रविवार, ३१ मे, २०२०
शनिवार, ३० मे, २०२०
परतुर-मंठा तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्याचे थकीत उसाचे बिल १० जुन पर्यंत देन्यात यावे.मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश सोळंके यांच्यी मा.मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनद्वारे मागणी.
गारपिटीचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत आला आहे. म्हणून परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांची सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याली आहे.जालना जिल्ह्यातील. परतुर-मंठा तालुक्यातील येथील प्रावेट लिमीटेड बागेश्वरी साखर कारखाना मालकाने जाहीर केल्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २६०० प्रति टन भाव जाहीर केला होता.परंतु प्रत्यक्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फक्त २००० रुपये प्रमाणे बिल दिले आहे. बाकी थकित ६०० रु प्रत्यक्षात परतुर-मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना बागेश्र्वरी कारखान्याच्या मालकांने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर २६०० रुपये जाहीर केल्या प्रमाणे उसाचे बिल द्यायला पाहिजे होते. परंतु दिले नाही.हा साखर कारखानदार ऊस उधारीवर का घेतो?कारण ऊस उत्पादक शेतकरी ज्या वेळेस उसाची लागवड करतो त्या वेळी त्याला नांगरणी.उसाचे बेणे लागवड.अंतर्गत मशागत.११ महिने पाणी देणे.वेळो वेळी रासायनिक खते द्यावी लागतात. प्रसंगी १/२ फवारण्या कराव्या लागतात. नियोजन करून नगदी खिसातुन खर्च करावा लागते.म्हणून २०२० ते २०२१ वार्षिक वर्षासाठी शेतकऱ्यांचा ऊस कारखानदारांनी उधारीवर घेऊ नये असा प्रकारे. परिपत्रक काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.तसेच अशा कठिण प्रसंगी जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकित बिल ६०० रुपये देण्या बाबत.मा साखर आयुक्त यांना सूचना देऊ बागेश्र्वरी साखर कारखान्याच्या मलकावर कारवाई होईल हि अपेक्षा आहे.तरी मुख्यमंत्री साहेबांनी जालना जिल्ह्यातील परतुर-मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखानदार अडवणुक करीत आहे.मागच्या ७७ दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपीट झाल्या होती. या बागेश्र्वरी साखर कारखान्याच्या मलकावर शेतकऱ्यांचे थकित ६०० रुपये बिल दिले नाही. व ऊस उधार घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली.तसेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकारण मुदाम ६०० रुपये अडकुन ठेवल्या प्रकरणी कारवाई करावी.व हे संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे थकित ६०० रुपये बिल १० जुन पर्यंत देण्यात यावे अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके जालना यांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांना निवेदनद्वारे केली आहे.
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
मुंबई येथून 19 मे रोजी तालुक्यातील मापेगाव येथे आलेल्या कोरोना संशयित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात जालना येथे मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी दिली.याबाबत त्यांनी सांगितले की, सदरील मयत व्यक्ती दिनांक १९ मे रोजी तालुक्यातील मापेगाव बु येथे कुटुंबासोबत आले होते त्यांना स्थानिक ग्रामपंचायत मार्फत सरपंच व इतर स्वयंसेवक यांनी जिल्हा परिषद शाळेत विलगिकरण केले होते मात्र त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने दिनांक २९ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्या रुग्णाचे लाळेचे नमुन घेऊन प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते मात्र अहवाल येण्या अगोदरच मध्यरात्री ०२ वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना निधन झाले असल्याची माहिती ही डॉ. सय्यद यांनी दिली.जिल्ह्यातील कोरोना संशयिताच्या मृत्युची ही पहिलीच घटना आहे. अहवाल काय येतो याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे मागील दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीकरिता नोटरी चे काम थांबलेले आहे अनेक नोटरी वकील बंधू-भगिनी यांची उपजीविका नोटरी कामावर अवलंबून आहे त्यामुळे ते आर्थिक संकटात आलेले आहेत. स्वाभिमान मुळे त्यांना कुठे मदत मागणे ही अवघड झालेले आहे व त्यांच्या समोरील आर्थिक संकटही संपत नाही अशी अवस्था नोटरी बांधवांची झालेली आहे. नव्याने नवनियुक्त झालेल्या नोटरी बांधवांची परिस्थितीही अशीच आहे काम बंद असल्याने त्यांची आर्थिक अडचण झालेली आहे .
