रविवार, २८ जून, २०२०

जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा 02, संभाजी नगर 02, रामनगर विनकर कॉलनी 01, नरिमननगर 01,रहेमान गंज 01,आनंदनगर 03, समर्थनगर02, लक्कडकोट04,खडकपुरा 03 अशा एकुण 19 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नळगल्ली 01, संजोग नगर 01, क्रांती नगर 01,यशोधरा नगर 01, खडकपुरा 05,अंबड रोड जालना 01, मंगळबाजार 02,रहेमान गंज 15, योगेश नगर 01, सत्यनारायण चाळ 01,मस्तगड 01,दानाबाजार 10,पानशेंद्रा ता. जालना येथील 01,भारज बु ता जाफ्राबाद येथील 01, अशा एकूण 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4012 असुन  सध्या रुग्णालयात-130,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1563, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–46, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5063 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–42 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-504, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4503 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-52, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1420.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1255, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-33, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-213, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-19, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-336, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-142 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13087, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.आजसंस्थासत्मवक अलगीकरणात असलेल्या0 व्यखक्तींबची संख्या  213 असून /संस्थारनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_03,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-13,मॉडेल स्कूल परतुर-10,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-16,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-17,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 20,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय  महविद्यालय जाफ्राबाद 12.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 888 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 49 हजार 530 असा   एकुण 4 लाख 76 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना,ब्युरोचीफ :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायययोजना नियम 2020 मधील तरतुदीनुसार जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरिकांची वाहतुक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

बाजार गेवराई येथील नवतरूण शेतकऱ्यांची आत्महात्या..!


बदनापूर,ब्युरोचीफ :- बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे दिनांक 28 सकाळी 03:00 दरम्यान जोरदार पावसामुळे सदर शेतकऱ्याच्या कापुस बाजरी आदी पिके वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामुळे निराश होऊन सदर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले  व आपल्या राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले नातेवाईकांनी उपचारासाठी औरंगाबाद रूग्णालयात नेत असताना  रस्त्याच प्राणज्योत मावळली सदर शेतकऱ्यांच्या  नवतरूण शेतकरी बळीराम ज्ञानेश्वर कान्हेरे वय 24 राहात्या  दिनांक 28 संकाळी: 11:00 वाजेदरम्याण घरी असलेल्या मोनोसिल नावचे मागिल वर्षीची आणलेल्या औषध प्राशन केले सदर शेतकऱ्यांचे  वडील  अशिक्षित असल्याने सदर बळीराम हा  शेती व अथिंक  व्यवहारात हा नवतरूण शेतकरी करत होता सदर  त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे.

बदनापूर शहरासहित लागत असलेल्या गावावर पुन्हा धोधो पाऊस


नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत भर


बदनापूर,ब्युरोचीफ :-  बदनापूर शहरासह लगत असलेले गावावर पावसाचा पुन्हा मारा आज दु. 03: 45 वाजेला पावसाची सुरुवात झाली असून आधीच अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात पुन्हा पावसाचा भर पडला पुन्हा नदीनाले एक झाल्याचे चित्र निर्माण झाले शेतामध्ये पाणी साचल्याने तलावाच स्वरूप निर्माण झाले. दुधा नदीचा आणखीन ओघ वाढला तर अधिक पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडी पावसाने दिलासा द्यायला हवा जेणेकरून शेतकरी हा शेतात पेरलेल्या पिकांचं नुकसान होणार नाही अशीच चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांची गावागावातून व चव्हाट्यावर होत आहे.काळ्या आईच्या गर्भात नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत आहे.की पेरलेलं पीक उगतका नाही जमिनीतच सोडून जाते असे चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे. म्हणून तरी पावसाने थोडा दिलासा द्यायला हवा अशी ही आता चर्चाला उधाण आल आहे.

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी दिले रोहयो मंत्र्यांना निवेदन.


बदनापूर,ब्युरोचीफ:- तालुक्यातिल अतिवृषटी झालेल्या गावाना रो.ह.यो.मंत्री मा.संदीपानजी भुमरे साहेब भेट दिली अस्ता मनसे जालना जिल्हया च्या वतिने निवेदन दिले व तालुक्यातिल सर्व शेतकरया चे नुक़सान झालेली माहीती सांगीतली व मंत्री महोदयानी पूर्ण निवेदन वाचले व उद्याच्या क़ॅबीनेट मधे ही सर्व माहीती देउन तत्क़ाळ मदत जाहीर करतो या  दौरया वेळी सोबत मा. माज़ी मंत्री सन्नमांनिय अर्जुनरावजी भाऊ खोतकर ,आमदार नारायणरावजी कुचे साहेब,मा.आमदार संतोष जी सांबरे साहेब ,शिवसेना जिल्हा प्रमुख मा.भास्कररावजी अंबेकर साहेब,जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे साहेब,मनसे चे ज़िल्हाध्यक्ष गजानन गिते ,कॅाग्रेंस चे जेष्ट नेते भिमराव जी आबा डोंगरे साहेब , भानुदासरावजी घुगे नाना,सभापती जयप्रकाश दादा चव्हान ,भाऊसाहेबजी पाऊलबुधे ,सरपंच राजुबापू जर्हाड,शिवसेना तालुका संघटक नंदुभाउ दाभाडे,बालाभाऊ परदेशी,निव्रती महाराज डाके,शेतकरी संघटनेचे संतोष आबा चव्हान,राष्ट्रवादी चे नारायण राव अवघड़,शिवाजीराव कराड़ ,मनसे चे गोविंद काळे,तहसीलदार छ्याया ताई पवार ,व शासन प्रशासनातील सर्व अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते व पत्रकार बांधव उपस्थित होते..


जालना औरंगाबाद रोडवर सारथी पेट्रोलपंप समोर बाप लेकाचा अपघात


बापचा जाग्यावर मृत्यू तर मुलगा जखमी.

बदनापूर ब्युरोचीफ :- बदनापूर मधील पाडळी येथील साधारण कुटुंबातील आप्पा लक्ष्मण सिरसाठ व परमेश्वर आप्पा साहेब सिरसाठ हे दोघे बाप लेक जालना औद्योगिक वसाहतीत रुपम स्टील कंपनी मध्ये अनेक वर्षांपासून मजुरी कामानिमित्त दुचाकीवरून जाय ये करत असे परंतु  काल काळाने घाला घातला आणि होत्याच नव्हतं झाल.
  दि.27: वार शनिवार रोजी दोघे बाप लेक कामा वरून घराकडे येत असताना सायंकाळी 8:00 वाजता  औरंगाबाद- जालना रोडवरील महिको कंपनी च्या लगत असणारा सारथी पेट्रोपम वर दुचाकीत पेट्रोल टाकून निघाले आणि काही हाकेच्या आंतरावर हावे रोड वरती अचानक पाठीमाघून येणाऱ्या अनोळखी गाडीने धडक दिली त्यात  अप्पासाहेब लक्ष्मण सिरसाठ यांना डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर  अवस्थेत जाग्यावर मृत्यू झाला तर मुलगा परमेश्वर आप्पासाहेब शिरसाट हा  जखमी अवस्थेत असताना जालना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
अप्पासाहेब लक्ष्मण शिरसाट यांना जालना सिविल हॉस्पिटल  येथे दाखल करण्यात आले परंतु डॉ यांनी मृत्यू झाले असे सांगितले येथे पीएम करण्यात आले असता दि.28 रोजी आज सकाळी 11:30 वाजता पाडळी गावी येथे त्यांच्या पार्थिवर अंतिम संस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी दोन सुना आहे..
तर संपूर्ण पाडळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची पत्रकार परिषद संपन्न


कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा


जालना,ब्युरोचीफ :-  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती देत कोरोनाला जालना जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी जनतेने प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायजरचा सातत्याने वापर करण्याबरोबर सामाजिक अंतराचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेमधील मुद्दे

·         जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकुण संख्या 504 एवढी झाली असुन आजपर्यंत 317 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.  13 रुग्णांचा मृत्यू झाला असुन आजघडीला जिल्ह्यात 174 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

·         केवळ अर्ध्या तासामध्ये कोरोनाविषाणुने व्यक्ती बाधित आहे किंवा नाही हा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी 50 हजार किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे.

·         जिल्ह्यामध्ये अँटीबॉडी टेस्टसाठी 100 किटस उपलब्ध असुन या माध्यमातुन शास्त्रोक्त पद्धतीने  व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

·         नवीन जालन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक असुन त्यामानाने जुन्या जालन्यामध्ये संख्या कमी आहे. विनाकारण नागरिक नवीन जालना व जुन्या जालनमध्ये गर्दी करत असल्यामुळे होणारी  गर्दी टाळण्यासाठी जुन्या व नवीन जालन्याला जोडणारे पुल काही काळासाठी बंद करण्यात येत असुन या पुलावरुन केवळ रुग्णवाहिकेला वाहतुकीची परवानगी असणार आहे.

·         पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब उभारणीस मंजुरी दिली असुन या लॅबचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.  येत्या काही दिवसात लॅबचे काम पुर्ण होऊन सुसज्ज व अद्यावत अशी लॅब सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले असुन या लॅबसाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

·         कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य सेविका यांचे मनोबल कायम रहावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत या कर्मचाऱ्यांचे समुपदेश करण्यावर भर देण्यात येत आहे.

