शेख यांच्यासोबत  न्यायाधीश श्री पांडे सर, तहसीलदार मुंढेसर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजभारे मॅडम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
या देशातील आम्ही पूर्वीचे राज्यकर्ती जमात 
                    मास राजाभाई सूर्यवंशी
                   🙏M🙏A🙏S🙏S
आमच्या कुळातील राज्यांनी या देशावर राज्य केलं आणि अनेक राजवाडे उभे केले ह्या देशाच्या आठ संस्थानांमध्ये मातंग कुळाचे राज्य होते आणि कालांतराने ही राज्यकर्ती जमात देशोधडीला लागले आहे  आज तुम्ही राजवाड्यात तर राज्य करू शकत नाही परंतु मातंग समाजाच्या हिताचे काम करून मातंग समाजाच्या मांगवाड्यात मांग वाड्यातील मांगाच्या हृदयावर राज्य नक्कीच करू शकता
राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये येल्या  मांग सर्जा मांग व अनेक मांग  जातीतील शूरवीर योद्धे गड किल्ल्याचे संरक्षण करायचे
तुम्ही आजच्या युगामध्ये कमीतकमी मागांचे व मांगवाड्याचे तर संरक्षण करा
देश (संस्थान) स्वातंत्र्य व  रक्षणासाठी अनेक देशभक्त घडवले क्रांतिकारक निर्माण करून पारतंत्रा तुन स्वातंत्र्य मिळऊन दिले   व महिलाना तसेच दलितांना शिक्षण  मिळऊन देण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी स्वरक्षण व शिक्षणाची चळवळ चालवली ते आपले क्रांतिपिता वीर लहुजी साळवे
 किमान त्यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून तरी समाज हिताचे काम केले पाहिजे मला माहिती आहे आताच्या युगात  तुम्ही इतर जातिधर्मातील क्रांतिकारक घडवू शकत नाही शैक्षणिक क्रांती घडऊ शकत नाही
 परंतु मातंग जातीतील अनेक युवकानं मध्ये शिक्षणाची आवड निर्माण करू शकता  मातंग युवक वीर योद्धा जातीसाठी माती खाणारे तुम्ही निर्माण करू शकता या जातीय गुलामीतून मुक्त करू शकता या  जाती  जाती च्या उतरंडीतून होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोध बंड करण्याची उर्मी समाजातील युवकांन मध्ये तुम्ही  निर्माण करून आज ही या देशा मध्ये आपले  स्वतःचे अस्थित्व आहे हे प्रस्थापित व्यवस्थेला दाखऊ शकता
वीर फकिराने इंग्रजांचा खजिना लुटून या देशातील सर्व वंचित घटकांच्या पोटाची खळगी भरली
 अमिरो को लुटताय और गरिबोको बाटताय  आमचा हा फकिरा अर्थातच इंग्लिश भाषेतील  रोबिंहूड ज्याने मरणाऱ्या माणसांना जगवलं शब्दाला जगला व वचनावर मेला
 तुम्ही ही इथल्या काळ्या  इंग्रजांचा अर्थात शासनाचा  सरकाराचा जो काही आपल्या हक्काचा खजाना ठेवला आहे तो लुटून मांग समाजाच्या पदरात टाका त्यांच्या पोटा ची खळगी भरा
 साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांनी या भारत देशातील नव्हे तर ह्या विश्वातील शेतकरी कष्टकरी कामगार व वंचित उपेक्षित घटकाचे जगणे कसे असते त्यांच्या व्यथा जगाच्या पटलावर मांडले.. या सर्व उपेक्षित घटकाचे प्रतिनिधीत्व एका पदतीने आपल्या साहित्याचा रूपाने केले आहे.
माझ्या समाज बांधवानो तुम्ही या देशातील सर्व उपेक्षित घटकांना नक्कीच न्याय देऊ शकता परंतु सध्या घडीला तुम्ही या शासन दरबारी मांग  मातंग समाजाचा व्यथा जरी मांडले तरी, मांग जातीतील लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि तुम्हाला देखील एक मानसिक समाधान मिळेल की किमान मी माझ्या  समजा साठी काय तरी केल..... 