विविध शासकीय कार्यालय वित्तीय संस्था ,बँका, शैक्षणिक संस्था पासपोर्ट ऑफिस परदेशात सादर करावयाची कागदपत्रे यावर नोटरी चे मोहर असणे आवश्यक व अनिवार्य असते. विधानसभा लोकसभा राज्यसभा स्थानिक स्वराज्य संस्था यांचे निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आणि अनेक शपथपत्र हमीपत्र त्याचप्रमाणे काही कागदपत्रे जोडावी लागतात त्यावर नोटरी यांनी ती कागदपत्रे तपासले आहेत व बरोबर आहेत म्हणून त्यावर नोटरी चा सही शिक्का आवश्यक मानला जातो . नोटरीच्या कामास अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे विचार महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे सचिव ॲडव्होकेट प्रविण नलवडे यांनी व्यक्त केले.
नोटरी त्यांचे कर्तव्य म्हणून जनतेच्या सेवेसाठी अनेक प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कचेरी सरकारी कार्यालयांमध्ये त्यांचे नोटरियल काम करत असतात मात्र सदर ठिकाणी काम करीत असताना नोटरी ला बसण्यासाठी कुठलीही सुविधा शासनामार्फत अथवा संबंधित कार्यालयामार्फत केली जात नाही उलट काही ठिकाणी काही अधिकारी नोटरींना काम करण्यास मज्जाव करतात त्यांचे टेबल-खुर्च्या जप्त
केल्या जातात. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून त्यांच्यावर कारवाई केली जाते हे योग्य नाही.नोटरी हे शासनास नोटरियल कामामधून सहकार्य करत असतात याची जाणीव ठेवून सर्व प्रशासकीय व शासकीय इमारतीमध्ये त्याचप्रमाणे नव्याने बांधण्यात येणार्या शासकीय कार्यालयांच्या इमारतीमध्ये नोटरी ना नोटरी रियल काम करण्यासाठी सोयीस्कर स्वतंत्र जागा देणे आवश्यक आहे त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे शासकीय कार्यालयात काही ठराविक दाखले मिळण्यासाठी द्यावे लागणारे प्रतिज्ञा पत्रास शंभर रुपयांचा मुद्रांक माफ केलेला आहे साध्या कागदावर केलेले प्रतिज्ञापत्र मान्य केले जाते . त्याप्रमाणे सध्याच्या करोना सदृश्य परिस्थितीमुळे व ओढवलेल्या आर्थिक संकटामध्ये नोटरी डॉक्युमेंट करता पंचवीस रुपये नोटरियल स्टॅम्प लावावा लागतो त्यामध्ये माफी मिळणे आवश्यक आहे अथवा तो पाच रुपये पर्यंत करता येईल का याचा विचार शासनाने
करणे आवश्यक आहे .तसेच सध्याच्या बदललेल्या काळामध्ये नोटरी यांचे फी मध्ये ही वाढ करणेआवश्यक आहे. शासन दरबारी महाराष्ट्र आणि गोवा नोटरीअसोसिएशनच्या माध्यमातून नोटरी बंधूभगिनींच्या हक्कासाठी व त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी योग्य तो पत्रव्यवहार व पाठपुरावा शासनाकडे करण्यात येत आहे. असे संघटनेचे सचिव ॲड. प्रविण नलवडे यांनी सांगितले.