·         पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 29 दिवसामध्ये कोव्हीड हॉस्पीटलची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी 40 व्हेंटीलेटर बरोबरच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्या आल्या आहेत.  पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

·         ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

·         60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व मधुमेह, ऱ्हदयरोग, रक्तदाब यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आलेला अथवा कंन्टेन्टमेंट झोनमध्ये असतील अशा व्यक्तींना तातडीने उपचार करण्यात येणार आहेत.

·         कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायजरचा वापर अथवा साबणाने वारंवार हात धुणे या बाबींची सवय अंगिकारावी.

·         समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबर प्राणायाम, व्यायाम  सारख्या बाबींचा अवलंब करण्याबरोबरच मानसिक स्वास्थ टिकुन राहण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज.

·         पल्स ऑक्सीमीटरच्या माध्यमातुन एसपीओ2, ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो.  94 पेक्षा लेव्हल असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधावा.

·         सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली खरी माहिती द्या. जेणेकरुन आपल्याला काही त्रास असल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल.

·         जालना जिल्हयात एकुण 119 कंन्टेन्टमेंट झोन होते. त्यापैकी 37 झोन ॲक्टीव्ह असुन या झोनमधुन एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही अथवा या झोनमध्ये येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.

·         प्रत्येक कंन्टेन्टमेंट झोनमध्ये 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला असुन या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी बारीक लक्ष ठेऊन आहेत.

·         सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच नगर पालिकेमार्फत कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून १२ लक्ष रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.  तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 309 व्यक्तींवर तर दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 263 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

·         जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये हाय व लोरिस्क सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात येत आहे.

7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या। सबबीखाली शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी.


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीककर्ज मिळण्यासाठी बँकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.  परंतू संबंधितास तहसिल कार्यालयाकडून 7/12,8-अ व फेरफार नक्कल सादर करण्यासाठी बँकांकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी तहसिल कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असुन सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असुन अशा परिस्थितीत होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आदेश निर्गमित करुन सर्व सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी पीककर्जासाठी बँकेत आलेल्या शेतकऱ्यांचे 7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या सबबीखाली त्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत, तसेच अशा शेतकऱ्यांचे कागदपत्रे मिळण्यासाठी गावनिहाय यादी करुन संबंधित बँक शाखेने संबंधित तहसिल कार्यालयास खास दुतामार्फत किंवा शाखा समन्वयकामार्फत दररोज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अथवा समन्वयकामार्फत 7/12,8-अ व फेरफार नक्कलसाठी प्राप्त यादीनुसार आवश्यक ती कागदपत्रे  संबंधित बँकांना संबंधित तलाठ्यामार्फत प्राप्त करुन घेऊन नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश दिले आहे.

घडीपुस्तिकेचे रोहयो मंत्री श्री भुमरे यांच्या हस्ते विमोचन रोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


जालना,ब्युरोचीफ :- रोजगार हमी योजना विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड विषयी योजनांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे विमोचन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते अंबड तालुक्यातील पाहणी दौऱ्याप्रसंगी करण्यात आले. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने योग्य रीतीने पार पाडण्याबरोबरच योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन रोहयो मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.घडीपत्रिकेमध्ये दि. 12 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत व दि. 30 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीमार्फत रोपवन संरक्षण व संगोपनाबाबत (बिहार पॅटर्न) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  तसेच मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी पात्र लाभार्थी, वृक्षलागवड करण्यायोग्य प्रजाती, वृक्षलागवड मुदत, कलमे/रोपे पुरवठा तसेच लाभार्थ्यांची जबाबदारी इ. विषयी  व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रोपवणाचे संरक्षण, देखभाल व संगोपन विविध पद्धतीने करून जिवंत रोपांची टक्केवारी वाढविण्याचा शासनाचा उद्देश असून संगोपनाचा कालावधी, कुटुंबाच्या गटाची निवड व त्यांची कामे,  मजुरीचे निकष, रोजगाराची गणना आदीविषयी  घडीपत्रिकेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी तसेच विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, जालना यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून पहाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.


जालना,ब्युरोचीफ :- बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दि. 27 जुन रोजी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन केली.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांसमवेत आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे,भाऊसाहेब पाऊल बुद्धे, अशोक बर्डे, दिनेश काकडे, सिद्धेश्वर उबाळे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक माईनकर, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी रोहयोमंत्री श्री भुमरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांच्या सुचनेनुसार बदनापुर व अंबड तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यात आली असल्याचे सांगत पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याच्या प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येणार असुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री महोदयांनी अंबड तालुक्यातील हरतखेडा, बठाण खुर्द, बदनापुर तालुक्यातील नानेगाव, बाजार वाहेगाव वाकुळणी, धोपटेश्वर व रोशनगाव या गावांना भेटी देऊन पहाणी केली.

शनिवार, २७ जून, २०२०

शहरात अवैध तांदूळ   व गावठी दारूधंदा खुलेआम सुरू प्रशासनाचा  सोयीस्करपणे काणाडोळा

 
धर्माबाद (भगवान कांबळे) :- धर्माबाद तालुक्यासह शहरातही अवैध व्यवसायाचा धुमाकूळ सुरू आहे  पेट्रोल ,गावठी दारू, शिंदी ,अवैद्य गूटखा व अनेक अवैद्य धंदा खुलेआम सुरू आहेत.प्रशासन मात्र आपल्या  सोयीस्करपणे काणाडोळा करीत आहे. महाराष्ट्रात गूटख्यावर बंदी असुन धर्माबाद शहरात व तालुक्यात गूटखा येतोच कसा आणतो कोण गूटखा आणते वेळी प्रशासनाने चे आधीकारी जाताता कुठे सध्या तर रेल्वे गाड्या बंद आहेत व महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या  धर्माबाद शहराला जोडणा-या   तिन्हीही सिमा चेक पोस्ट बनवलेले आहेत ऐव्हढा तगडा बंदोबस्त असुन देखील शिंदी गूटखा हे शहरात येतात कसे हा देखील मोठा संशयित  प्रश्न  आहे; मात्र धर्माबाद शहरात व तालुक्यात  धंदे मात्र तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. अवैध धंदेवाल्यांनावर कारवाई केली जात नसल्याने जनतेची प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.   देशात कोरोना ची महामारी सुरू आहे  व नांदेड जिल्ह्यातील कोरोणा बाधीत रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता व राज्य सरकारच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेबांच्या आदेशानुसार  नांदेड जिल्ह्यात सकाळी 8ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या व्यवसाय करुन संध्याकाळी 5 वाजता सर्व दुकाने बंद करा आसा आदेश आहे पण 5 वाजल्यानंतर देखील  दारूविक्री चोरुन चढ्या भावाने  छुप्या पद्धतीने अवैध पद्धतीने दारूविक्रीचा काळाधंदा तालुक्यात जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक देशी व विदेशी दारूविक्रीचा धंदा करणाऱ्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू शिंदी  विक्री करीत आहे.  प्रशासन  आणि अवैद्यव्यवसाय करणा- यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.  धर्माबाद  शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे  वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे. तसेच, दारू व जुगार यामुळे अनेक घरांत कलह वाढले आहेत, धर्माबाद शहरातील काही बारचे  मालक बारच्या मागच्या दारातून  दारु बियर  प्लॅस्टिसक च्या  पिशवीत आणून सर्रास विक्री करत आहे. यामध्ये रोज लाखो रुपायांची उलाढाल होते. रत्नाळी जवळील पोचमा माता मंदिराच्या आवारात कायम तळीरामाचा अड्डा असतो. या परिसरात सर्वत्र रिकाम्या दारूच्या बाटल्या व गावठी दारु रिकाम्या झालेल्या पिशव्या शिंदी  पडल्या आहेत.  शासनाने गरिब जनतेला तिन महिने मोफत  कोपीन वाटप करा आसा आदेश दिले पण कोपीन दुकानदार मात्र कमी वाटप करुन मापात पाप केले आहेत व करत आहेत   शासनाने  धर्माबाद ला राशन (कोटा) पाठवले खरे पण कोपीन वाटप करणारे हे प्रशासनाच्या  अधिका-यांशी हात मिळवणी करुन हजारो किंन्टल तांदूळ  हे शहरातील अनेक राईस मील ला पाठवत आहेत व  त्याच तांदूळाला पाॅलीस करुन जनतेला चढ्या भावाने विक्री करत आहेत.  धर्माबाद शहरात तेलंगण्यातुन चोरट्या रस्ताने येत आसलेला तेलंगण्यातील तांदूळ विक्री करण्यासाठी  खुर्ची टाकून खरेदी चा  व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे.हे दारु विक्रेता  व अवैद्य तांदूळ खरेदी करणारे भुसार दुकानदार हे  धनदांडगे व त्यांचे राजकीय लोकांचा नातेवाईक असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार देत नाही. खुलेआम चालणारा धर्माबाद तालुक्यातील अवैद्य  व्यवसाय व गावठी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे शासन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कायदा करते, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत मात्र सखोल चौकशी होत नाही. त्यामुळे अशा धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व तालुक्यातील आसलेल्या कार्यालयातील काही अधिकारी सोडले तर अधिकारी आर्थिक तडजोडी शिवाय कामाची फाईल पुढे सरकत नाही. सामान्य नागरिकांनी मदत मागावी कोणाकडे या संभ्रमात आहे.

