बुधवार, २० मे, २०२०

जप्त केलेली वाहनं नागरिकांना परत देण्याची "वंचित"ची मागणी.





 जालना (प्रतिनिधी):-  देशभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर प्रतीबंध घालण्यासाठी देशभरात लॉक डाऊन केल्यामुळे या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून पोलिस विभागा कडुन 586 वाहनं जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे यात सर्वसामान्यांना जिवानश्यक धान्य, किरना सामान भाजीपाला या व इतर आवश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर ही कार्यवाही करण्यात आलेली आहे, करीता या सर्व जप्त करण्यात आलेल्या वाहनांना शासकीय नियम अटी,शर्तीनुसार पुर्तता करून परत नागरिकांना देण्यात याव्यात अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ई-मेल वर निवेदनाव्दारे मागणी करण्यात येत आहे,या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दीपक डोके, अकबर इनामदार,विष्णु खरात, दिपक घोरपडे, अँड.कैलास रत्नपारखे, विनोद दांडगे, सचिन कांबळे, नाना जाधव,अर्जुन जाधव, गौतम वाघमारे, विलास नरवडे, नितीन बाळराज, राजाभाऊ दाहिजे,सुरज सोनवणे, भैय्यासाहेब पारखे,कांतीराम आढाव,बाळु शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...