शुक्रवार, २९ मे, २०२०
तालुक्यातील अनेक गावातील मजूर शहराच्या ठिकाणी कामे करण्यासाठी जातात तर काही मजूर हे गावातच ग्रामपंचायतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मग्रारोहयोची कामे करतात.एप्रिल,मे महिन्यात गावात अनेक मजूरांना कामे मिळायला पाहिजे होती परंतु कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला.देशासह महाराष्ट्रात मागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने गावातील सर्वच कामे बंद होती.मजूरांच्या हाताला कामे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.ही बाब लक्षात घेऊन तालुक्यातील वरफळ येथील ग्रामसेवक एकनाथ मुरदकर,सरपंच श्रीमती मसरत बेगम शेख नदीम यांनी पुढाकार घेऊन गावातील अडचणीत आलेल्या मजुरांना मग्रारोहयो मधून कामे उपलब्ध करून दिल्याने मजूर वर्गातून समाधान व्यक्त केलं जातं आहे.कोरोनाच्या संकटकाळात मजूरांच्या हाताला उशिरा का होईना कामे मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.सरपंच मसरत बेगम यांनी तसेच ग्रामसेवक श्री. मुरदकर यांनी गावातील शेकडो मजूरांना मग्रारोहयो अंतर्गत नाला खोलीकरण तसेच गाव तलावातील गाळ व इत्यादी कामे मिळवून दिल्यामुळे मजुरांना उपासमारीची वेळ टळली तर जमिनी मधील भूजल पातळी सुद्धा येणाऱ्या काळात वाढणार आहे.
या कठीण परिस्थिती मध्ये हाताला काम मिळाल्यामुळे मजूरांनी ग्रामपंचायत मार्फत सुरू झालेल्या कामाबाबत आभार मानून समाधान व्यक्त केले.
प्रशासकीय सूचनांचे पालन करून काम सुरू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील मजूर आर्थिक संकटात सापडला होता ही गरज लक्षात घेता त्या मजुरांना ग्रामपंचायत मार्फत कामे उपलब्ध करून देण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच,सदस्य यांना सोबत घेऊन तसेच मजुरांना प्रसासकीय सूचना देऊन काम सुरू करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास अधिकारी एकनाथ मुरदकर यांनी दिली.
पाणीटँकर सप्लाय, परवानाधारक भाजी व फळ विक्रेते(गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही), सर्व राष्ट्रीयकृत बँक – सर्व प्रकारच्या शासकीय चलान भरण्याकरिता, ऑनलाईन किराणा (फक्त घरपोहोच), सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने.आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे. हे आदेश दि. 31 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील.
*💥यावर्षी ‘वारी’ हेलिकॉप्टर, विमानातून; पायी पालखी सोहळा रद्द!*
-------------
पुणे: कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.
"""""""""""""""""""""""""""""""""""
इम्रान सौदागर | गेवराई - शहरातील जायकवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असुन परिसरात खळबळ उडाली आहे.
गंधराबाई बप्पासाहेब घुले (वय अंदाजे 65 वर्ष) या आपल्या पत्नीला त्याने आधी काठीने मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्या करण्यात केली. सदरील ईसम हा मनोरूग्ण असल्याचे समजते घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक चोबे सह अनेक कर्मचारी दाखल झाले असून आरोपी बप्पासाहेब याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती.याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे 1 हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
सोयाबीन बियाण्याची 30 किलो ची बॅग मागील हंगामात 1890 रुपयांपर्यंत विकली जात होती.यंदा ही किंमत 360 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसून म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशअध्यक्ष पूजाताई मोरे यांनी केले आहे.
राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे.राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे.यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते.सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे 30 ते 40 टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते.या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो.हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली.असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे.बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली.यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केलीय आहे.महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा 360 रुपयांनी यंदा महागली आहे.मागील वर्षात 1,890 ला मिळणारी बॅग 2250 रुपयांपर्यंत पोहचली आहे.म्हणून किलोलो 75 रुपयांना दर चुकवावा लागणार आहे.तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग 2,400 किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहेत.ही शेतकऱ्यांची लूट आहे.या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे.म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे व खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी पूजा मोरे यांनी केली आहे.