रासायनिक खत माफिया नामांकित कंपन्यांच्या खातात भेसळयुक्त,खत निर्माण करून. शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. या रासायनिक खत माफियांना कृषी अधिकाऱ्यांचे व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठबळ सहकार्य करत असल्यामुळे यांच्यावर सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे - प्रकाश सोळंके


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षा पासून रासायनिक खत माफिया शेतकऱ्यांना फसवत आहेत. रासायनिक खत माफियांना कायमस्वरूपी काळाबाजार बंद हवा. यासाठी खासबाब म्हणून एक वर्षासाठी पोलिसांना अधिकार द्यावेत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षा पासून रासायनिक खत माफिया भेसळयुक्त रासायनिक खत शेतकऱ्यांना विक्री होत असल्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रासायनिक खतात भेसळ करून विक्री रासायनिक खत माफिया जालना जिल्ह्यात खुप वर्षापासून सक्रिय आहे. या रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या मालकीच्या काही रासायनिक खत निर्माण करणाऱ्या कंपन्या मालकीच्या असल्यामुळे, नामांकित रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ प्रक्रीया यांच्या मालकीच्या कंपनी मध्ये भेसळ करून हे भेसळयुक्त बोगस विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध असते. यांच्याच संबंधातील जवळच्या लोकांना नामवंत कंपन्याच्या अधिकृत (डीलरशिप) भेटल्यामुळे या रासायनिक खताच्या बॅगमध्ये सहज भेसळ करून अनेक वर्षापासून हे भेसळयुक्त रासायनिक खत माफिया खत विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.या रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ होत असल्याची संपूर्ण माहिती नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना व कृषी अधिकाऱ्यांना माहिती असेल परंतु हि यंत्रणा रासायनिक खतात भेसळ करून विकणाऱ्या टोळी कडे  दुर्लक्ष आहेत. रासायनिक खत भेसळ करणाऱ्या टोळीचे व नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रीत्यांच्या आर्थिक संबंध आसल्यामुळे भेसळयुक्त रसायन खत माफिया सहज विक्री उपलब्ध करून विक्री करतात.तसेच भेसळ रासायनिक खत विक्री करण्यात मोठमोठ्या नामवंत कंपन्यांच्या खताच्या बॅगमध्ये भेसळ करून जशास तसे लेबल सील करून अधिकृत विक्रेत्या मार्फत विक्री होते. उदाहरणार्थ: ही टोळी भेसळ कशी करते एखाद्या नामवंत कंपनीची खताची बॅग ५० किलो वजनाचे असते. त्या बॅगमध्ये २५ मूळ मात्रा असल्याले खत ठेवतात व २५ किलो खराब दाणेदार खत किंवा वाळु मिश्रण करून जशास तसे लेबल सील करून भेसळयुक्त रासायनिक खत विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध होते.म्हणून प्रत्येक चांगल्या नामवंत कंपनीच्या खतात भेसळ करतात कारण या नामवंत कंपनीच्या खताला शेतकऱ्यांची मोठी मागणी असते. याचा गैरफायदा घेऊन हि टोळी खत मिश्रण करून कोट्यावधी रुपयांची कमाई करुन घेतात. या खत माफिया यांना कृषी अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे खत माफिया कोणालाही काही जुमानत नाहीत.म्हणून या वर्षी रासायनिक खताचे प्रत्येक डीलरच्या गोडाऊन मधून सॅम्पल घेऊन ५ ठिकाणी क्रॉस तपासणीसाठी पाठवावेत. या रासायनिक खत माफियांचा काळ्याबाजाराला आळा बसेल. रासायनिक खतांचा बॅग भेसळ असते हे कधीच कोणाच्या लक्षात येण्यासारखा नाही.कारण बिचारा शेतकरी विश्वासाने रासायनिक खत खरेदी करून सरळ शेतात घेऊन जातो, म्हणून याची कोणाच्याही मनात शंका पण येत नाही. खत माफिया रासायनिक खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून.  खत माफिया रासायनिक खताचा काळाबाजार सुरू करतात.पण या मध्ये सगळ्यात जास्त नुकसान मोठे शेतकर्‍यांचे होते.कारण  शेतकरी अधिकचे पैसे देऊन शेतकरी खत माफियांच्या जाळ्यात गुतुन जातो. हे खत माफिया अनेक वर्षापासून रसायनी खताचा काळाबाजार चालवत आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळ्या घराण्यातील मुख्यमंत्री मिळाल्यामुळे आपल्याकडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वेगळी अपेक्षा आहे. एक वर्षासाठी भेसळयुक्त रासायनिक खत विक्रीवर करणाऱ्या रासायनिक खत माफिया टोळीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयोगिक तत्वावर खासबाब म्हणून पोलीस यंत्रणेकडे अधिकार द्या.या रासायनिक खतावर नियंत्रण ठेवणाऱ्या कृषी अधिकारी व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सरकारमार्फत दाखल करण्यात यावेत. रसायनिक खताच्या सर्व डीलर यांच्या गोडाऊन मधून सॅम्पल घेऊन ठिकाणी क्रॉस तपासणीसाठी पाठवावे. खत माफिया जिल्हा कृषी अधिकारी यांची निडर सक्षम, निस्वार्थी अधिकारी व पोलीस चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना निवेदना मार्फत केली आहे.


अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या तसेच वारंवार निवेदन तक्रारी देऊन, देखील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई न करता. अवैध वाळु, मुरुम ,दगड, चोऱ्या करणाऱ्या माफिया यांच्यावर कारवाई  करणार्या  बेजबाबदार मंठा तहसीलदार यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी- प्रकाश सोळंके

  

जालना, ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आपल्याच महसूल विभागाचे अधिकारी कुठेतरी आपल्या विभागाला मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत .असाच एक प्रकार म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील भ्रष्टाचारी तहसीलदार यांच्या कडुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या न जाता. तालुक्यात अवैध धंदे करणार्या लोकांच्या वर कारवाई करण्याऐवजी सर्वार्थाने अप्रत्यक्षपणे सहकार्य करित आहे. यात मंठा तालुक्यातील तळणी मंडळ अधिकारी सज्जा अंतर्गत तसेच गोसावी पांगरी सज्जा अंतर्गत  येणाऱ्या नदीपात्रातून वाळु उपसा बेसुमार केल्या जात आहे. पुर्णा नदीपात्रातून लिलाव झालेला नसताना देखील राजरोसपणे वाळु चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचे अणेक वेळा मंठा तसीलदार यांना सबळ पुरावे यांना दिलेले असताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांच्या कडुन रेती माफिया विरुद्ध कारवाई केली जात नाही. या अधिकाऱ्यांचे संबंधित रेती माफिया यांच्या बरोबर हफ्ते खाऊ धोरण नेहमीचे असल्याने कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे हायवा, टिपर टकटर द्वारे वाळु बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, या परिसरातील भागात विक्री केली जाते, तसेच जालना, परतुर, अंबड, इतर ठिकाणी जाते. या दोन्ही तालुक्यात वाळूमाफियांनी वाळूचा साठा करून.हायवा,टिपर, टकटर , एका हायवा ची किंमत ३५ ते ४० आहे. ही वाहने भरायला मजूर असतात. वाहनांचे इतर ठिकाणी जाणे-येणे असल्यामुळे कोरोना रुग्ण वाढू शकतात म्हणून.मंठा तालुक्यातील नागरिकांमध्ये भिंतचे वातावरण पसरले आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी  महसुल विभागाचया वतिने व्यवस्था करण्यात हलगर्जीपणा केला .गावात तलाठी,मंडळ अधिकारी असताना मंठा तालुक्यातील ९०% ठिकाणी कार्यालय फक्त कागदावरच अधोरेखित केले आहे. वस्तुस्थिती मध्ये मंडळ अधिकारी तलाठी कार्यालय अस्तित्वात नाही. हि बाब सत्य आहे. यामुळे मंठा तालुक्यातील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेरुन आलेल्या लोकांची तलाठी मंडळ अधिकारी गैरहजर असल्याने गैरसोय झाली होती.यामुळे गावात येणार्या लोकांना कवारनटाईन करण्याचे शासनाच्या आदेशानुसार कामकाज होत नसल्याचे चित्र होते, जिल्हाधिकारी जालना यांनी गावपातळीवर कृति समिती गठीत केली आहे त्याचे अध्यक्ष तलाठी आहेत. स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडुन काळाबाजार रोखण्यासाठी माञ तलाठी धान्य वाटप करताना गैरहजर असतात, तलाठी मंडळ अधिकारी सज्जा ठिकाणी निवासी न राहता जालना, औरंगाबाद, लोणार , परभणी अशा ठिकाणी राहतात यामुळे तलाठी मंडळ अधिकारी असुन नसल्याचे गत आहे. अनेक तलाठी वाळू घाटात १० वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांची बदली झाली नाही. मागे पाणी टंचाई निर्माण झाली होती यांवर उपाययोजना तहसीलदार यांच्या कडुन केल्या गेलेल्या नव्हत्या. सर्व मंठा तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे होत आहे. तसेच शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या कामामध्ये करोडाचा मुरुम मेघा इंजिनिअरिंग कंपनी हैदराबाद यांच्या कडुन चोरी केला गेला यास जबाबदार मंठा तहसीलदार यांनी कारवाई केली नाही. विशेष म्हणजे शासनाच्या परिपञका प्रमाणे गायरान जमिनीवर उत्खनन मुरुम बेकायदेशीर आहे, माञ मेघा इंजिनिअरिंग कंपनी हैदराबाद यांच्या कडुन उत्खनन केले गेले परंतु तहसीलदार यांनी अप्रत्यक्षपणे सहकार्य करुन मेघा इंजिनिअरिंग कंपनी ला सहकार्य करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वर तहसीलदार यांचा अंकुश नसल्याने तलाठी मनमर्जी कारभार करित आहे. याचा परिणाम मंठा तालुक्यातील नागरिकांना भोगावा लागत आहे. यामुळे  साहेब आपण या विषयांचे गांभिर्याने दखल घ्यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसीलदार मंठा यांच्या विरुद्ध कारवाई करुन त्यांना तातडीने निलंबित करुन‌.मंठा तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून तसेच साहेब जशी आपली प्रतिमा स्वच्छ आहे तसाच आपला महसूल विभाग देखील स्वच्छ करावा आशा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यावर कारवाई करून. १० वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या मंठा तालुक्यातील मंडळा आधिकारी व तलाठी यांच्या जालना जिल्ह्यात इतर ठिकाणी बदल्या कराव्यात यामुळे काळ्या धंदेवाल्यांना आळा बसेल. म्हणून बदली करून कारवाई  करावी अशी मागणी
प्रकाश सोळंके महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जिल्हाध्यक्ष जालना यांनी. महुसलमंत्री यांना निवेदना मार्फत केली आहे.


