शनिवार, २८ मार्च, २०२०

जगाच्या विनाशाला चीन जबाबदार आहे ? कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग चिंतेची बाब - चंद्रकांत कारके

      आणूबाम्ब हल्ल्याची भिती कमी होते न 
 होते तोच, किटाणू बाम्ब, बिषाणू, जैविक हल्ल्याची भिती जगासमोर आ करून उभी आहे. त्यातल्या त्यात आज कोरोना रोगा ची प्रचंड दहशत. जगात आज या कोरोना विषाणू मुळे 26 हजार निश्पाप मानसांचे बळी गेले आहेत. आणि दिवसेंदिवस यात वाढ होत  आहे. हा संसर्ग जन्य रोग असल्यामुळे रुग्नांची संख्या गुणाकाराप्रमाणे वाढत आहे. त्यातल्या त्यात कोरोना रोगांवर कोणतेही 
औषध/लस ही उपलब्ध नाही. दहशत निर्माण होऊन, जगात या भयंकर महामारीमुळे हाहाकार माजला आहे
       अशा संकट समयी मनात एक विचार आला, हा कोरोना रोग आला कोठून ? उत्तर शोधतांना पटकन तोंडावर नाव येते ते चीन या देशाचे. मागिल काही महिण्यात आपण म्हणायचो, हा रोग चीन या देशाचा आहे, तिथली मानस काहीपण खातात. साप,अजगर,इंचू, उंदीर, वटवाघूळ, वेगवेगळ्या प्रकारची किडे - मकोडे, यांच्यापुढे जाऊन डुक्कर, गाढव, कुत्री-मांजर, ज्यांचा आपण विचार देखील करून शकत नाही असे प्राणी ते खातात यामुळे त्यांना हा भयंकर रोग झाला असावा.
                 मात्र चित्र काही वेगळंच दिसायला लागलं, मागील नोव्हेंबर महिन्यचा काळ असेल, चीन मध्ये पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळला आणि इलाजादरम्यान तो मुत्यु हि पावला, दिवसेंदिवस हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तिला होत होता, आणि रूग्न वाढतच होते, ज्या डॉक्टराला या भयंकर रोगाची माहिती होती त्या डॉक्टराचे नाव लिव ओन लिबलान असे काही, या डॉक्टरालाही इलाजादरम्यान संसर्ग होऊन त्याचा यातच मृत्यू झाला असे सांगतात, त्या डॉक्टर ने काही सोसीयल मिडीयावर काही ट्विट केले होते, या नंतर एक दुसरी महिला डॉक्टर जिचे नाव आयफाईन हिला ही याची कल्पना आली होती, मात्र  तीलाही शांत बसवण्यात आले. कही आंतरराष्ट्रीय मीडिया व अमेरिकेच्या तर्कानुसर असा आरोप केला जात आहे की, या कोरोनांचा संसर्ग झालेल्या डॉक्टराला हे सर्व माहित होते, हे जगाला सांगण्या आधीच त्याची हत्या करण्यात आली, त्यानी केलेले ट्विट डिलीट करण्यात आले, हा भयंकर महामारीचा कोरोना विषाणू चा रोग माहित असतांना चीनने हे जगाला सांगितले नाही. हि माहिती लपवून ठेवली.चीन कडे दोन जागतीक आगळ्यावेगळ्या प्रयोग शाळा ल्याब आहेत. एक जमीनीच्या 2400 खोल आहे, जिथे सुर्यकिरणाचा आणि वातावरणाचा कोणताही परिणाम होत नाही. आणि दुसरी प्रयोगशाळा चीनच्या वुहान शहराच्या 20 ते 25 कि.मी. अंतरावर, याच प्रयोगशाळेतून हा कोरोना विषाणूचा संसर्ग लिकीज झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
          लक्षात ठेवा, हा घटनाक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे,  जेव्हा नोव्हेंबरला चीनमध्ये कोरोना विषाणू रोग वाढत असतांना 30 डिसेंबर पर्यंत हे चीन ने कोरोनाची माहिती कुणालाच  सांगितले नाही. जेव्हा WHO या जगतीक आरोग्य संघटनेला याची माहिती मिळाली, तेव्हा चीनने उत्तर दिले, हा रोग बरा करण्यात आमचा देश सक्षम आहे, काळजी करण्याची गरज नाही. त्या नंतर पहिल्या डॉक्टराचा संशयास्पद मृत्यू. चीन मध्ये जवळपास 70 लाख विदेशी नागरीक कामानिमित्त रहात होते, नोव्हेंबर ते डिसेंबरच्या शेवट पर्यंत हा कोरोना संसर्ग जवळपास सर्व चिन मध्ये पसरला होता, यात त्या चीन मधील हे विदेशी 70 लाख नागरीकांचा समावेश होता.  ते विदेशी नागरीक मोठ्या प्रमाणात इटली, अमेरिका,स्पेन, टोकियो, बॅंकोक,भारत, पाकिस्तान, सह अनेक देशातले होते. हे सर्व नागरिक आप अपल्या देशात नविन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जानेवारी महिन्यात पोहोचली होती. त्यानंतर चीन ने लॉकडावूनची घोषणा केली. व या कोरोना विषाणू बाबत WHO या जागतिक आरोग्य संघटनेला कळवले. हा विषय आरोग्य संघटनेने गंभीरतेने घेत, कोरोना रोग हा संसर्ग जन्य रोग असुन ही एक प्रकारे महामारीच आहे असे घोषित केले. या सर्व प्रक्रियेला खूप उशीर झाल्या होता. जर चीनने हि 70 लाख जनता चीनमध्ये असतांनाच लोकडाऊन केले असते, आणि हि  कोरोना विषाणू ची माहिती जागतीक आरोग्य संघटनेला कळवली असती तर हा कोरोनाचा जिवघेणा रोग जगात पसरला नसता त्यावर उपाय योजना करता आली असती. मात्र तसे झाले नाही.  70 लाख वेगवेगळ्या देशांतील नागरीकांच्या माध्यमातून हा जिवघेणा कोरोना विषाणू पसरला होता. चीन नंतर इटली, स्पेन,अमेरिका नंतर सर्व देशांत मृत्यू चा तांडव सुरू आहे. जगात आज पर्यंत 26 हजार नागरीकांचा बळी गेला   आहे व जात आहे. देश विदेशात लाखो लोकांना या कोरोना महाभयंकर संसर्ग रोगाचा आजार जडला आहे. हे या रोगामुळे त्रस्त आहेत. ते दवाखान्यात इलाज घेत आहेत, आज पावेतो या कोरोना रोगाची लस औषध निघाले नाही हि अत्यंत चिंताजनक बाब आहे.
या जगात दोनच महासत्ता देश म्हणून ओळखले जातात एक अमेरिका आणि दुसरा चीन. त्यात अमेरिका हा  चीनवर आरोप करत आहे की, चीननेच हे जैविक विषाणू हातीयार आपल्या प्रयोगशाळेत तयार करून सोडले तर दुसरीकडे चीन हा देश अमेरिकेवर प्रतिअरोप करतो की, अमेरिकन लष्कराच्या मदतीने चीन मध्ये अमेरिकेनेच हा कोरोना विषाणू सोडला आहे. आज आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी म्हणाले की, WHO या आरोग्य संघटनेच्या पुनर्रचने बाबत फेर विचार करावा. म्हणजे नक्कीच दाल मे कुच काला है या उक्ती प्रमाणे. म्हणून 
      काय खरच जगाच्या विनाशाला चीन जबाबदार असेल ? या बाबत सत्य काय आहे ?  हे आज मात्र गुलदस्त्यात बंद आहे. हे आज ना उद्या सर्व जगासमोर येणार आहे.  म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है, पराजीत नही. सत्यमेव जयते.
                 म्हणून कोरोना विषाणू या  रोगाची कोणतेही औषधी उपलब्ध नसल्यामुळे या रोगा प्रती गंभिरतेने घ्या, घराबाहेर पडुच नका, पडले तर तोंडाला मास्क बांधा, उपाय योजना म्हणून हात स्वच्छ धुवा, सेनिटाईज करा,सोसीयल‌ टिस्टंसेस पाळा, सर्दी,खोकला,ताप, डोकेदुखी,गळा दुखने, हि लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा. आज आपल्या देशात ऐकून 20 जनांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 874 रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र 1 नंबर वर आहे. 160 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, हि संख्या वाढण्यात जास्त वेळ लागणार नाही म्हणून वेळीच उपाययोजना करा.केंद्र व राज्य सरकारच्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करा हि अपेक्षा व विनंती.


चंद्रकांत बापूराव कारके
सामाजिक कार्यकर्ता ( M.S.W ) तथा अध्यक्ष,
भारतीय सुशिक्षित बेरोजगार विकास व प्रशिक्षण संस्था जालना मो. 9921684586
Email :ckarke3@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...