खरात, कचरू साळवे, तरंग कांबळे (बीड हॅलो रिपोर्टर महाराष्ट्र ब्युरो चिप), नीलेश जाधाव, अभिजीत शिरगोळे, राहुल कारके, अरविंद शीरगोळे (बीड हॅलो रिपोर्ट ता. प्रतिनिधि), कार्यकर्ते, पत्रकार टीम इत्यादि आदि उपस्थित होते. आदिवासी (मयत शांताराम शिंदे) यांच्या मुलाच्या म्हणजेच दिगंबर शांताराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून आखेर गोंदी पोलीस ठाण्यात खुनचा गुन्हा नोंद झाला. जातीवाचक शिवीगाळ, भां.द.वी कलम 302, 323,504, 506, 34 ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सी.डी.शेवगन हे करत आहे.
शेतकर्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाची गरज
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे या वर्षी रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर महाबीज निर्मित जया भाताचे बियाणे पेरणी साठी कोणाकडेच उपलब्ध नसल्याने या वर्षी आपल्या शेतात नेमके कोणते भाताचे बियाणे पेरावे या विचाराने माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
रायगड जिल्हाला भाताचे कोठार असे संबोधले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, अलिबाग मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड आणि माणगांव इत्यादी तालुक्यातील शेतकरी आपापल्या शेतात मोठ्या प्रमाणात जया भाताचे पीक घेतात. कारण रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेनुसार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या जिल्ह्यातील उपरोक्त सर्व तालुक्यातील सर्व ठिकाणच्या शेतकर्यांच्या शेतात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. आणि ते पुढील तीन ते चार महिने शेतात तसेच साचून राहते त्यामुळे रायगड जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी आपापल्या शेतात लवकर तयार होणारे म्हणजे हळवे भाताचे बियाणे न पेरता जरा उशिरा तयार होणारे म्हणजे गरवे भाताचे बियाणे अर्थात जया या वाणाची निवड करून ते पेरतात.
कारण जया या भाताला बाजारात विक्रीसाठी चांगला दर मिळतो. जया वगळता बाकी कोलम,रतना, आयरट,टायचण, सोना, कर्जत, इंद्रायणी इत्यादी सर्व प्रकारच्या भाताला बाजारात विक्री करताना अत्यल्प दर मिळतो. या शिवाय वरिल भाताचे पीक लवकर तयार होत असल्याने रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना पावसामुळे वरील सर्व प्रकारची पीके कापण्यास विलंब होतो. आणि परिणामी लवकर तयार झालेले भात पावसामुळे वेळेवर कापायला न मिळाल्याने या भाताचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व शेतकरी पावसाळ्या पुर्वी आपापल्या शेतात पेरणीसाठी जया या भाताची निवड करतात. परंतू सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदी मुळे रायगड जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट सेवेवर या चा मोठा परिणाम झाला. त्यामुळे तमाम रायगड जिल्ह्यात या वर्षी सर्व कृषी सेवा केंद्रावर जयाचे भात बियाणे उपलब्ध नसल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यासह माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्ग आपल्या शेतात या वर्षी नेमके कोणते बियाणे पेरावे या विवंचनेने चिंताग्रस्त झाले आहेत. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांनी सर्व शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. अशी माणगांव तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
ठाणे जिल्ह्यात मागेल त्याला मदत, वंचितचा अभिनव उपक्रम
ज्यांच्याकडे शिधापत्रिका (राशनकार्ड) नाही. त्यांनाही राशन दुकानातून मिळणार धान्य.त्यांच्याकरिता येणाऱ्या दोन दिवसात 31मे पर्यंत आपल्या जवळच्या राशन दुकानांमध्ये फॉर्म भरून दिल्यानंतर तो फॉर्म पुरवठा अधिकाऱ्याकडून मंजूर झाल्यानंतर येणाऱ्या दहा तारखेपर्यंत त्यांना त्याच राशन दुकानातून धान्य उपलब्ध होणार आहे.व तसेच फॉर्म भरून राशन दुकानदाराकडे दिल्यानंतर त्याची पोहोच घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्वांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा.ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही असे आपले शेजारी नातेवाईक मित्र परिवारातील व्यक्ती किंवा कुटुंब त्यांना माहिती करून द्यावी .काही अडचण आल्यास मला संपर्क करावा.विक्क़ी लोखंडे शिवसेना उपविभाग प्रमुख मिसरवाडी 9764197829 यांनी सांगितले आहे.