प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्याला वंचितचा दणका,गावकाऱ्यांसमोर मागितली माफी

लातूर,ब्युरोचीफ :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबूक च्या माध्यमातून टीका करण्यात आली होती. मसलगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर या ठिकाणी राहणारा प्रवीण जाधव या तरुणाने  फेसबुकवर बाळासाहेबांबद्दल वादग्रस्त टीका केली होती. याची माहिती मिळताच लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष युवराज योगी यांनी संबंधित तरुण राहत असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधला. पोलीस पाटील, सरपंच त्या मुलाचे वडिल या व्यक्तींना फोनवरून घटनेची माहिती दिली. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी प्रवीण जाधवला गावासमोर बोलावून घेतले. गावातील लोकांनी प्रवीण जाधवला जाब विचारून व्हिडिओ तयार करून माफी मागायला सांगितली. फेसबूकच्या माध्यमातून जी टीका केली त्या गावचे पोलीस पाटील सरपंच आणि सर्व गावातील मंडळीं समोर प्रवीण जाधव याने व्हिडिओ तयार करून बाळासाहेबांची माफी मागितली. लातूरच्या सर्व कार्यकर्त्यानी फेसबुकवर बाळासाहेबांच्या विरोधात पोस्ट पाहिल्यानंतर रात्रभर प्रवीण जाधवची माहिती घेऊन सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाईला सुरवात केली, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच प्रवीण जाधव आणि गावकऱ्यांनी माफी मागितल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. लातूर निलंग्यातील वंचित बहुजन आघाडी तसेच भारिप बहुजन महासंघाचे सर्व कार्यकर्ते यांनी या मुजोर प्रवीण जाधवला धडा शिकवला.


उपचारास डॉक्टरांचा नकार, वंचितचे स्वखर्चाने केली मदत


परभणी,ब्युरोचीफ :- हात व पाय मोडलेल्या अवस्थेत डॉक्टरांची मदत मागणाऱ्या दोन महिलांना कोणीही मदत करीत नाही. या महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना करतात पण कोणीही त्यांना मदत करायला पुढे येत नाही. अश्यातच वंचितच्या कार्यकर्त्यांना याबाबत फोन येतो. माहिती मिळते आणि काही मिनिटातच कार्यकर्ते हॉस्पिटल मध्ये धाव घेऊन या महिलांना सर्वोतोपरी मदत करतात. हा सर्व प्रकार परभणी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला असून अनेकांनी माणुसकी सोडली असली तरी वंचितच्या कार्यकर्त्यानी केवळ एका फोनवर रुग्णालयात येऊन मदत केली. आजही माणुसकी जीवंत असल्याचे वंचितच्या कार्यकर्त्यानी दाखवून दिले.


वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्तचे राज्य समन्वयक डॉ. धर्मराज चव्हाण यांना माहिती  मिळाली की दोन महिलांना डॉक्टरची मदत हवी आहे, एका महिलेचा पाय तर दुसऱ्या महिलेचा हात मोडला असून या दोन्ही महिलांना कोणीही मदत  करायला तयार नाही. टाकळी येथील मातंग समाजाची महिला हात मोडलेल्या अवस्थेत रुग्णालयाबाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागते डॉक्टरही तिला मदत करीत नाही.  तोपर्यंत वंचितचे कार्यकर्ते धर्मराज चव्हाण  सिद्धार्थ कांबळे, संपत नंद, अरुण गिरी, अशोक चंद्र मोरे, बी. आर. आव्हाड हे रुग्णालयात येतात त्या महिलेला कोरोना आहे की नाही याची काळजी न करता संबंधीत महिलेला रुग्णालयात दाखल करून तिच्या उपचाराचा सर्व खर्च स्वतः करतात. दुसऱ्या महिलेचा पाय मोडल्याने तिलाही मदत करून सर्व खर्च वंचितचे कार्यकर्ते करतात. दुसऱ्या दिवशी डॉ. धर्मराज चव्हाण व कार्यकर्त्यानी रुग्णालयात दोन्ही महिलांना भेट देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. शिवाय त्यांना आर्थिक मदतही केली. ही मदत तुम्हाला बाळासाहेबच्या वंचित बहुजन आघाडीने केली आहे,असे सांगितल्यावर त्या महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते...


जिल्ह्यात 37 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 16 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- शहरातील खडकपुरा परिसरातील 06, सुवर्णकार नगर परिसरातील 04, मंगळबाजार
01,खरपुडी नाका 01, जिल्हाधिकारी कार्यालयातील 01, राजेंद्र प्रसाद रोड, बडी सडक 01, भोकरदन शहरातील 02, अशा एकुण 16 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर श्री कॉलनीतील 07, गुडलागल्ली 05, कृष्णकुंज 01, दानाबाजार 02, जुना जालना 01, मंगळबाजार 01, कोष्टी गल्ली 1, कडबी मंडी 1, माऊलीनगर 01, बगडीया नगर 01, बागवान मस्जिद 01, कोठारी नगर 01,वाटुरफाटा येथील 01,  जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 12, रोकडा हनुमान परिसर भोकरदन 01 अशा  एकूण 37  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3941 असुन  सध्या रुग्णालयात-117,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1520, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–109, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5005, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–37 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-462, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4429 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-110, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1390.14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1252, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-38, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-239, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-117, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-55, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-16, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-317, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -123, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-09, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-11815, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे. आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 239 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_08,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-18,मॉडेल स्कूल परतुर-05,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-10,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-16, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-09,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 00, जे बी के विद्यालय टेंभुर्णी 28, शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 30, ज्ञानसागर विद्यालय जाफ्राबाद 13. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 886 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 17 हजार 630 असा   एकुण 4 लाख 44 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  


पेट्रोल - डिझेल दर वाढ विरोधात काँग्रेस पक्षाचे सोमवारी आंदोलन


जालना (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय काँगे्रस कमिटीच्या वतीने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचा वाढविलेला दर मागे घेण्यासाठी देशभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अनुषंगाने दि. 29 जून सोमवार रोजी सकाळी 11. 30 वा. जुना जालना गांधी चमन येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे.केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे अन्यायकारक दर वाढविल्यामुळे त्याचा माल वाहतूकीवर मोठा परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे. यामुळे जनसामान्याचे सगने कठीण बनले आहे. केंद्र सरकारने इंधन दर वाढ ताबडतोब मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, राम सावंत, राहुल देशमुख, विमलताई आगवाले, विजय जर्‍हाड, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, गुरूमीतसिंग सेना, शेख शमशु आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.


जालना,प्रतिनिधी :- राष्ट्रवादी भवन जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी मा.नंदकिशोर जांगडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तसेच राजेंद्र जाधव युवक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ज्ञानेश्वर धानोरे , (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)  दशरथ तोडुळे, कुणाल शिरसागर , प्रा .शिंदे सर आदी उपस्थित होते


समाजभान नावाने फेसबूक आयडी तयार करून पैसा लुटणार्‍याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी

जालना (प्रतिनिधी):- सामाजिक कामासाठी समाजभान नावाने विविध फेसबूक आयडी तयार करून ऑनलाईन पध्दतीने पैसा गोळा करण्याचे काम केले जात असून संबंधीतांविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलिस निरिक्षक अंबड, व पोलिस अधिक्षक जालना, सायबर क्राईम, जालना यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, देशाला लागलेला महारोग भ्रष्टाचार रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध पध्दतीने जनजागृतीद्वारे आम्ही प्रयत्न करीत आहोत. भ्रष्टाचार करण्याच्या विविध पध्दती आहेत हे आम्हाला समाजभान नावाने लक्षात आले. दादासाहेब थेटे हे शिवाजी प्राथमिक शाळा, इंदिरानगर झोपडपटटी पाण्याचे टाकी खाली शाळेत शिक्षक आहेत मी पण एक शिक्षक असून शाळेच्या गुणवत्ता करिता मुलींच्या शिक्षणाकरिता, शिक्षकांचे प्रशिक्षण, योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार, विविध शासकीय उपक्रम राबवून आदर्श काम उभे केले आहे. तसेच सर्व राष्ट्रीय उपक्रमांत प्रशासकीय आदेशान्वये अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक उपक्रमात भाग घेवून सर्वसामान्य लोकांना सोबत घेवून पर्यावरण तसेच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कोटयावधीचा प्रशासकीय तसेच सामाजिक संस्थाकडून निधी मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करून जलक्रांती करिता वेळप्रसंगी सत्याग्रह करुन जलसंवर्धनाची कामे करण्यासाठी सहभाग घेऊन आदर्श कामासाठी सदगृहस्थांची टीम बनवून भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराला विरोध करून जनतेला न्याय देण्यासाठी विविध आंदोलन, सत्याग्रह केले. परंतू थेटे हे या जमा केलेल्या पैशातून बॅनर लावून जाहिरातबाजी करत आहे. ज्यातून समाजाला कुठलाही फायदा नाही असे राजकीय पुढार्‍यांचे कार्यक्रम घेत असल्याचे निदर्शनास आल्याने हा पैसा कोठून व कसा जमा करत असेल त्याचा तपास करायला सुरूवात केली. दिनदुबळ्यांचा कैवारी गोरगरीबांचा मसिहा असल्याचे चित्र निर्माण करून प्रभाव पाडण्यासाठी फेसबूकवर बोगस नावाने अनेक अकाउंट उघडून ऑनलाईन पध्दतीने पैसा मागणी करत असल्याचे मला कोव्हीड - 19 च्या संचारबंदी काळात गरजुंना अन्नधान्य दान करण्याच्या कार्यात लक्षात आले. 200 ते 300 लोकांना जालन्याहून खिचडी आणायची आणि आठशे लोकांना वाटली असे खोटे सांगुण लोकांना पैशासाठी आवाहन करायचे यामुळे मला यांच्या सामाजिक कार्यात भ्रष्ट विचारांची खात्री पटली. सामाजिक कार्यकर्तेच्या बैठकीत विनंतीही केली होती की सामाजिकार्यात दुकानदारी करू नाही. परंतू अंबड तालुक्यात नौकरीला असतांना त्यांच्या शाळेवर व्हीजीट केली होती दोन्ही वेळेला प्रार्थनेला उपस्थित नसल्याचे व उशीरा आल्याचे निदर्शनास आले. गुणवत्तेच्या दृष्टीने विशेष असे काहीच हालचाल असल्याचे दिसून आले नाही. आणि आज ही काही शाळेत विशेष लक्ष असल्याचे दिसून येत नाही. सामाजिक कामा निमित्ताने निस्ते बाहेर लक्ष असल्याने ज्याठिकाणचा पगार सुरू आहे त्याठिकाणी 100 % जीव ओतून काम न करता फक्त पगार पुरते काम कुरून एकप्रकारे शाळेच्या कामात फक्त हजेरी लावून गणवतेत कमी राहणे आणि बाहेर सामाजिक कामासाठी पैसा मागणी करून जमा झालेल्या पैशातून 50 % खर्च करायचा असे प्रकार करत असल्याचे दिसून येत आहे. असेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे. यावेळी निवेदनावर देवा चित्राल, अ‍ॅड. आशा गाडेकर, चंद्रकांत आढाव, अंकुश चव्हाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 


गुटखा माफियावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा - पत्रकार सुरक्षा समितीची मागणी


जालना / प्रतिनिधी :- पत्रकार दै.जंग चे शेख मुसा गेल्या 15 ते 20 वर्षापासुन पञकारिता क्षेञात असुन,जिवाची कसलीही तमा न बाळगता सत्य आणि निर्भिड पञकारीता करत आले आहे,या दरमियान त्यांना अनेक वेळा गुंडा करवी धमक्या मिळाल्या आहेत,सध्या मानवी आरोग्यास घातक अशा प्रतिबंधित गुटखा विषयी लिखाण करत असतांना गुटखा माफीया सतिष जैस्वाल यांचा भाउ नामे उमेश जैस्वाल यांने शेख मुसा याच्या एका मिञा कडे फोनवर संभाषण केले की,एस पी कितने दिन का है,दो ढाई महीने उसके बाद तो हम ही है,उसको पांच हजार देने के बजाये पांच लाख देकर हमेशा की किटकिट खत्म कर देंगे अशी गर्भित आणि पाच लाखात सुपारी देवुन कायमचा काटा काढण्याची भाषा केली आहे.सध्या सतिष जैस्वाल वर 10-12 गुन्हे असुन त्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे माञ आपल्या विभागातील काही कर्मचारी व अन्न, औषध आणी भेसळ विभागाचे अधिकारी त्यां माफीयास पाठीशी घालत असल्याने शेख मुसा यांनी संदर्भातील बातम्या त्यांच्या हिंदी दैनिक वैचारिक जंग मध्ये प्रकाशित करत असल्याने त्याने ही धमकी दिली आहे. या गुटखा माफिया वर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार सुरक्षा समिती (महाराष्ट्र राज्य)जालना जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर जिल्हाध्यक्ष तथा साय दै.राजुरेश्वर चे जिल्हा प्रतिनिधी गोपाल त्रिवेदी,एम सी एन न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी सुयोग खर्डेकर, गदिर टाइम्स चे संपादक खलील खान,एस बी एन न्यूज चे राहुल मुळे,सा. लोकधिकारचे सय्यद अफसर, दै.कालदण्ड चे संपादक शेख चांद पी.जे.,एम सी एन न्यूज चे सुनील खरात,प्रेस फोटोग्राफर जावेद तांबोली, सा. लोकधिकारचे शब्बीर पठाण,जालना न्यूज टाइम्स चे गौरव बुट्टे, सा. घानेवाडी दर्पणचे संपादक शिवाजी बावणे,दै.आणीबाणीचे सीताराम तुपे,दै.आनंद नगरीचे तुकाराम पिठोरे, दै.पुण्य नगरीचे बाबासाहेब म्हस्के,दै.पल्लवरंग चे संपादक अमित कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली असताना जालना येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक - विक्री केली जाते. जालना येथील ' दैनिक वैचारिक जंग' या हिंदी भाषिक वर्तमापत्राचे आवृत्ती संपादक शेख मुसा यांनी गुटखा विक्रीच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे त्यांना येथील गुटखा मफिया सतीश जैस्वाल यांच्या भावाने पत्रकार मुसा यांच्या मित्राकडे जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली असून याबाबत पत्रकार शेख मुसा यांनी शुक्रवारी ( दि.२६ ) पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना निवेदन दिले आहे.
     याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात पत्रकार शेख मुसा यांनी म्हटले की, दैनिक वैचारिक जंग या वृत्तपत्रातून मी अवैध गुटखा विक्रीबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. मानवी आरोग्यास घातक असल्याने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीबाबत लिखाण करीत असल्याने येथील गुटखा माफिया सतीश जैस्वाल याचा भाऊ उमेश जैस्वाल याने माझ्या एका मित्राकडे धमकी दिली आहे. पाच लाख रुपयांची सुपारी देऊन माझा काटा काढण्याची भाषा या क्लिप मध्ये वापरण्यात आली आहे.हा  गर्भित इशारा या गुटखा माफियाच्या भावाकडून मला देण्यात आला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

     चौकट : -
...तरीही मोक्का नुसार कारवाई आवश्यक
या निवेदनात पत्रकार शेख मुसा यांनी संबंधित गुटखा माफिया सतीश जैस्वाल याच्या विरोधात जालना शहरातील सदर बाजार, कदीम जालना ,चंदन झिरा पोलीस ठाण्यात ३२८, २७२,२७३,१८८ या कलमानुसार तब्बल आठ गुन्हे दाखल असून न्यायालयात चार खटले दाखल आहेत. त्यानुसार त्याच्यावर मोक्का / एम पी डी ए कायद्यानुसार तडीपारीची कारवाई होणे आवश्यक होते. मात्र, तो आजही जालना जिल्ह्यात खुलेआम गुख्याची विक्री करून नागरिकांचे आरोग्य बिघडवित आहे. कारवाईस्तव हे निवेदन पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे सादर करण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.


'एस पी कितने दिनका हैं.. दो ढाई महिने' !
पत्रकार शेख मुसा यांना दिलेल्या धमकीच्या या ऑडिओ क्लिप मध्ये पुढील संवाद आहे.
'एस पी कितने दिनका हैं.. दो ढाई महिने' ! तो हम ही हैं... इसको पाच हजार देने के बजाय पाच देकर इसकी किट किट ही खतम कर देंगे '..अशा शब्दात ही
धमकी पत्रकार शेख मुसा यांच्या   मित्राकडे दिल्याचे मुसा यांनी सांगितले.


गुटखा माफियावर मोक्का लावा पोलीसांनी तात्काळ कारवाई न केल्यास जशास तसे उत्तर देऊ - अभयकुमार यादव


जालना (प्रतिनिधी) :- राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली असताना जालना येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक - विक्री केली जाते. जालना येथील हिंदी भाषिक वर्तमापत्राचे आवृत्ती संपादक शेख मुसा यांनी गुटखा विक्रीच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे त्यांना येथील गुटखा मफिया सतीश जैस्वाल यांच्या भावाने पत्रकार मुसा यांच्या मित्राकडे जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
या धमकीची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली असून याबाबत पत्रकार शेख मुसा यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिलेलली असून याप्रकरणी पोलीसांनी तात्काळ दखल घेवून जैस्वाल यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा जैस्वालला जशास तसे उत्तर देऊ असे आव्हान जालना जिल्हा साप्ताहिक संपादक संघाचे अध्यक्ष अभयकुमार यादव यांनी केले आहे.


