गुरुवार, २१ मे, २०२०

रमाई आवास योजनेअंतर्गत घराचे बांधकाम होऊन दोन महिने झाले, बजेट नसल्याने लाभार्थ्य ना आर्थीक अडचण निर्माण होत आहेत.



प्रतिनिधी सिंधीकाळेगाव :- जालना तालुक्यातील सावंगी तलान ग्रामपंचायत अंतर्गत येथील रमाई आवास योजनेअंतर्गत काही लाभार्थ्यचे घराचे बांधकाम होऊन एक ते दोन महिने झाले आहेत .व काही लाभार्थ्यचे बांधकाम चालु आहेत . या योजनेला बजेट नसल्याने त्यांना पुढील हाप्ता मिळण्यास विलंब लागत आहेत . तसेच लाभार्थी -श्री . सोपान राजाराम मांदळे, कैलास लक्ष्मण रंधवे, संजय भास्कर रंधवे, निवृ ती नारायण रंधवे, सोनाजी त्रिंबक मोरे यांनी बोलताना सांगितले की , आम्हाला पहिला हप्ता १५,०००(पंजरा हजार सपये ) अॅडव्हाँन्स मिळाला आहे . त्यामधुन घराचे बेसमेंट लेवल बांधकाम केले आहे.तसेच दुसरा हाप्ता ४५,०००( पंचेच्याळीस हजार रुपये )काही लाभार्थ्यना मिळाले आहे,काहींना मिळाले नाही  तसेच काही लाभार्थ्यचे घराचे बांधकाम पुर्ण झाले असुन त्यांना तिसरा व अंतिम हाप्ता रुपय ४०,०००(च्याळीस हजार रूपये) देण्यास अडचण निर्माण होत आहे. तसेच लाभार्थीनी सांगितले की, रेती,सिमेंट,विटा, मिस्तरी यांची ऊसणवारी,उधारी करून बांधकाम पुर्ण केले असुन ते कुठून द्यावे. व आता काही दिवसापासून शेतीची काम चालु होणार असुन बीयाणे कुठून आणावी हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. तसेच वरील लाभार्थ्यनी वारंवार पंचायत समिती- गटविकास अधिकारी व इंजिनीअर यांना वारं-वार विचारणा केली.पण, त्यांनी सांगितले की शासनाकडून निधी आल्यानंतर वितरीत करणयात येईल. तसेच दुसरी कडे-शबरी योजनेला व पंतप्रधान आवास योजनेला निधी असुन या योजनेला का नाही हा प्रश्न लाभार्थ्यना भेडसावत आहे. तसेच वरिलाप्रमाणे आपली ही समस्या रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी  बोलतांना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...