गुरुवार, २८ मे, २०२०
बुधवार, २७ मे, २०२०
""""""""""""""""''''""""""""""""""""""
फिर्याद देण्यास गेलेल्या इसमास गेवराई पोलिस कर्मचाऱ्याने बेदमपणे बदडले
गेवराई तालुक्यातील मादळमोही पोलिस चौकीतील प्रकार ; गंभीर जखमी इसमाची पोलिस अधिक्षकांकडे तक्रार
गेवराई , :- भांडणानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद घेतली जाते,मात्र फिर्याद देण्यासाठी गेलेल्या एका इसमाची कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार तर घेतली नाही,उलट त्यालाच चांगलेच बदडून काढल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील मादळमोही चौकीत घडला आहे.यामध्ये सदरील इसम गंभीर जखमी झाला असून कानाला दुखापत झाल्याने ऐकूच येत नसल्याने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याप्रकरणी गंभीर जखमी इसमाने पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.दरम्यान या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक यांनी हे प्रकरण गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे. संदिपान रामभाऊ सानप (वय ४० वर्षे) रा.सावरगाव असे पोलिस कर्मचाऱ्याच्या मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.संदिपान सानप यांची चिखली शिवारात जमीन असून ते दि.२५ रोजी ट्रँक्टरच्या सहाय्याने मोघडणी करत होते.यावेळी चिखली येथील संतोष वारे हा त्याच्या पत्नी व मुलासह शेतात येऊन सानप यांना शेत मोघडण्यास मज्जाव केला.यानंतर सानप यांनी वाद नको म्हणून जवळच असलेल्या मादळमोही चौकीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. यावेळी चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी गुरखुदे यांनी तक्रार घेण्यास नकार दिला.दरम्यान तक्रार का घेत नाही ? म्हणून सानप यांनी जाब विचारल्याचा गुरखुदे यांना राग आला.यानंतर गुरखुदे यांनी संदिपान सानप यांना चौकीतील एका खोलीत नेऊन बेल्ट,काठी व बँटने जबर मारहाण करत शिव्या घालत चौकीबाहेर हाकलून दिले.दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या सानप यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याने ऐकण्यास येत नाही.तसेच हात,पायाला देखील गंभीर मार लागला असून सानप यांचँयावर बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत सानप यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करुन पोलिस कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान पोलिस अधिक्षकांनी हे प्रकरण चौकशीसाठी गेवराई पोलिस निरीक्षक यांच्याकडे वर्ग केले आहे.
*चौकशी करून कारवाई करणार याप्रकरणी गेवराईचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांना विचारले असता ते म्हणाले की,सदरील प्रकार गंभीर आहे.या प्रकरणी चौकशी करण्यात येईल,यामध्ये जर सदरील पोलिस कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल*
अडचणीत असलेल्या नाट्य, चित्रपट कलाकारांना आर्थिक मदत
"""""""""""""""""""""""""''''"""""""
*परतुर*
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या परतूर तालुका महासचिवपदी मराठवा डा साथी व झी 24 न्यूज लाईव्हचे आष्टीचे प्रतिनिधी जनार्दन जाधव यांची नियुक्ती जिल्हाअध्यक्ष असलम कुरेशी यांनी केली आहे.
इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी यांनी ही नियुक्ती केली.