परतुर तहसील कार्यालयाकडून  शेतकऱ्यांना 20 मिनिटात मिळतंय नक्कल

शेतकऱ्यांनी तहसीलदार चित्रक यांचे मानले आभार



परतुर /प्रतिनिधी इम्रान कुरेशी
तालुक्यातील पिक कर्ज साठी लागणारे जूने 7/ 12 नक्कल फेरफार अवघ्या 20 मिनटाच्या अत देवून एक अनोखा उपक्रम नोदविला आहे .
अर्ज देवून जे नक्कल 7 दिवसाच्या कालवदी लागत होता.
पण परतूर तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून
तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक यांनी शेतकऱ्यांना अवघ्या 20 मिनटात 7 /12 नक्कल मिळण्या साठी तातडीने  4 कोतवाल यांना भूमि अभिलेख कक्षात पाठवून कोरोनाच्या विषाणु प्रादृभावच्या मोठा धोका असताना  एक चांगला निर्णय घेतला म्हणून संपूर्ण परतुर तालुक्याचे शेतकरी यांनी समाधान व्यक्त करत श्रीमती रूपा चित्रक यांचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया:- 1) आम्हाला पीक कर्जासाठी नक्कल चे प्रमाणपत्र लागत असलेले तहसील कार्यालयात अर्ज केला अवघ्या 20 मिनिटात मला नक्कल प्रमाणपत्र मिळाले.

सुरेश भोसले, शेतकरी


2)बँक मध्ये सध्या खूप गर्दी आहे.पीक कर्जासाठी 7/12 नक्कल आवश्यक असल्याने तहसील कार्यालयात अर्ज केला मला काही वेळात फेरफार नकलीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले.माझे काम वेळेवर झाले.
विलास गायकवाड ,शेतकरी

क्रांतिगुरु लहुजी साळवे विकास परिषद  आघाडीच्या तालुका युवक अध्यक्ष  पदी महेश भैय्या झाडे यांची निवड 
...........................................
सिरसदेवी /शाम अडागळे: काल दि. २६ जून रोजी क्रांतीगुरु लहुजी साळवे विकास परिषद गेवराई तालुका युवक अध्यक्ष पदी महेश भैय्या झाडे यांची निवड करण्यात आली. मा. विजयसिंह पंडित साहेब बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. मा. विजयसिंह पंडित साहेब  यांनी महेश भैय्या झाडे यांचा सत्कार केला व पुडील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय चांदणे( प्रदेश उपाध्यक्ष), प्रदीप थोरात (बीड जिल्हा अध्यक्ष), नंदकुमार झाडे ( प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष), प्रा. राजेंद्र अडागळे ( प्रहार संघटनेचे जिल्हा कार्या अध्यक्ष), महेश सावंत ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते) ,व राजाभाऊ जगताप हे उपस्थित होते.

गुरुवार, २५ जून, २०२०

आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी -  देवानंद चित्राल



जालना (प्रतिनिधी):- शहरातील कुंडलिका नदी पात्राच्या दोन्ही बाजुला जालना पलिकेने  सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर असलेल्या (डी.पी.आर.) आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी सफाई अभीयान राबविणार्‍यांच्या वतिने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. याविषयी सामाजीक कार्यकर्ता देवानंद चित्राल यांच्यासह अनेकांच्या सहिने निवेदन देण्यात आले.समस्त महाजन ट्रस्ट आणि लोकसहभागाने जालना शहरातील कुंडलिका नदी पात्राची सफाई आणि खोलीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची सर्व सामान्यांकडुन कौतुक तसेच समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडल्या जाते त्यामुळे पात्रात पुन्हा पुन्हा घाण होउन स्थिती जैसेथे होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात घाण-सांडपाणी  न सोडता शासकीय गॅझेट मधील नकाशा प्रमाणे नदीपात्राची दोन्ही किनारे मोजणी करुन नकाशातील रुंदी नुसार मार्कींग करणे, तसेच नदीपात्रात कायमस्वरुपी सिमारेषा आखणे आणि वृक्षारोपासाठी जागा निश्चित ‍करुण देणे तसेच पात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी निदेवदनाद्वारे जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.या निवेदनावर देवानंद चित्राल, शिवशंकर गायकवाड, बालू चाटला, रामेश्‍वर इंदलकर, कैलास फुलारी, वैजयंती मद्दलवार, संदिप वाधमारे, विनोद यादव, अदिंची नावे आहेत.


आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी -  देवानंद चित्राल



जालना (प्रतिनिधी):- शहरातील कुंडलिका नदी पात्राच्या दोन्ही बाजुला जालना पलिकेने  सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर असलेल्या (डी.पी.आर.) आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी सफाई अभीयान राबविणार्‍यांच्या वतिने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. याविषयी सामाजीक कार्यकर्ता देवानंद चित्राल यांच्यासह अनेकांच्या सहिने निवेदन देण्यात आले.समस्त महाजन ट्रस्ट आणि लोकसहभागाने जालना शहरातील कुंडलिका नदी पात्राची सफाई आणि खोलीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची सर्व सामान्यांकडुन कौतुक तसेच समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडल्या जाते त्यामुळे पात्रात पुन्हा पुन्हा घाण होउन स्थिती जैसेथे होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात घाण-सांडपाणी  न सोडता शासकीय गॅझेट मधील नकाशा प्रमाणे नदीपात्राची दोन्ही किनारे मोजणी करुन नकाशातील रुंदी नुसार मार्कींग करणे, तसेच नदीपात्रात कायमस्वरुपी सिमारेषा आखणे आणि वृक्षारोपासाठी जागा निश्चित ‍करुण देणे तसेच पात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी निदेवदनाद्वारे जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.या निवेदनावर देवानंद चित्राल, शिवशंकर गायकवाड, बालू चाटला, रामेश्‍वर इंदलकर, कैलास फुलारी, वैजयंती मद्दलवार, संदिप वाधमारे, विनोद यादव, अदिंची नावे आहेत.


दलित बहुजनांची दिशाभूल करून दलाली करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची बुध्दी भ्रष्ट धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही  - शरद अडागळे

जालना,ब्युरोचीफ :- दलित मागासवर्गीय बहुजन समाजाची दिशाभूल करून आरक्षणाची खोटी आश्वासने देऊन दलाली करणाऱ्या व नुकतेच आमदार झालेल्या व्यक्तीने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर टिका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची बुध्दी भ्रष्ट झाली असून त्याला मागासवर्गीय व बहुजन समाजाने धडा शिकवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते शरद अडागळे यांनी आज व्यक्त केले .मुळामध्ये पडळकर हे काही दखल देण्याच्या लायकीचे नेते नाहीत.बारामतीमध्ये अजितदादाच्या विरोधात डिपाॅझिट वाचवू न शकलेल्या बिनअकलीच्या कांद्याने फुकट तोंड वाजवण्याने लोकांचे फार तर काही वेळ फुकट मनोरंजन होऊ शकते. गोपीचंद पडळकर हे  दलाल असुन स्वतःच्या  फायद्यासाठी दररोज काहीना काहि उचापती करण्याचा त्यांचा धंदा आहे नेहमी माकडा सारख्या कोलांट्या मारणाऱ्या आरेवाडी च्या बणात बिरोबाची  खोटी शपथ घेवून पडळकर यानी धनगर समाजाच्या लोकांना डावावर लावून आमदारकी मिळवली   त्यामुळे त्यांना धडा शिकवला पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शरद अडागळे यांनी समाज माध्यमांवर व्यक्त करून जाहीर निषेध केला

सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त, लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले - प्रकाश आंबेडकर


सोलापूर,ब्युरोचीफ :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डिझेल व पेट्रोलचे भाव उतरले असताना भारत देशात मात्र त्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगारांचे सरकार आहे. खडखडाट असलेली तिजोरी भरण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले जात आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कोरोना हा देशात इम्पोर्ट म्हणजेच आयात केलेला जिवाणू आहे. ज्या कुटुंबात कोविडने बळी गेला असेल, त्या कुटुंबीयाने पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी लोकांना बंदी घालण्याऐवजी त्यांना परवानगी दिली. वास्तविक पाहता त्यांना मनाई करण्याची सूचना होती. तरीही त्यांना भारतात येऊ दिले. त्याचा फटका या देशाला बसला असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

    लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांच्या व्यवसायावर बंदी आली. आवश्यक असलेल्या वस्तूंचा व्यवसायच ठप्प झाला. बारा बलुतेदार व्यावसायिकांची उपासमार झाली. त्यांना काहीही दिले नाही. केंद्र सरकारच्या वीस लाख कोटीच्या पॅकेजमध्ये या बारा बलुतेदारांना स्थान नाही. शासन दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली. कोरोना महामारीच्या नावाखाली शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केले आहे. त्यांचे आयुष्य उध्वस्त केले. आज बापात बाप नाही, लेकात लेक नाही, कोणी एकमेकांना घरात येऊ देत नाही, कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शासनाची वाट सर्वसामान्य लोकांनी बघू नये. आपले आनंदी जीवन जगावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. केंद्र व राज्यात राजकीय नेतृत्व नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या प्रश्नाकडे म्हणूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी ,बबन शिंदे, विक्रांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सूचना केल्या. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दिवंगत सागर उबाळे यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सांत्वन केले. त्यानंतर ते शहीद सुनील काळे यांच्या बार्शी या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार,सफाई कामगार महिलेच्या जेवणात आढळली पाल !