वरील सर्वच महापुरुष हे समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी व देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपलं जीवन  चंदना सारखे झिजवले आणि आपल्याला हा जगण्याचा सुगंधित मार्ग दिला*
 माझे सर्व मातंग समाजातील बांधवांना भगिनींना विनंती आहे की आपण किमान (मांग) मातंग जातीसाठी तरी काम केलं पाहिजे*
मास राजाभाई सूर्यवंशी
🙏M🙏A🙏S🙏S
वंचित बहुजन आघाडीचा वतीने कोरोना पार्श्र्वभूमीवर विविध उपक्रम राबविण्यात येणार-दिपक डोके
रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार व अन्नदान  वाटप
जालना(प्रतिनिधी) :-सध्या कोरोना
विषाणुच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीमुळे गोर गरीब जनतेचे हाल होत असुन मोठ्या प्रमाणावर उपासमार होत आहे.बहुजन वंचित आघाडी या गोर गरिबांच्या मदतीसाठी पुढे आली असुन पक्षाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय मदत कार्याचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार वाटप करण्यात आले आहे.
 कोरोना व्हायरस मुळे अखंड देश चिंतेत आहे प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी जिल्हाबंदी,संचारबंदी लागू केल्यामुळे बांधकाम मजूर
भुमिहिन शेतमजुर तसेच एका वेळेच्या भाकरीवर
जगणाऱ्या लोकांचे जीवन कठीण बनले आहे.या गोर गरीब नागरिकांची रोजंदारी बंद झाल्याने रोजी रोटीचा प्रश्न भेडसावत आहे अशा या नागरिकांची बंद काळात  योग्य ती सोय व्हावी  यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शक्य होईल त्या प्रमाणात मदत कार्यात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मदत करण्याचा उपक्रम हाती घेत रेल्वे स्टेशन परिसरातील गरजुंना उल्पआहार वाटप करण्यात आला आहे.यामुळे संचारबंदी काळात नागरिकांना मोठी मदत झाली.शासनाने घेतलेल्या खबरदारीच्या निर्णयाप्रमाणे व सर्व सुचनांचे पालन करत वंचित बहुजन आघाडीची टिम हे मदतकार्य करत आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दिपक डोके, अशोक खरात, अकबर इनामदार, विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, विनोद दांडगे, कैलास रत्नपारखे, रमाबाई होर्शिळ, मैनाबाई खंडागळे, बाळासाहेब रत्नपारखे, राहुल भालेराव, दिपक रत्नपारखे, अर्जुन जाधव, संतोष आढाव, अनिल झोटे, गौतम वाघमारे, किशोर जाधव,खाजा खान,लखन चित्तेकर, राहुल रत्नपारखे,शिध्दु कनकुटे, विकास लहाने, संतोष मगर, अरविंद होर्शिळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मदत कार्य करीत आहेत.

बुधवार, १ एप्रिल, २०२०

        गोरगरीबांना हक्काचे तीन महिन्याचे राशन सुरक्षीत                        ठेवून,आपातकालीन मोफत अन्नधान्य वाटप करावे.
ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॕन्ड एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांचे शासनास निवेदन.
जालना, प्रतिनिधी :- कोरोना विषाणुच्या
पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लाॕक डाऊन असल्या मुळे रोजंदारीवर मजूरी करणारे मजूर,कामगार,छोटा व्यवसाय करून पोट भरणारे,तसेच भटकंती करून ऊदरनिर्वाह करणारे यांच्या रोजीरोटीचा फार बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थीतीमध्ये सर्वांना राज्यशासनाकडून अन्नधान्यामध्ये आपत्ती काळातील विशेष पॕकेज देण्यासंबंधीची मागणी ह्युमन चाईल्ड वेलफेअर अॕन्ड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील विशिष्ट
आपातकालीन परिस्थिती विचारात घेता, लक्षनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यानां तीन महीन्यांचे धान्य एकत्रीतपणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, म्हणजे एप्रिल,मे व जून २०२० या तीन महिण्याचे अन्न धान्य वितरीत करण्याचा आदेश व निर्णय राज्य शासन घेतला आहे.आपातकालीन परिस्थीतीत घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे.परंतू आज लॉकडाऊन मुळे लाखो
मजूर,कामगार,रोजदारीने काम करणारे लोक आणि मध्यमवर्गीय कुटुंब सुध्दा आर्थिक अडचणीत अडकलेले आहेत.
अशा लोकांवर भूकमरीची वेळ आलेली आहे.
 आपण एप्रिल,मे व जुन महीन्याचा आगोदर धान्य देऊन आपातकालीन परिस्थीत त्यांना संभाळत आहे. त्यांच्याच शिधा कोठ्यातून आगोदर धान्य देत आहेत. परंतू में, व जून महिन्यात त्या लोकांना
पुन्हा उपासमारी व भुकमरीची वेळ येईल, कारण की त्यांच्या आगोदर महिण्याचे शिल्लक धान्य आपातकालीन परिस्थीत वाटप करुन शासन त्यांच्या हिश्शाचे आहे तेच वाटप करीत आहे.
म्हणून एप्रिल,मे जुन २०२० चा साठा देण्या एवजी,त्याःचा साठा सुरक्षित ठेवून आपातकालीन धान्य गोरगरीबानां जिल्हा अधिकारी व प्रशासन अधिकाऱ्यांच्या देखरेखीत मोफत वाटप करावे,झोपड्पट्टी भागात व गोरगरीब लोकांकडे
अजूनही शिधा पत्रक नाहीं, ऑनलाइन दुरुस्त्या झालेले नहीं, या परिस्थीत खुलेपणे आपातकालीन धान्य राज्याच्या गोरगरीब जनतेला वाटप करण्यात यावे.म्हणजे पुढील मे व जुन महिन्यात त्या लोकांना त्यांचे हक्काचे धान्य
सुरक्षित राहीन.
  ह्युमन चाईल्ड वेलफेअर अँन्ड एज्युकेशन सोसायटी,जालना चे अध्यक्ष अब्दुल रफीक अ.रशीद यांच्या वतीने राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांना अश्या आशयाचे एक निवेदन पर पत्र पाठविण्यात आले. त्यांच्या ह्या निवेदनाची मा.राज्यमंत्री छगन भुजबळ साहेबांनी दखल घेतली तर राज्यातील गोरगरीब जनतेला नक्कीच फार मोठा आधार मिळणार आहे.म्हणून सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
             आरोग्य दुत यांच्याकडून जनजागृती
जालना (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत असून प्रत्येक गाव
१००% लोकडाऊन करण्यात येत आहे,याच पारश्वभूमीवर दरेगाव,रामनगर,जळगाव, ममदाबाद,मनेगाव, निरखेडा तांडा या ठिकाणी क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आरोग्य दुत यांची नेमणूक करण्यात आली असून हे गावात लोकांमध्ये कोरोना विषाणू विषयी जनजागृती करत आहेत.
     कार्यात गावातील नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जनजागृतीच्या या कामात बचत गटाच्या महिला मागे नाहीत.
आरोग्य दुत व गावातील तरुण मंडळी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन गावात जनजागृती करून गाव १००% बंद करत आहे कोणीही रस्त्यावर किंवा गावात फिरताना दिसत नाही यामध्ये स्टिकर,बॅनर,व दवंडी याचा वापर करून गावात जनजागृती करण्यात येत आहे तसेच गरीब कुटुंबाला मदत करत आहे. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष विष्णु
 पिवळ, आरोग्य दुत उषा शिंदे, गजानन गाढे,भागवत वराडे, सुनीता जाधव, अदी कार्य करत आहे.
औरंगाबाद हुन नांदेड ला पायी जाणाऱ्यांची जेवणाची व्यवस्था....
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) कोरवणाच्या
धास्तीने औरंगाबाद येथे कामानिमित्त राहत असलेल्या तीन जणांना औरंगाबाद हुन नांदेड कडे पायी जात असलेल्या तीन व्यक्तीला  जालना तालुक्यातील रामनगर येथील शकील शेख, निसार मौलाना यांनी जेवणाची व्यवस्था केली.
कोरोना संचारबंदीच्या काळात एलपीजी गॅसची कमतरता भासणार नाही
जालना, प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा
प्रार्दुभाव रोखण्यासाठी सध्या लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात आयओसी / बीपीसी / एचपीसी सारख्या तेल विपणन कंपन्या ग्राहकांना अत्यावश्यक सेवा म्हणजेच एलपीजी पुरवित आहेत. ग्राहकांना घरांमध्ये एलपीजीची गॅस ची कमतरता भासणार नाही आणि प्रत्येक घरातील सिलिंडर वितरित व्हावेत यासाठी आमची सर्व वितरक (Distributor) आणि वितरक नेटवर्क अथांग प्रयत्न करीत आहेत जेणेकरून ते त्यांच्याघरात सुरक्षित राहतील. असे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड डीएनओ यांनी जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
  या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद करण्यात आले की,आम्ही आमच्या ग्राहकांना एसएमएस संदेश, सोशल मीडिया इत्यादी माध्यमातून सांगत आहोत की ग्राहकांची सुरक्षा हीच आपली मुख्य चिंता आहे, त्यांना घरी रहाण्याची गरज आहे आणि आम्ही त्यांच्या घरी सिलिंडरचे वितरण करू. रोकड / पैसे हाताळणी टाळण्यासाठी त्यांनीऑनलाईन तसेच ऑनलाईनबुक करुन ऑनलाईन पेमेंट करावे. एलपीजीला आवश्यक वस्तूखाली येत नसल्याने लॉकडाऊन स्थितीतून सूट दिली गेली आहे . आमचे सर्व वितरक कर्मचारी, गोडाऊन कीपर, मेकॅनिक आणि डिलिव्हरी बॉय या लॉक-डाऊन कालावधीत आणि त्याच्या पलीकडे सर्व ग्राहकांना विनाव्यत्यय एलपीजी सिलिंडर्सचा पुरवठा संकटाच्या काळात तयार ठेवतात.
  कोविड -19 चा धोका आमच्या वितरणातील सर्व कर्मचार्यांना, एलपीजी प्लांटमधील ट्रान्सपोर्टर्स आणि कंत्राटदारांना लागू आहे. अशा प्रकारे, मृत कर्मचार्याच्या जोडीदाराच्या कोव्हीड– 19 च्या खात्यावर लाइफ कव्हरेजची तरतूद रू. पूर्व अनुदान रक्कम 500000/- इतकी देय रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकारने एप्रिल ते जून 2020 या कालावधीत सर्व उज्ज्वला ग्राहकांसाठी कोविड – 19 च्या कालावधीत विनामूल्य एलपीजी गॅस देणे जाहीर केले आहे. ही देय रक्कम उज्ज्वला लाभार्थींच्या रिफिलच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी रक्कम. या योजनेंतर्गत 88569 उज्ज्वला लाभार्थ्यांना जालना जिल्ह्यात फायदा होईल..चला कोविड - 19विरूद्ध लढा देण्याच्या राष्ट्रीय कार्यात सामील होऊ या आणि गरिब आणि गरजू लोकांना समाज म्हणून मदत करू आणि आपले योगदान देऊ. चला सरकारने वेळोवेळी दिलेल्या कोविड - 19च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करू आणि इतरांनीही तसे केले आहे याची खात्री करुन घेऊया.घरी रहा सुरक्षित रहा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी कळविले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...