जनार्दन जाधव यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनमध्ये ग्रामीण व लेकर शहराच्या पत्रकारांना संघटनेशी जोड़ून संघटना मजबूत करण्याचे कार्य करावे. तसेच पत्रकारावर होणा-या अन्याया विरोधात आवाज उठवण्यासाठी. सदैव तत्पर रहावे. जनार्दन जाधव यांच्या नियुक्तीबद्दल मोहन सोळंके (सकाळ) आनंद आढे (बंजारा लाईव्ह रिपोर्टर), गणेश आगलावे (देशोन्नती), राहुल आवटे (सी.एन.आय. महाराष्ट्र रिपोर्टर), सतिश पवार (लोकप्रश्न), पांडुरंग शेजुळ (गाव माझा रिपोर्टर), अंगद मुंढे (आताच एक्सप्रेस), इमरान कुरेशी (मराठवाडा केसरी), मुनीर खान पठाण (पोलिस नवरंग), सैय्यद अकबर ( दिव्य मराठी), सैय्यद वाजिद ( राज्यवार्ता), नजीर कुरेशी (लोकमत), तरंग कांबळे (हैलो रिपोर्टर), ऊद्धव डोळस (आनंद नगरी) आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
परदेशी शिष्यवृत्तीला मुदतवाढ देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी.
मुंबई,ब्युरोचीफ :- अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीच्या आवेदन प्रक्रिया पूर्ण करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने विद्यार्थ्यांना जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व पुर्व अटींचे ऑफर लेटर (प्रस्ताव पत्र) यांची पूर्तता करता आलेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ३० जून पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केंद्रीय सचिव योगेश धिंग्रा यांच्याकडे केली आहे.अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मास्टर्स व पीएचडी करीता राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची आज शेवटची तारीख आहे. मात्र कोरोनामुळे सर्व जिल्ह्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडली असून सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, तसेच जात पडताळणी कार्यालये देखील बंद आहेत. परिणामी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याची जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.भारतात जे विद्यार्थी पदव्युत्तर किंवा डॉक्टरेटचे शिक्षण घेत आहेत किंवा घेणार आहेत.त्यांना पुन्हा शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरण्यास मनाई करण्यात आली आहे, शासनाची ही अट म्हणजे विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक उच्च शिक्षणा पासन दूर ठेवण्यासारखी असून हा त्यांच्यावर अन्याय आहे. ही अट त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या आधी ही सहा लाख रुपयांची उत्पन्न मर्यादा घालण्यात आली होती.परंतु मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने राज्य सरकारने याअटीला तात्पुरती स्थगित दिली आहे.असे असली तरी नव्याने वेगवेगळ्या अटी घालण्यात आल्या असून त्यामुळे अनुसूचित जाती जमातीवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.अनेकदा परदेशी विद्यापीठे ही कुठल्याही अटी शिवाय ऑफर लेटर देत असले तरी आता सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण घेण्याच्या मार्गात हा देखील एक मोठा खोडा आहे. सबब ही अट रद्द करून विद्यार्थ्यांना कुठल्याही अटी शिवाय पुर्व अटींचे ऑफर लेटर स्वीकारून त्यांना देखील या शिष्यृत्तीसाठी पात्र ठरवण्यात यावे, जागतिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहता सर्व कुलूपबंद असल्याने परीक्षा व प्रवेश प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यात सवलती देऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील ३० जून पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी देखील ई मेल आणि व्यक्तिगत पद्धतीने सामाजिक न्याय मंत्री, त्यांचे स्वीय सहाय्य्क यांना दूरध्वनीवरून संपर्क करून ही मुदतवाढ देण्याची व अटी शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
परतूर तालुक्यातील कापूस विक्री करिता जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे या ठिकाणी रोज फक्त 40 ते 50 शेतकऱ्यांचा कापूस मोजला जातो. पाऊस काही दिवसावर येऊन ठेपला आहे परतूर तालुक्यात कापूस उत्पादकांची जवळपास सीसीआय कडे ऑनलाइन पाच हजारपेक्षा जास्त नोंदणी आहे आतापर्यंत अकराशे बाराशे लोकांचाच कापूस खरेदी केलेला आहे. दररोज केवळ चाळीस-पन्नास शेतकऱ्यांचा कापूस घेतल्या जात आहे.