प्रकृती बिघडल्याने जिल्हा जालना रुग्णालयात हलविले

जालना,ब्युरोचीफ :- अंबड ( जि. जालना ) येथील  उपजिल्हा रुग्णालयातील एका सफाई कामगार महिलेच्या जेवणात चक्क मेलेली पाल आढळून आल्याचा प्रकार गुरुवारी ( दि.२५) दुपारी घडला. विशेष म्हणजे एका पाल महिलेच्या खाण्यात आल्याचे या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.दरम्यान, चक्कर यायला लागल्याने या महिलेला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
      अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दररोज जेवण देण्यात येते. याचे एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आलेले आहे. दरम्यान, या रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार शांताबाई धोत्रे यांनी काम दुपारी रुग्णालयात जेवण घेतले. यावेळी त्यांच्या ताटात चक्क मेलेल्या पालीचे पिल्लू आढळून आले. तसेच दुसरे मेलेले पिल्लू त्यांच्या खाण्यात आल्याचे लक्षात येताच या महिलेला उलटी झाली. यावेळी येथील डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरू केले. मात्र शांताबाई धोत्रे यांना चक्कर येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना जालना येथे हलविले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे शांताबाई यांचे नातेवाईक राहुल कारके यांनी सांगितले. संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
   
तक्रार केल्यास कारवाई - डॉ. तलवाडकर

रुग्णालयातील जेवणात पाल आढळून आल्याचे आणि ती खाण्यात आल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे. जेवण देणाऱ्या कंत्राटदराविरोधात महिलेने तक्रार केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तलवाडकर यांनी दिली.


सुबोध काकाणी यांना उद्योग क्षेत्रातुन राज्यपाल नियुक्त विधान परिषद वर घेण्यात यावं..


नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड.

श्रीमती ज्यांची गुलामी करते असूनही कोणत्याही प्रकारची घमेंड नसलेले *काकाणी*परिवारातील पुरुषोत्तम राजाराम काकाणी या दाम्पत्याला दि. 16/10/1978 रोजी पुत्ररत्नाचा हेंद्राबाद येथे जन्म झाला. घरातील अगदी लहान पनापासूनच लाडका असलेले हे मुलं अगदी कमी वयातच नावारुपाला येऊ लागले ते त्याच्यातील सर्व जाती धर्मातील तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या प्रवृतीमुळे जनमानसात त्याच्या विषयी आपोआप आदर निर्माण होऊन कोणीही निस्वार्थ त्याचा होऊन जातो असे हे धर्माबादकराणा लाभलेले वेक्तीमत्व अगदी फोन वर जरी मदत मागितली तर ती काही वेळात मदत पोहचता करणारे मी पाहिलेले सुबोध काकाणी कोरोना वायरस च्या लॉकडाऊन काळात शहरवासीयांना हाताला काम नाही शहरात हातावर पोट असलेली गोरगरीब जनता त्यांच्या घरात कशी चूल पेटेल या विवंचनेत असलेला व आपली तळमळ मित्र परिवारांना सांगून त्यांच्या संकल्पने तुन साकार झालेले *गावकरी किचेन च्या मधून शहरातील रोज 20 ते 23 हजार जनतेची भूख भागवण्याचे सारखे 32 दिवसात 650000(सहा लाख पणास हजार )अन्नचे पाकीट व्यवस्तीत घरपोच दिले जवळ जवळ 700 किंटल तांदूळा ची खिचडी करून दिल्यामुळे या उपक्रमाची नोंद राज्यस्तरीय स्तरावर झाली.  *गावकरी किचन*मधूनघरोघरी जाऊन खिचडी वाटप करणारे सुबोध काकाणी तालुक्यातील मोठे अधिकारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, पोलीस निरीक्षक सोहन माच्छर, मुख्यधिकारी देवरे. धर्माबाद शहराचे उपनगर अध्यक्ष विनायक रावजी कुळकर्णी शहरातील सर्व नगरसेवक. व प्रतिष्टीत नागरिक यांना या माध्यमा तुन सेवा करण्याची संधी मिळून देणारा सर्व खर्च स्वतः करून हि कोणत्याच प्रकारचा आव न आणणारा मी पाहिलेला देव माणूस सुबोध काकाणी यांनी बुलढाणा अर्बन बॅंकेच्या व स्वतः च्या माध्यमातुन आपल्या परिसरातील जनतेच्या समस्याचे बारकाईने अभ्यास करून ती पूर्णत्वास आणण्याच्या जिद्दीने आपणाला यांच्या साठी काही तरी करावेच लागेल या विवंचनेतुन त्यांच्या संकल्पना साकार करणारे सुबोध काकाणी धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व प्रथम प्राधान्य दिले ते शेतकर्याचं शेत माल ठेवण्यासाठी अतकूर शिवारात भव्य असे 8हजार मेट्रिक टन व 7 हजार मेट्रिक टन क्षमतेचे 10वेअर हाऊस ची निर्मिती केली.सर्व परिसरात cctv बसून जिल्ह्यातील एकमेव ठिकाण असलेली शासन दरबारी  नोंद आहे. तिरुपती देवस्थानला सण 2015 मध्ये 5 लाख व 2016मध्ये 10 लाख दान दिले आहेत धर्माबाद परिसरात मोठया प्रमाणात उधोग निर्माती करून 500जणांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला अतकूरगावास माजी राज्यपाल विद्यासागर राव यांच्या संकल्पने तुन दत्तक घेतले.2016मध्ये कोरडा दुष्काळ पडला असताना शहरवासियांना मोफत दिवस रात्र पाणी पुरवठा टेक्टर द्वारे केला.बुलढाणा अर्बन बॅंक व दिवाणी न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर मध्ये 526रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता.धर्माबाद तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात तत्कालीन जिल्हाधिकारी श्री.काकाणी व ड्रा. अरुण डोंगरे यांच्या काळात मोफत जी सी बी उपलब्ध करून दिली होती   त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शहरात रुग्णांना ने आन करण्यासाठी रुग्णवाहनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी हेरलं व तीचा लोकार्पण सोहळा पारपडला त्या मुळे तालुक्यातील रुग्णांचा प्रश्न मार्गीलागला लगेच त्यांनी शववाहिनीची तालुख्यतः गरज आहे म्हणून तीही दिमतीत उभी केली.तालुक्यात कुठेही आग लागल्या वर ती वीजवण्यासाठी अग्निशमन गाडी सुद्धा जनतेच्या सेवे साठी दिली कोविड -19 च्या काळात धर्माबाद नगर पालिका हद्दीत निर्जंतुकीकरन करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा नगरपालिकेस  मोफत उपलब्ध करून दिली.धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समीती परिसरात हमाल मापाडी, व्यापारी, शेतकऱ्या व जनते साठी पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळावे म्हणून या परिवारा कडून  करण्यात आले आहे.कोविड-19पासून देशास  व राज्यास मदत म्हणून या काकाणी  परिवारा काडून अचानक धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व तेथील कोरोना कक्ष पाहणी साठी आलेले नांदेड जिल्याचे जिल्हाधिकारी ड्रा.विपीन इटनकर यांना स्वघरी येण्याचे आमंत्रण देऊन पंतप्रधान सहायता निधी म्हूणन 250000 व मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी म्हणून 250000 चा धनादेश संपत केला. आता तालुक्यातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या पाल्याना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून अतकूर  शिवारात भव्य असे राजाराम काकाणी सहकार विद्या मंदिर स्थापन करण्यासाठी इमारत बाधकाम प्रगती पथावर आहे.परिसरातील गोरगरीब  मुलींच्या लग्नासाठी ते 11000, हजार रुपये आपल्या आजोबा राजाराम काकाणी यांच्या नावे देतात.यांच्या या सेवाभावी व्रतिची दाखल उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी जिल्हाप्रशासनस देऊन ती महाराष्ट्रचे राज्यपाल कोशरिया यांच्या परेंत पोहचवण्याचे काम जिल्हा प्रशासनाणे केले आहे या कामाची दखल राज्यपालंनी घेऊन मा.सुबोध काकाणी यांना नुकतेच सांगण्यात आली आहे.त्यांच्या या विविध कामाची दखल घेऊन राज्यपाल यांनी उधोग क्षेत्रातुन विधान परिषद वर नियुक्त करावयाची मागणीने जोर धरला आहे.तालुक्यातील युवावर्गाने सामूहिक निवेदन देण्यासाठी गावोंगावी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे.सुबोध काकाणी यांना विधान परिषद वर उद्योग क्षेत्रातुन घेण्यात यावे म्हणून धर्माबाद तालुक्यातील 52 ग्रामपंचायत पैकी 38ग्रामपंचायतिने तसा ठराव घेतला आहे उर्वरित ग्रामपंचायत मध्ये तसा ठराव घेण्यासाठीची प्रकीर्या चालू आहे.तसे काकाणी परिवाराचे सर्वच राजकीय पक्षतील नेत्यांना सोबत चांगले संबंध आहेत.माजी राज्यपाल श्री.विद्यसागर राव यांचे कोटुबिक संबंध होते.ते कोणत्या पक्षची मदत घेतात या कडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून आहे.आपल्या तालुक्यात जे जे जण उपयोगी आहे त्या गोष्टी चा बारकाईने अभ्यास करून ती कशी अमलात आणावी त्याचा जनतेला कसा फायदा होईल असे हे  सुबोध काकाणी या परिसरातील असे व्यक्तीमत्व आहे की ते कोणत्याही राजकीय पक्षत नाहीत. तरी ते लोकप्रिय आहेत.अशी व्येक्ती उद्योग क्षेत्रातुन विधान परिषद सदस्य झाल्यास आम्हांला त्यांच्या अभिमानच होईल असे धर्माबाद येथील जनता व माजी नगर सेविका सौ.नीता गायकवाड यांनी म्हणले आहे.


बुधवार, २४ जून, २०२०

अंजानी आई फाऊंडेशन तर्फे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सैनिटीजर वाटप


औरंगाबाद,ब्युरोचीफ :- कोरोना व्हायरस ने जगात थैमान घातले असून प्रत्येक जिल्ह्यात कोरोना पेशंट झपाट्याने वाढत आहे .पोलीस प्रशासन जीव धोक्यात घालून  नागरी सेवा करीत आहे दिवसेन दिवस पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना देखील कोरोनाची लागण  होऊन मृत्यू होत आहे  प्रशासन मार्फत पोलीस ना कोणतेही सेफ्टी किट  दिलेली नाही  पोलीस अधिकारी अंमलदार स्वतःचा जीव धोक्यात घालून  कर्तव्य बजावत आहे.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अंजनीआई फाऊंडेशन जालना पंढरपूर टीम च्या वतीने शहर पोलिस  स्टेशन पंढरपूर या ठिकाणी पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार,नागरिक  याना सैनिटीजर वाटप करण्यात आले.
अंजानी आई फाऊंडेशन लॉक डाऊन सुरू झाल्यापासून कार्यरत आहे जालना,औरंगाबाद, पंढरपूर,भुसावळ ,इत्यादी जिल्ह्यात तालुक्यात अंजनीआई फाऊंडेशन जालना ची टीम स्वतः फिल्ड वर्क करत आहे अन्न धान्य, किराणा किट,मास्क,सैनिटीजर,रुमाल,फूड पाकीट ,पायी प्रवासी याना टी -शर्ट,चपल जोड वाटप करण्यात आले.दहा हजार व्हिटॅमिन c च्या गोळ्या ,फेस शिल्ड,औरंगाबाद शहर येथे वाटप करण्यात आले भुसावळ या ठिकाणी गरजू ना किराणा किट देण्यात आली  करण्यात येत आहे किरवले मित्र मंडळ च्या माध्यमातून वाटप सुरू आहे फाऊंडेशन चे काम विविध जिल्ह्यात चालू आहे अंजनी आई फाऊंडेशन
पंढरपूर टीम चे विजय जाधव, सचिन माने,आण्णा वाघमोडे अमोल अधटराव,यांनी सैनिटीजर वाटप केले.अशी माहिती अंजनी आई फाऊंडेशन च्या विद्या जाधव ज्योती आडेकर यांनी दिली.psi बालाजी किरवले यांनी मास्क ,सामाजिक अंतर ठेवण्याचे आव्हान केले.

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांना गटनेता विजय पवार यांची समर्थ साथ


प्रभागातील धार्मिक स्थळांचे करून घेतले निर्जतुंकीकरण

*जालना,प्रतिनिधी :-* माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नांतून जालना शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने श्री खोतकर यांच्या प्रयत्नांना साथ देत पालिकेचे शिवसेनेचे गटनेते विजय पवार यांनी प्रभाग क्र 13 मध्ये हा उपक्रम राबविला असून त्यांच्या नियंत्रणाखाली या भागातील सर्व धार्मिक स्थळ परिसरात फवारणी करण्यासह स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.शहरातील अनेक भागात कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण गत काही दिवसात वाढले आहे. त्याचीच दखल घेऊन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नियोजनानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रामुख्याने औषध आणि धुराची फवारणी करून संबंधीत परिसरात स्वच्छता राहण्यावर मोहिमेअंतर्गत विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोहिमेला समर्थ साथ देण्याचा गटनेता विजय पवार यांचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने प्रभाग क्र 13 मधील सर्व धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. या परिसरांमध्ये विजय पवार यांच्या नियंत्रणाखाली धूर व औषध फवारणी केली गेली आहे. शिवाय धार्मिक स्थळांसोबत प्रभाग परिसरातही साफ सफाई राखण्यावर श्री पवार यांचे विशेष लक्ष असून कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली आहे.


डॉ.जयंत भालेराव यांचे निधन


जालना,प्रतिनिधी :- येथील आनंदवाडी परिसरातील रहिवासी डॉ. जयंत आबाराव भालेराव यांचे सोमवारी (दि 22) दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 64 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर रामतिर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. घनसावंगी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन अधिकारी म्हणून डॉ. भालेराव हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, भाऊ, बहिण, दोन मुले, सुना नांतवडे असा मोठा परिवार आहे.


ऑनलाईन परिक्षेत सचिन आर्य यांचे यश .ऑलंम्पिक दिनानिमित्त आयोजित केली होती स्पर्धा


जालना,प्रतिनिधी :- एकीकडे कोरोना महामारीसारख्या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेच्या खांद्याला खांदा लावून उभा असलेल्या जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांनी आपल्या दैनंदिन कामाकाजासही आवडीनिवडीवरची पकडही कमी होऊ दिलेली नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे पोलीस दलातील कर्मचारी सचिन आर्य यांनी ऑलंम्पिक दिनानिमित्त अखिल भारतीय स्तरावर आयोजित ऑनलाईन स्पर्धेत विशेष यश संपादन केले हे मानले जात आहे.कोरोना आजारावर मात करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी तसेच नागरिक गत अनेक दिवसांपासून झटत आहेत. त्यातच सर्वसामान्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस दलातील तायक्वांदो खेळाचे राष्ट्रीय पदक विजेते तथा राष्ट्रीय पंच सचिन आर्य यांनी ऑलंम्पिक दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभाग नोंदवून हे यश संपादीत केले आहे. भारतामधील एकमेव स्पोर्टइन या नामांकीत संस्थेच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात संपादीत केलेले यश हे आर्य यांचे नेत्रदिपक यश मानले जात आहे. या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद देशमुख, जनता पोलीस समन्वय समितीचे धनसिंह सुर्यवंशी, विजय कमळे, राष्ट्रीय खेळाडू विपूल राय, फईम खान, सय्यद निसार, सचिन गादेवार, मयुर पिवळ, प्रतिक ढाकणे यांनी श्री आर्य यांचे अभिनंदन केले आहे.


जिल्ह्यात चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर वीस रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्कडकोट परिसरातील 01,नानक निवास 04, विठ्ठल रुक्मिणी लोधी मोहल्ला 01, काद्राबाद 03, शंकर नगर 01, सरस्वती मंदिर 01,गुडला गल्ली 04, जाफ्राबाद शहरातील अंबेकर नगर 01,जाफ्राबाद शहरातील नगर पंचायत 01, जाफ्राबाद शहरातील आदर्श नगर 01, आदर्श नगर पिंपळखुडा, जाफ्राबाद 01,अंबड शहरातील 01 अशा एकुण 20 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात तर  जालना शहरातील काद्राबाद परिसरातील 02,मंगळबाजार 03, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं 3 मधील 01 जवान,नाथबाबा गल्ली 03,मोदीखाना 01,नुतन कॉलनी, भोकरदन 02,गोंदी ता. अंबड येथील 02 अशा एकूण 14 व्यक्तींच्या पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3789 असुन  सध्या रुग्णालयात -104, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1436, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–61, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4674, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–14 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -398, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -4211 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-406 एकुण प्रलंबित नमुने-61, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1320.14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1215, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-44, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-245, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–16, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -104, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-24, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-20, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-277, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -102, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-07, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-10597, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 12 एवढी आहे. आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 245 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-14, शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना-29, संत रामदास वसतिगृह जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-00, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-26, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना–59 मॉडेल स्कुल परतुर-05, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-11, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-01 मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी–02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र 02 भोकरदन -27, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00, हिंदुस्थान मंगल  कार्यालय, जाफ्राबाद-09, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद –00, जेबीके विद्यालय, टेंभुर्णी-28, शेठ इ.बी.के. विद्यालय टेंभुर्णी -30.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 872 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 827 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली   3 लाख 76 हजार 930 असा एकुण 4 लाख 3 हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  


प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्ज उपलब्ध करुन द्या.

कंन्टेन्टमेंट झोनमधुन नागरिकांनी बाहेर पडू नये.


एसबीआय, युनियन बँक तसेच शहरातील कंन्टेन्टमेंट भागास भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचना

जालना,ब्युरोचीफ :-जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज दि. 24 जुन रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या मुख्य शाखेस, अंबड येथील एसबीआय  तसेच रामनगर येथील युनियन बँकेला भेट देऊन शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीककर्जाचा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.तसेच जालना शहरातील कन्टेन्टमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली.बँक अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकांच्या लागवडी तसेच मशागतीसाठी पीककर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  शासन तसेच प्रशासनामार्फत प्रत्येक बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.  पीककर्जाचे दिलेले उद्दिष्ट प्रत्येक बँकांनी शंभर टक्के पुर्ण करावे.  तसेच जिल्ह्यातील एकही गरजू शेतकरी पीककर्जापासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देत ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत अथवा पीककर्ज देण्यास टाळाटाळ करतील अशा बँकांवर कारवाई करण्याचा ईशाराही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिला.यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, एलडीएम निशांत ईलमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनो कंन्टेन्टमेंट भागातुन बाहेर पडू नका
जालना शहरामधील कंन्टेन्टमेंट भागास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत या भागाची पहाणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असुन कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये.केवळ अत्यावश्यक असेल त्या वेळीच घराबाहेर पडा.सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनिटायरचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे या बाबींची सवय लावून घेण्याबरोबरच प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


अंबड येथील कापूस खरेदी केंद्राला भेट अंबड येथे सुरु करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.यावेळी आमदार नारायण कुचे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची  उपस्थिती होती



अंबड तहसिल कार्यालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट
अंबड येथील तहसिल कार्यालयास जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन तेथील कामकाजाचा महसुल अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.यावेळी उप विभागीय अधिकारी शशीकांत हदगल, तहसिलदार श्री शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...