सीसीआय व त्याचे अधिकारी पाऊस पडण्याची वाट पाहत आहेत की काय ? असा शेतकऱ्यांना प्रश्नः पडत आहे. पाऊस पडला म्हणजे कापूस घ्यायचा प्रश्नच उरत नाही आणि मग परतूर तालुक्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्याची नोंद तशीच बाकी राहील असे चिन्ह सध्याची परिस्थितीवरून पाहायला मिळते तरीही कोणतेही अधिकारी याबाबत गंभीर दखल घेतील असे वाटत नाही ? तरी संबंधित प्रशासनाने नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस हा 7 जून अगोदर घेतला पाहिजे. आजच्या घडीला कोरोनापेक्षा शेतकऱ्यांना कापूस घरात राहतो की काय याची भीती आहे आणि पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला आहे ,तरी संबंधितांनी जास्तीचे खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावेत आशी शेतकऱ्याकडून मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रिया भाऊसाहेब देविदासराव मुके पाटील रा. परतूर ( शेतकरी )
लॉकडाऊनच्या काळात खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे कापूस घरात राहिल्यामुळे त्यात किडे झाल्याने घरात राहणे मुश्किल झाले आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर बारीक बारीक लाल पुरळ ( गुथी ) आल्या सारखे दिसते व काहीच्या कानात रात्री झोपेतअसताना गेलेले आहेत हे असा मानसिक व आर्थिक त्रास अजुन काही दिवस असाच राहिला तर कोरोना राहील बाजूला अन् त्या किड्यांमुळे वेगळीच रोगराई पसरेल.व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल आणि मग शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारेल की काय यांची भीती वाटते.
रविवार, २४ मे, २०२०
शुक्रवार, २२ मे, २०२०
विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात महाविद्यालयांना सुचना
जालना,प्रतिनिधी:- सर्व महाविद्यालय प्राचार्य, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना संस्था प्रमुखांनी आपल्या महाविद्यालय, संस्थेत सन 2019-20 शैक्षणिक वर्षात प्रवेशित अनु- जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच विद्यावेतन योजनेचे अर्ज ऑनलाईन प्रणालीhttp://mahadbtmahait.gov.in यावर भरण्यात आलेल्या अर्जापैकी मोठ्या प्रमाणात अर्ज महाविद्यालयाचे लॉगिनवर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.**
सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था प्रमुखांनी सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन नोंदविलेल्या अर्जापैकी परिपुर्ण स्वरुपात पात्र अर्ज मंजुर करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या लॉगिनवर पाठविण्यासाठी दि. 26 मे, 2020 ही अंतीम तारीख असल्याचे ऑनलाईन प्रणालीवर कळविले आहे. सदरील अर्जापैकी त्रुटीचे अपात्र मंजुर केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. तसेच अनुसुचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत मंजुर झाले नसल्याने शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य पुर्णत: जबाबदार राहतील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित व्दितीय टप्प्याची उपस्थिती नोंदवुन मंजुरी बाबत ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज या कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन कार्यलय अधीक्षक, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या 860 नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना
जालना,प्रतिनिधी:- लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकुन पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोय करण्यात येत असुन यापूर्वी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातुन उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. आज दि. 22 मे रोजी 1400 नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरु झाल्याने बऱ्याचशा बिहारी नागरिकांनी या कंपनीमध्ये स्वत:हुन थांबणे पसंत केल्याने प्रवासासाठी आलेल्या 860 एवढ्या नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्धरितीने नियोजन करण्यात येत असुन या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करत असुन दि. 22 मे रोजीच्या विशेष रेल्वेसाठीही जिल्हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन केले होते. बिहार राज्यामध्ये येण्यासाठी बिहार सरकारकडून लेखी परवानगी प्राप्त करुन घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व नागरिकांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले. जालना शहरामधून जाणाऱ्या नागरिकांना व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना जालना रेल्वेस्टेशनपर्यंत आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या या रेल्वेचे पुर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार श्री सोनवणे, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक श्री महाजन यांच्यासह महसुल, रेल्वे, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीसह सर्वच पातळीवर राज्य सरकार अपयशी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
जिल्ह्यात होणार क्लोरीन वॉश व अनुजैविक तपासणी अभियान.
मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची माहिती.
जालना,प्रतिनिधी :- पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. पावसाळ्याच्या कालावधीत विविध प्रकारच्या जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. या कारणाने जिल्हा परिषद जालना तर्फे पावसाळ्याच्या पार्स्व्भूमीवर जलजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियान स्वरूपात दिनांक २६ मे ते ३० जुन २०२० या कालावधीत जिल्ह्यात खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. सदर अभियानामध्ये जे ग्रामसेवक, अधिकारी कर्मचारी सक्रीय सहभाग नोंदविणार नाही, पाणी नमुना प्रयोगशाळेस सादर करणार नाही व ज्या गावातील पाणी पाणी नमुना दुषित येईल त्या संबंधित कर्मचा-यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी दिली आहे.
क्लोरीन वॉश अभियान. (ग्रामसेवक / जलसुरक्षक) कालावधी - २६ ते ३१ मे २०२०*
जिल्ह्यातील सर्व गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची/जलकुंभाची आतून व परिसर साफ सफाई करणे, सार्वजनिक विहीर व पाणी पुरवठ्याची विहिरीमध्ये पडलेला कचरा काढणे, सविस्तर सुचना देण्यात आलेल्या आहेत. सदर अभियान मुदत दिनांक २६ मे ते ३१ मे २०२० राहील. पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची नियमित पाणी शुद्धीकरण करणे पाणी नमुने दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार असल्याबाबत कळविण्यात आले आहे.
अनुजैविक पाणी नमुने तपासणी अभियान ) ग्रामसेवक / जलसुरक्षक) कालावधी - ०१ जुन ते ३० जुन २०२० जिह्यातील सर्व गावातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची व काही नळ कनेक्शन च्या पाण्याची अनुजैविक तपासणी ग्रामसेवक यांनी आपल्या तालुक्याला नेमून दिलेल्या प्रयोगशाळेकडूनच करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सुचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. अनुजैविक तपासणी अभियान मध्ये एकही गाव वाडी वस्तीचा पाणी नमुना तपासणी पासूनराहू नये याबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. तपासणी अंती प्राप्त अहवालानुसार पाणी नमुना दुषित आढळून आल्यास गंभीर दखल घेण्यात येणार आहे.
उपरोक्त दोन्ही अभियान दिनांक २६ मे ते ३० जुन २०२० या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.अभियानाअंती सर्व गटविकास अधिकारी यांचा अभियान विषयक आढावा नियोजित आहे. सदरील अभियान यशस्वी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी ग्रामसेवक जलसुरक्षक यांना देण्यात आली आहे.या अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.अनुपमा नंदनवनकर, श्रीम.नम्रता गोस्वामी, श्री.भगवान तायड, श्री संजय डोंगरदिवे, श्री ऋषिकेश जोशी, श्री हिमांशू कुलकर्णी, श्री जय राठोड, श्री. श्रीकांत चित्राल श्री.शुभम गोरे हे परिश्रम घेत आहेत.
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
जालना जिल्ह्यातील पाथरूड तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी. सिंधी काळेगाव (प्रतिनिधी) :...
-
खासगी आस्थापनांनी कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन जालना,ब्युरोचीफ :- कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमु...