मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

 राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.


 महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर परिषद अंबड येथे दि. २५/०९/२०१७ रोजी शौचालय मिळण्यासाठीचा अर्ज दिला होता. यासाठी मि बांधकामाला सुरुवात केली. ज्यात खड्डे करून टॅकचे बांधकाम केले. नगर परिषद अंबडचे कर्मचारी यांनी या कामांची वेळो वेळी पाहणी केली व तसा अहवाल वर माझी सही देखील घेतल्या. व आपले अनुदान लवकरच आपल्या खात्यावर टाकण्यात येईल असे मला वेळो वेळी सांगण्यात आले. यासाठी मि अंबड नगर पालिका कार्यालयात ३०/१/२०२० रोजी अनुदान मिळावे यासाठी अर्ज केला होता यात मला टाळाटाळ होत असल्याने जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे दि. १७/०२/२०२० अर्ज करून मला न्याय देण्याची विनंती केली होती. यावर आपल्या कार्यालयाने मुख्याधीकारी न.प. अंबड ला दि. २५/२/२०२० रोजी अर्ज निकाली काढण्याचे आदेशीत केलेले असताना अद्यापपर्यन्त माझ्या  অই তু কথা! বীজ জালা ব্যক্তি কি সঙ্গী বাছী অথাবর নাফ আলী ওখক দাঙ্গা दिला नाही. या करिता मि आज पर्यन्त पालिकेत संबंधीत विभागापासुन ते स्वच्छता विभागात  




अनेकदा चकरा मारल्या मात्र मला कोणताही प्रतिसाद दिला नाही कि अनुदान दिले नाही. मला पालिकेने माझ्या वडिलांचे नावे आधार कार्ड ची मागणी केली मात्रा वास्तवात माझ्या वडीलांचे २०१६ साली निधान झाले आहे. असे असताना त्यांचे आधारकार्ड मागणणे चुकिच्चे आहे शिवाय त्यांचे आधारकार्ड है जनवलेले लल्याने ते आजरोजी उपलब्या वास्तवात अर्जदार मि स्वताः असताना माझ्या वडीलांच्या नावे आसलेले आधारकार्डची आवाश्यकता काय आहे? हे न कळण्यासारखे आहे. तसेच मि शौचालायाच्या योजनेसाठी २०१७ रोजी अर्ज केला असताना आज पर्यन्त मला कोणतेही अनुदान तर मिळालेच नाही उलट पालिका, এয়ারল ওথয়তঃ ওহিদ্ধাস্থালী আভুয়া এর্থী, ফালৰ্বীদ্ধ, জ্বালাভজ্জ গুড় জ্বলঃ ওলুল সাত্যাবস্ত্রেী তানজ अर्जदार आजही पालिकेस हाकरा मारताना दिसुन येतात. तसेच काहींकडे अनेक कागदपत्रांची पुर्तता नसताना त्यांना एका महिण्यांच्या आत अनुदान घरपोच देण्यात आले हा कोणता न्याय ? तरी मे. साहेबांना जिनंती की आपण अंबड पालिकेच्या शौचालय अनुदानाची चौकशी केल्यास यात चाललेला भ्रष्टाचार ওঃত্বদ্যোলয় ঝিল থান্ত ভীী থিম্ফাম্যাবৎ থাইং জাবী ফষাদ্বী ভি আত্মস্থান্ধী মায়াবী, ওথা लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी अंबड पालिका प्रशासनाची राहील.







शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

 Title शास्त्रशुद्ध पद्धतीने कीटकनाशक फावरणी Content


गाव टाकळगव्हान ता गेवराई जि बीड येथे कृषीदूत रोहित नरवडे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने कीटकनाशक फावरणी बद्द्ल मार्गदर्शन केले

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

 साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्र लेखनपर पुस्तकाचे  विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी/ जालना

कॅप्शन जोडा

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोदजी येवले सर यांच्या हस्ते जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक अण्णाभाऊ साठे या नावाचे चंद्रकांत कारके यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट चरित्र लेखनपर पुस्तकाचे प्रकाशन जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज दि 7 आगस्ट रोजी दुपारी 1.30 वा विद्यापीठात संपन्न झाले यावर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चंद्रकांत कारके यांनी जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक  अण्णाभाऊ साठे या नावाचे एक चरित्र लेखनपर पुस्तक लिहिले असून या उत्कृष्ट पुस्तकाचे प्रकाशन आज दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ.प्रमोदजी येवले सर यांच्या हस्ते विद्यापीठात प्रकाशीत करण्यात आले यावेळी चंद्रकांत कारके यांच्या सह प्रा अभिजीत पंडित नेते भारत जाधव प्रा पंढरीनाथ रोकडे प्रा वसंतभाई संसारे अभिजीत शिरगोळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू मा डॉ.येवले सर यांनी पुस्तकाचे प्रकाशन करत श्री चंद्रकांत कारके यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे तोंडभरून कौतुक केले यावेळी सर्वांनी सोसीयल डिस्टंसेसचे पालन करत पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम संपन्न केला

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

 निर्णय न घेतल्यास 10 ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरू - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरो चीफ - राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या,  उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे. राज्यातील एसटी बस सेवा सुरु करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या, महाराष्ट्राला आता निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल ,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.


ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र ५ टक्के लोकांसाठी तुम्ही ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. राज्यात दहा हजार राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे त्या अद्यापही झालेल्या नाहीत. मुंबईसह इतर मनपा क्षेत्रातही बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने दहा ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी व कोरोना नसतांना मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करून हे दाखवून दिले की कोरोना नसताना अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. म्हणजेच कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी दाखवून दिले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 


शेट्टींच्या स्वाभिमानीचा  "सुधीर कथले" आता बाळासाहेबांच्या वंचितचा शिलेदार


बीड,ब्युरो चीफ - वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आणि लढाऊ नेते सुधीर कथले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सर्वोच्च मानत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

बीड जिल्ह्याचे कृतिशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या कृतिशीलतेवर  विश्वास ठेवात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा झेंडा खाली ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. "यापुढे जो संघर्ष आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी केला तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी करणार असून, अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती सुधीर कथले यांनी दिली.

अंबड शहरातील ओमशांती कॉलनीतील मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप


अंबड नगरपालीकेचं पावसाळी पुर्व काम पाण्यातच 

अंबड प्रतिनिधी :- अंबड शहरातील ओमशांती कॉलनी मधील हा रस्ता शॉटकट मार्ग या नावाने प्रचीत आहे.या शॉटकट मार्गाने पोलीस ठाणे, उपविभागिय कार्यलय, न्यायालय, एसबीआय बँक, भाजीमंडी, नगरपालीका,ओमशांती विद्यालय,कॉलेज, महीला बचत गट भारत फायन्स आणी मुख्य बाजारपेठे कडे जानारा हा शॉटकट मार्ग आहे.महिला बचत गट भारत फायन्स हे जवळच असल्याने  येथे महिला पादचार्यांची रेलचेल असते.व ग्रामीण भागातील वाहनचालक याच शॉटकट मार्गाने जाण्यास पंसद करतात.पंरतु याच रहदारीच्या शॉटकट मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाल्याचे दिसुन येत आहे.पाण्याला जायला वाटच नसल्यामुळे याठिकाणी तळ्याचे स्वरूप आलेले आहे.पादचार्यांना तर या घाणपाण्यातुनच जावे लागत आहे.याचा सर्वाधिक फटका लहान बालके,अबालवृध्द व महिंलाना बसत आहे.वाहनचालकही याच पाण्यातुन मार्गक्रमण करत आहेत.यांची फजिती होत असल्याचे दिसुन येत आहे.


या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातुणच जाण्यावाचुन पादचारी आणी वाहनचालकांना गत्यंतर राहत नाही.अंबड नगरपरिषदेच्या पावसाळी पुर्व नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा दिसुन येतो एका ठिकाणी जास्त काळ पाणी राहील्यास अस्वस्थता पसरून डासाचा प्रादुर्भाव वाढु शकतो.यातुन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या कोरोना च्या काळात जास्त स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे.पंरतु अंबड नगरपालीका कडुन ठोस उपाय योजना केल्या जात नाही. याबाबत नगरपालीकाचा कारभार हाकणाऱ्यां पुढाऱ्यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवून ओमशांती कॉलनीतील आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.अशी ओमशांती कॉलनीतील रहवासी जोरदार मागणी करत आहे


रविवार, २ ऑगस्ट, २०२०


पत्रकारांना हेतुपुरस्सरपणे गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा - शीतल करदेकर


जालना/प्रतिनिधी :- जालना येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे.
हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे  यांचेकडे केली आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना येथील संपादक गोयल व मानकर  दि.२८ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात जालना येथील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी पत्रकारांना वेळ न देता कुठलीच माहिती उपलब्ध करून न देता उलट कार्यलयातील सेक्युरिटी मार्फत एका आठवड्या नंतर येऊन माहिती घेऊन जाण्याचा सल्ला दिला.वारंवार जालना येथील एमायडीसीमुळे प्रदुषण वाढते आहे. अनेकदा याबाबत  प्रदुषण महामंडळ अधिकार्‍यांचे लक्षात आणून दिले. बातम्या लिहिल्या याचा राग सौ. योगिनी अविनाश बाळंके यांचे मनात होताच. त्यामुळे उडवाउडवीची उत्तरे देणे, आपले कर्तव्य नीट न बजावणे, पत्रकारांना अपमानकारक वागणूक देणे आणि जे चुकीचं काम करतोय याबाबत जराही अपराधी भावना नसणे अशी मनमानी करण्याच्या त्यांच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी अर्पण गोयल आणि भरत मानकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांची लेखी कैफियत निवासी जिल्हाधिकारी  मा. निवृत्ती गायकवाड यांच्याकडे मांडण्याचे सांगण्यात आले. त्यांनी पत्रकाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी दिलेल्या तातडीने प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांना मोबाईलवर कॉल करून पत्रकारांना माहिती देण्याचे सांगितले शिवाय त्या औरंगाबाद येथून अप-डाऊन करीत असल्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. प्रदूषण नियंत्रण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांच्या औद्योगिक वसाहत कार्यक्षेत्रात प्रदूषण वाढले असल्याने याबाबत कुठलीच कारवाई ही होत नसल्याने सौ. बाळंके यांची लेखी तक्रार दि.२९ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद येथील कार्यालयात करण्यात आली होती. याबाबतची बातमी दैनिक गोकुळनीती आणि दैनिक तात्काळ राज्यवार्ता यांनी छापली होती. याशिवाय प्रदूषणच्या बाबतीत पर्यावरण मंत्री ना. अदित्य ठाकरे यांना देखील तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीचा राग मनात धरून प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हेतुपुरस्सरपणे  दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर, प्रदूषण महामंडळाच्या कार्यलयात कधीच पाय न ठेणारे पत्रकार विष्णु कदम यांनी बातमी लिहिली यासाठी आणि विष्णु कदम त्यांचे मित्र नीलकंठ कुलकर्णी जे नेहमी त्यांच्या सोबत राहतात त्यांचे नावाने गुन्हा नोंदवण्यात आला.
चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अट्टल गुन्हेगारांना कधीच पकडले नाही परंतु पत्रकार गुन्हेगार असल्याप्रमाणे कुठली ही चौकशी न करता  गुन्हा नोंदविला खरं तर पत्रकार सुरक्षा कायद्याखाली एसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी करुन, मग गुन्हा दाखल करने आवश्यक होते. मात्र केवळ 'आधी माहिती द्या, मग इतर काम करा' असं म्हटलं  तर सरकारी कामात अडथळा निर्माण होतो का ?   हा मोठा प्रश्न या कार्यतत्पर अधिका-याच्या कार्यशैलीवर निर्माण झाला आहे. पत्रकारांनी बातमीसाठी माहिती विचारणे हा जर गुन्हा ठरत असेल तर भविष्यात शासकीय कार्यलयात जाण्यापुर्वी पत्रकारांना संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज देऊन  पोलिस संरक्षणं आणि सोबत साक्षीदार  घेऊन जावे लागेल. प्रदूषण महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके  जालना येथे कार्यरत झाल्या पासून आजपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा  घेतल्यास सर्व सत्य बाहेर येईल. मा. मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेऊन पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा प्रदूषण नियंत्रण  महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके व चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांचेवर कठोर कारवाई    करण्यात यावी अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकारांवर गुन्हे व अटक केल्यानंतर तरी जालन्यातील वाढते प्रदुषण  नियंत्रणात येईल का ? हा सवाल आहेच.हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि हे आता थांबायला हवेच अशी ही आग्रहाची मागणी करदेकर यांनी पत्राद्वारे करण्यात आलीआहे. एनयुजे महाराष्ट्र नेहमीच सक्षम समाजासाठी व पत्रकारांच्या सन्मानासाठी काम करीत असून यासाठी याची प्रत मा.गृहमंत्री अनिल देशमुख, मा.पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे,मा. सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवण्यात आली आहे अशी माहिती एनयुजे महाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी दिली आहे


जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 49 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.



जालना,ब्युरो चीफ :- जालना शहरातील  गोपाळपुरा -1, रहेमान गंज -1, जालना शहर -1, प्रयागनगर -1, संभाजीनगर -3, मंगळबाजार -1, सारथी कॉलनी -2, गोपिकिशन  नगर -3, माणिकनगर -1, अग्रसेन नगर -1, जवाहर बाग -2, ख्रिस्ती कॅम्प -2, कन्हैयानगर -9, खरपुडी -1, पोलास गल्ली  -1, लक्ष्मीनारायणपुरा -1,संभाजीनगर -2, आझाद मैदान -1, कालीकुर्ती -3, पोस्ट ऑफिस -1, जमुनानगर -1, केदारखेडा -1, पारध बु. -1,गोकुळ -1, हडपसावरगाव -3, अकोला -4, अशा एकुण 49 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील  संभाजीनगर -1, जांगडे नगर -1, दुर्गामाता रोड -1, आर.पी. रोड -1, भाग्यनगर -1, सोनल नगर -1, इसार गार्डन -1, मधुबन कॉलनी -1, सकलेचा नगर -1, समर्थनगर -3, डबलजीन -2, रामनगर -1, प्रितीसुधानगर -2, धोका मिल -1, हमालपुरा -1, रामनगर पोलीस कॉलनी -1, बालाजी गल्ली परतुर -4, मोंढा परतुर -2, खतीब मोहल्ला परतुर -1, जिजाऊ नगर परतुर -1, साठे सावंगी ता. अंबड -2, शनिवार पेठ देऊळगाव राजा -1, सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा -1, पाचनवडगाव -1, म्हसला ता. परतुर -1, कोठी -2, गणेशनगर बदनापूर -1, गोंदी -1, अंबड शहर -8, खंडोबा मंदिर भोकरदन -4, प्रसादगल्ली भोकरदन -1, जाफ्राबादरोड भोकरदन -5, परदेशी गल्ली भोकरदन -4, देऊगावराजा -2, भातगेडा ता. घनसावंगी -1,सुरगीनगर अंबड -1, नवा मोंढा परतुर -1, गोधी मोहल्ला बदनापूर -1 अशा एकुण 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 अशा एकुण 66  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7593असुन  सध्या रुग्णालयात-515 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2890, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13482 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-66 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2335 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10944, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-114, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2399.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2387, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-431,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-515,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-115,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-49, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1555, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-707 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-25654 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-73 एवढी आहे.
 सुरगी नगर अंबड येथील रहिवाशी असलेल्या 55  वर्षीय पुरुष रुग्णास हृदयविकाराचा झटाका आल्यामुळे व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.31 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 1 ऑगस्ट  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 431 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-72, जे.ई. एस. मुलींचे वसतिगृह-25, जे. ई. एस. मुलांचे वसतिगृह- 8, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-44, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-12,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-11,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-58, संत रामदास हॉस्टेल -17,   पोलीस प्रशिक्षण केंद्र -4,गुरु गणेश भवन-6, केजीबीव्ही परतुर -17,मॉडेल स्कुल, मंठा-14, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-40,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -7,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -19, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-17,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -10, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  201 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1059 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 87 हजार 230 असा एकुण 9 लाख 21 हजार  38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

                                               

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.


साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप.



जालना,ब्यूरो चीफ :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे  यांचे दि 1 ऑगस्ट रोजी रात्री दीर्घ आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 2 ऑगस्ट रोजी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला.
शारदाताई टोपे यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. कोरोनाच्या अनुषंगाने  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करत अत्यंत कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार सर्वश्री कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे, अंबादास दानवे, संदीप क्षीरसागर,बालाजी कल्याणकर, गुलाबराव देवकर, राजेश राठोड, कल्याणराव काळे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, चंद्रकांत दानवे, शिवाजीराव चोथे प्रकाश गजभिये, बदामराव पंडित, राजेश विटेकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, मनोज मरकड, महेबुब शेख, कल्याणराव सपाटे, नानाभाऊ उगले आदींची उपस्थिती होती. 
यावेळी टोपे परिवारातील मनिषाताई टोपे, वर्षाताई देसाई, संग्राम देसाई, बाळासाहेब पवळ, उत्तम पवार, सतीष टोपे, शरद टोपे, संजय टोपे, अमोल टोपे, ॲड संभाजी टोपे, गणेश टोपे, दीपक टोपे, सुरज टोपे, संदीप टोपे, भैय्या टोपे यांनी शारदाताई टोपे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.
गेल्या पन्नास वर्षामध्ये माझ्या आईने एका शब्दानेही कोणाला न दुखावता सर्वांना प्रेमच दिले. संपुर्ण आयुष्यामध्ये आईने कुठल्याही गोष्टीची कधीच अपेक्षा केली नाही.  माझ्या जडणघडणीमध्ये वडीलांबरोबरच आईचाही मोठा वाटा होता. निखळ व निरपेक्ष प्रेमाच्या झऱ्याला आज मी मुकलो असल्याची भावना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे टोपे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.  केवळ टोपे परिवारच नव्हे तर संपुर्ण परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेश टोपे हे संपुर्ण महाराष्ट्राला कोरोनामधुन सावरण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यांना आधार देणाऱ्या शारदाताई यांच्या निधनामुळे कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  टोपे परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो तसेच त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असल्याची भावना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली.
संयमी, अभ्यासु वृत्ती असलेल्या राजेश टोपे यांच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे राजेश टोपे हे आईच्या प्रेमापासुन पोरके झाल्याने आपणास तीव्र दु:ख झाले असुन टोपे कुटूंबियांना हे दु:ख सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशा शब्दात  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार संतोष दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे यावेळी सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले.  
तत्पुर्वी शारदाताई अंकुशराव टोपे यांचे पार्थिव त्यांचे मुळ गाव असलेल्या पाथरवाला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनीही तेथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.


शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील कार्यकारणी गठीत.


वर्धा,ब्यूरो चीफ :-दि. 30/07/2020 ला भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील कार्यकारणी गठीत करण्यात आली ,भीम आर्मी भारत एकता मिशन #संस्थापक भाई #चंद्रशेखर आझाद रावण ,याचा आदेशानुसार  जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांंच्या मार्गदर्शनाने भीम आर्मी  तालुका उपाध्यक्ष गुलाब खान पठान ,शहर अध्यक्ष अंकुश भाऊ कोचे,शहर उपाध्यक्ष अॅड. नम्रता बागेशवर शहर संघटक शाहिद अखतर प्रसिद्धी प्रमुख  सैय्यद सैफ अली याची नियुक्ती करण्यात आली ,तसे च भीम आर्मी शाखेचे अनावरण करण्यात अगोदर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून  ,फेजर पुरा ,पठाण चोक ,पँथर चोक सेय्यद मोहला येथे शाखा चे उटघाटन करण्यात आले , भीम आर्मी अन्याय ,अत्याचार च्या विरोधात लढणारे संघटन असून गावात जिल्हा तालुका शहरात पर्यत आपल्या शाखा सुरू करण्यात येणार आहे, तेव्हा भीम आर्मी तालुका अध्यक्ष शशांक भगत ,बंटी रंगारी ,प्रशिल पाणबुडे, मनीष प्रधान ,दीक्षित सोनटक्के, आशिष रणधीर ,आझम शेख ,एकता पाटील,मोहम्मद अशकाल, रोशन चव्हाण, सचिन चव्हाण ,मनीष मून ,यश लोहकरे ,मोनू पठाण,शहारुक सेय्यद, नानीर सेय्यद, कुणाल ताकसाडे, अमन संगोळे ,दादाभाई पठाण ,सुशील जांभुलकर,सलिम  शाहरुख सेय्यद,इकबाल खान,किम सेय्यद व भीम आर्मी चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


जिल्ह्यात 82 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह.52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.


जालना,ब्युरो चीफ :- जालना शहरातील प्रयाग नगर-1, नाथबाबा गल्ली-1, गोपीकिशन नगर -1, बु-हाण नगर -1, नॅशनल नगर-4, जयभवानी नगर -1, आर.पी. रोड-3,  रामनगर पोलीस कॉलनी -3, कबाडी गल्ली -1, व्यंकटेश नगर -2, मस्तगड -1, चंदनझिरा -3, भीमनगर -2, लक्कडकोट -1, नळगल्ली -1, नयाबाजार -1, दर्गा वेस -2, कन्हैयानगर -6, सामान्य रुग्णालय परिसरातील -1, टाऊन हॉल -1, भाग्यनगर -1, मोदीखाना -1, बालाजी नगर -1,कचेरी रोड -1, प्रशांतीनगर -1, गुडला गल्ली -1, जालना शहर -2, कोष्टी गल्ली काद्राबाद -1, अंबड -1, वरुड बु. -1, बुटखेडा -4, अशा एकुण 52 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंठा चौफुली-4, फारशी गल्ली -1, नुतन वसाहत-2, हनुमान नगर-2, युसुफ कॉलनी -1, लक्ष्मीनारायणपुरा-1, भाग्यनगर -3, जमुना नगर -5, सोरटीनगर-1, सकलेचा नगर-3, वैभव कॉलनी -3, समर्थ बँकेजवळ-2, पावरलुम जुना जालना-3, काद्राबाद -1, एम.आर.डी.सी. -1, सामान्य रुग्णालय  निवासस्थान -1, महाकाळा ता. अंबड -11, रोहीलागड-1, शहागड -3, सुखापुरी -1, देऊळगाव राजा -1, उज्जैनपुरी ता. बदनापुर -1, निरखेडा-1, रांजणी-1, शनी मंदीर परतुर -1 अशा एकुण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 28 अशा एकुण 82  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7495 असुन  सध्या रुग्णालयात-484 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2854, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-170 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13447 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-82 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2269 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10868, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-221, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2382.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2349, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-496,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-484,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-102,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1506, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-691 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-24233 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-72 एवढी आहे.
अंबड शहरातील रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 31 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. यावलपिंप्री ता. घनसावंगी  रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना             दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांचा 1 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 496 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-2, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-59,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन,वसतिगृह-10,जे.ई. एस. मुलांचे वसतिगृह-8 जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह-39, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-63, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-6, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-58, गुरु गणेश भवन-5, संत रामदास हॉस्टेल -10, मॉडेल स्कुल, परतुर-23, मॉडेल स्कुल, मंठा-2, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-51,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-62, शासकीय मुलांचे वसतीगृह,बदनापुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -5,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-17, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-5,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1,आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-8, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1051 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 74 हजार 430 असा एकुण 9 लाख 8  हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई


212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल



जालना,ब्यूरो चीफ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.1 ऑगस्ट, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
     यामध्ये जालना तालुक्यात 179 व्यक्तींकडून 42 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 18 व्यक्तींकडून 1 हजार 800, जाफ्राबाद 4 व्यक्तींकडून 800, परतुर 11 व्यक्तींकडून 2 हजार 200 रुपये अशा प्रकारे एकुण 212 व्यक्तींकडून 46  हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
      नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जालना,ब्यरो चीफ :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी  अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा नियोजन अधिकारी अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर,श्रीमती आर.आर. महाजन,  संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.





धुळ्यात लॉक डाऊनला विरोध, व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद.


धुळे,ब्युरो चीफ :- सर्वसामान्य लोकांनी आता जगायला सुरवात करावी. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये केले होते. त्यांच्या आवाहनाला आज धुळे  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रतिसाद देण्यात आला. शहरातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले जगायचं असेल तर आपले सर्व व्यवसाय सुरू ठेवावे लागतील हे सरकार भांडवलदारांचे सरकार असून या सरकारला तुमच्याशी काही देणे घेणे नाही.

स्वतःला   सिद्ध करावे लागेल मुलाबाळांसाठी घराबाहेर पडा लहान-मोठे व्यवसाय सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यानी सर्वांना बाळासाहेबांची भूमिका समजावून सांगितले. त्यामुळे अनेक भागात व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापली दुकाने उघडी केली.


रस्त्यावर भाकरी खाऊन वंचितने लॉकडाऊन तोडले.


बीड,ब्युरो चीफ :- राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर बसून चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला गेला.

लॉकडाऊनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून शासनाचा कसलाच लॉकडाऊन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच रस्त्यावरच भाकरी खात लॉकडाऊन तोडण्यात आला. आज पासून कोणीही मास्क घालणार नाही, किंवा फिजिकल डिस्टन्स पाळणार नाही.
असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी जाहीर केले आहे. या प्रसंगी राज्य महासचिव भीमराव दळे प्रशांत बोराडे  सम्यकचे जिल्हाध्यक्ष अजय साबळे,    बाळासाहेब वाघमारे इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


उद्या पासून टाळेबंदीला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा  - राजेंद्र पातोडे



अकोला,ब्युरो चीफ :- कोरोनाच्या नावावर देशातील लोकशाही कुलूपबंद करण्याचा सरकारचा डाव असून नागरिकांच्या जगण्यावर बंधने आणली आहेत.जनतेला टाळेबंदी नकोय म्हणून सामान्य जीवन जगण्यास प्रारंभ करावा, ही भूमिका ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे.सबब व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार,टपरीधारक,फेरीवाले,

ऑटो रिक्षा या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेच्या उपाय योजनांसह आपले दैनिक व्यवहार सुरु करून सरकारची ही दडपशाही अमान्य करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.  


जनता मेटाकुटीला आलेली असताना सरकारने सहावा लॉकडाउन जाहीर केला आहे. गोरगरीब जनतेच्या जगण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना शून्य असून वाढता मृत्यदर आटोक्यात आणण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. देशात केवळ ३ टक्के मृत्युदर असून मृत्युदर कधीही शून्य असू शकत नाही. त्यामुळे सरकार आणि चॅनेल्स भिती घालण्याचे काम करीत आहेत. कोरोना पूर्वी व कोरोना नंतर होणारे मृत्युदर तपासले असता असे लक्षात येते की कोरोना आधी मृत्युदर हा आताच्या मृत्युदरा पेक्षा १८ टक्के अधिक होता. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता जनतेने आपले सण, दैनिक व्यवहार सुरळीत सुरु करणे गरजेचे आहे. व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार, टपरीवाले, फेरीवाले, ऑटो रिक्षा या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या दैनिक व्यवहाराला प्रारंभ करावा. सरकारची ही दडपशाही अमान्य करावी. आपापली दुकाने उघडी करावी. जनतेने देखील शारिरीक अंतर, मास्क व सॅनिटायजरचा वापर करीत खरेदी आणि सण साजरे करणे, सामाजिक सौहार्द आणि स्वास्थ टिकविण्यास प्रारंभ करावा.

येणारे सण साजरे करण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सरकारने सुरु करावी तसेच सरकारने शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे. सरकार युरोपियन मॉडेलवर चर्चा करते. परंतु आशिया खंडातील चीन, भूतान, म्यानमार यांनी कोरोना कशा पद्धतीने आटोक्यात आणले यावर सरकार बोलत नाही. लोक मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहेत. त्यांचे रोजगार हिरावले जात आहेत.देशातील जनतेच्या हितासाठी लस बाजारात आणावी किंवा उपायपयोजना आखाव्यात, हे करण्या ऐवजी  लॉकडाऊन करीत आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने व्यापारी, फेरीवाले, लहान व्यवसायी, नौकरदार यासह सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तारखेपासून पक्षाचे कार्यकर्ते " मी हा लॉकडाउन मानत नाही" हा निर्धार करून बाहेर पडणार आहेत. जे व्यवसायी आपले व्यवसाय करू इच्छितात त्यांना व्यापार व व्यवसाया करीता पोलीस आणि प्रशासनाचा त्रास होऊ दिला जाणार नाही. त्यासाठी प्रखर आणि लढण्याची भूमिका वंचित घेत आहे.जनतेने देखील टाळेबंदी झुगारून लावावी व आपले जीवन सामान्यरित्या सुरू करावे, असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीने केले आहे.



अकोल्यातील हॉटेल - रेस्टॉरंट मालकांचे लॉकडाउनविरोधात ॲड प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा !


अकोला,ब्यूरो चीफ :- शासनाने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले असून यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने काल रात्री अकोला जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ॲड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच संपूर्ण व्यावसायिक या लॉकडाउन तोडो अभियानात सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या भुमीकेसोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते. अशी माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


मंगळवार, २८ जुलै, २०२०

कलाठिया कंपनी चा गौण खनिज (दगड) उत्खनन व वाहतुकीच तातपुरता परवाना समाप्त झाला असून तरी ही उत्खनन सुरु - राहुल व्ही खरात


अंबड,प्रतिनिधी :- में कलाठिया इंजीनियरिंग ऐंड कंस्ट्रक्शन ली.अहमदाबाद गुजरात या कंपनीस पाचोड-अंबड,घनसावंगी, आष्टी रसत्याच्या कामा करिता दगड या गौण खनिजाच्या 7000 ब्रास इतक्या मर्यादा व वाहतुकीसाठी अल्प मुदतीचा तातपुरता खांनपट्टा परवाना दिलेला होता.त्याची काढण्याची मुदत दि.5/6/2020 पासून ते मुदत दि.20/6/2020 पर्यंत सम्पात होत आहे.सदरिल खान ही मौजे वलखेड़ा गट न.25 आणि 31मध्ये परवानगी देण्यात आली.दगड काढण्याची मुदत समाप्त होऊन एक महीना उलटला तरी देखील उत्खनन सुरुच आहे.
कलाठिया कंपनीला 7000 ब्रास गौण खनिज दगड काढण्याची परवानगी आहे.म्हणून संबधित अधिकारी यांनी कलाठिया कंपनीचा चाललेला भोंगळ कारभार तात्काळ बंद करावा.आणि स्थल पंचनामा करुण ती खान सिल करण्यात यावीत.शासनाने दिलेल्या परवानगी ची पायमल्ली कलाठिया कंपनी करत आहे.त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावीत.तसेच वाहतुकीसाठी शासकीय वाहतुक पासेस खनिकर्म अधिकारी यांच्या कडून घेण्यात आल्या का? यांची ही तपासणी करण्यात यावी.दगड उत्खनन परवानगी ची मुदत संपुन ही कलाठिया कंपनी राजरोज पणे सर्व नियम धाब्यावर बसवत आहे.
मर्यादा पेक्षा एक महीना जास्त दगड उत्खन करून अवैध रित्या काढलेला दगड कुठे नेण्यात आला?आणि विशेष म्हणजे या वर नियंत्रण ठेवनारी महसूल यंत्रणा गप्प का?तसेच परवाना दिला असल्याची माहितस्तव प्रत संबधित मंडल अधिकारी,तलाठी यानां ही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून देण्यात आलेली असते ,मग मुदत संपुन एक महीना उलटला तरी सुद्धा उत्खनन सुरु कसे ?आसे मत रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्ही खरात यांनी प्रसिद्धि पत्रकात व्यक्त केले आहे.

कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन.


अकोला,ब्युरो चीफ :- वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे काल दुःखद निधन झाले.
वंचित बहुजनांचा आवाज समजल्या जाणाऱ्या तसेच सातत्याने कोळी समाजाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देणाऱ्या सुमन ताई कोळी यांचे दुःखद निधन झाले. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


सोमवार, २७ जुलै, २०२०

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संरक्षण करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



सिडको ने पाडलेल्या केरुमाता बौद्ध लेणी ला ना रामदास आठवलेंनी दिली भेट

बौद्ध लेण्यांच्या पुरातन अवशेषांचे लेण्यांचे जतन करण्यासाठी भव्य बौद्ध स्तूप उभारण्याची ना रामदास आठवले यांची सिडको ला सूचना;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविणार



मुंबई,ब्युरो चीफ  :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी 1हजार 100 हेक्टर जागेत पनवेल तालुक्यातील 10 गावांचे पूर्वसन करण्यात आले असून त्यात  येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे.  विमानतळाला आमचा विरोध नाही मात्र  बौद्ध लेण्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी 
भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आपण प्रयत्न करू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 5 एकर जागेत भव्य बौद्ध  स्तूप उभारून बौद्ध लेण्यांचे अवशेष जतन करावे या मागणी साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

उलवे पनवेल येथून जवळ असणाऱ्या वाघिवली वाडा येथील कोंबडभुजेमधील केरुमाता बौद्ध लेणी सिडको ने पाडल्यानंतर तेथे आज ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.

पाडण्यात आलेल्या केरुमाता  बौद्ध  लेणीचे पुरातन अवशेष सुरक्षितरित्या उत्खनन करून जतन करावेत. त्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ  भव्य बौद्ध स्तुप उभारावा अशी सूचना सिडको प्रशासनाला ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.यावेळी पनवेल चे उपमहापौर आणि रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड; सुरेश बारशिंग; नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ; महेश खरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

  नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येणाऱ्या परिसरात केरुमाता बौद्ध लेणी तसेच कुंडेवहाळ येथील कुलुआई मंदिर; ओवळा पाणेरी आई लेणी आणि दापोली येथे राणू आई  लेणी या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याला मार्फत प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.
डॉ.कफिल खान यांची तात्काळ सुटका करा- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा

         राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या वतीने निवेदन सादर.


हिंगणघाट,ब्युरो चीफ :- राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत
मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा च्या माध्यमातून डॉ कफिल खान यांच्या सुटकेसाठी दिनांक 27-07-2020 सोमवार रोजी राष्ट्रपतीला हिंगणघाट तहसीलदार द्वारा निवेदन देण्यात आले.
लोकशाही मध्ये सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात आंदोलन करणे हा देशातील प्रत्येक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकारांतर्गत संविधानिक मार्गाने एनआरसी, सिएए या कायद्या विरोधात देशभर आंदोलन झाले होते, लोकडाऊन च्या काळात केंद्र सरकार द्वारे विशेषतः एनआरसीचा विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्याला व विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
या कायद्याचा विरोध करणारे डॉ कफिल खान वर खोट्या आरोपात कारागृहात टाकण्यात आले, या अगोदर गोरखपूर अपघात घटनेत डॉ कफिल यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मुलांचा जीव वाचविला होता, त्याठिकाणी उत्तरप्रदेश सरकारच्या हलगर्जीपणामुळे ७० मुलांचे जीव गेले, त्यावेळी सुद्धा त्यांच्यावर खोटे आरोप लावून कारागृहात टाकल्या गेले होते त्यानंतर डॉ कफिल खानची सुटका झाली.आताही डॉ कफिल खानला नाहक त्रास देऊन कारागृहात टाकण्यात आले आहे जिथे डॉ कफिलच्या जीवाला धोका आहे.त्याचप्रमाणे एनआरसी,सिएए चा विरोध करणारे जेएनयु, जामिया इस्लामीया आणि अलिगढ मुस्लिम विश्वविद्यालय च्या विद्यार्थ्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेले आहे, नुकत्याच झालेल्या दिल्लीतील दंग्यांमध्ये पोलीसद्वारा हाच मार्ग आजमावल्या जात आहे,   
याविरोधात संपूर्ण भारतात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ३५राज्य,५००जिल्हे आणि ४००० तहसील मध्ये मा.राष्ट्रपती ला मा.तहसीलदार द्वारे निवेदन देण्यात आले, सर्व विद्यार्थ्यांवरच्या खोट्या केसेस तात्काळ मागे घेऊन डॉ कफिल खान यांची सुटका करावी असे निवेदन देत राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष हाजी मिर्जा परवेज बेग, तालुका अध्यक्ष तालिब शेख, शहर अध्यक्ष महम्मद शाकिर, बहुजन क्रांती मोर्चा संयोजक इंजि.निखिल कांबळे, मयूर पाटील, गेमदेव म्हस्के, नम्रता नरांजे बिविसीपी, गजानन माऊसकर, लक्ष्मीकांत जवादे, चंद्रहास कांबळे,गजानन वऱ्हाडे, संजय डोंगरे इत्यादी सहयोगी संघटन उपस्थित होते.

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

                          अण्णाभाऊंना भारतरत्न का मिळावा

मित्रहो
         बहुतांश पुढारी नेते अण्णाभाऊं कडे फक्त एक महान लेखक व कवी या दृष्टिकोनाने पाहतात पण याच्या पलीकडेही अण्णाभाऊंचे योगदान हे फार मोलाचे आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी येथील शेतकरी कष्टकरी कामगार यांची व्यापक चळवळ उभी केली व एक मोठा निकराचा लढा अण्णाभाऊंनी दिला लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णा भाऊंनी आपल्या पहाडी आवाजाने शाहिरी सादर करून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जनजागृती केली त्यामध्ये शाहीर शंकर भाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर शाहीर पट्टे बापूराव कुलकर्णी यांनी अण्णाभाऊंना मोलाची साथ दिली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी अण्णाभाऊंनी एक मोठा क्रांतीचा लढा या महाराष्ट्रात उभा केला व अखेर ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली 15 ऑगस्ट 1947 साली हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947 साली अण्णाभाऊंनी आझाद मैदान मुंबई येथे 20 हजार लोकांचा मोर्चा काढला व त्यामध्ये यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है ही प्रमुख घोषणा देण्यात आली अण्णाभाऊ आपल्या वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत असं म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून येथील दलित कष्टकरी कामगार यांच्या तळहातावरती तरलेली आहे बंगालच्या फाळणीनंतर बंगालची हाक हा पोवाडा लिहून अण्णाभाऊंनी मानवतेचे दर्शन या जगाला घडवलं तसेच गोवा मुक्तिसंग्राम व हैदराबाद मुक्तिसंग्राम यामध्ये अण्णाभाऊंचे अमुलाग्र योगदान आहे तसेच छत्रपती शिवबांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकात डफावरची थाप मारून गाणारे अण्णाभाऊ होते छत्रपती शिवरायांचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे अण्णाभाऊ साठे होते अण्णाभाऊ हे महान लेखक व कवी होतेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन अण्णाभाऊ हे एक थोर महान समाजसुधारक थोर महान क्रांतिकारक होते. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनातून येथील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या वरती घाव घातला व जे नायक-नायिका काळाच्या पडद्याआड गेले होते त्यांना अण्णाभाऊंनी पुन्हा जिवंत केलं अण्णाभाऊंनी ज्या प्रकारे आपल्या फकीरा कादंबरीत फकिराला जे स्थान दिलं तसेच स्थान शंकर पाटील व विष्णुपंत कुलकर्णी यांनाही दिले या भारताची संस्कृती खर्‍या अर्थाने कोणी जगासमोर मांडली असेल तर ती आण्णाभाऊंनी मांडली आहे आणि म्हणूनच भारतरत्न या पुरस्काराचे खरे हक्कदार साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हेच आहेत 2019-20 हे अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे देशभरातून अण्णाभाऊंच्या अनुयायांकडून अण्णा भाऊंना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतरत्न ची मागणी केली जाते व शासनाने या मागणीला अनुसरून अण्णा भाऊंना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन अण्णाभाऊंचा गौरव करावा अशी मी शासनास विनंती करतो

          सुरज साठे
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे
       जन्मभूमी वाटेगाव
         9370626619

रविवार, २८ जून, २०२०

जिल्ह्यात 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 19 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

जालना,ब्युरोचीफ :- शहरातील लक्ष्मीनारायणपुरा 02, संभाजी नगर 02, रामनगर विनकर कॉलनी 01, नरिमननगर 01,रहेमान गंज 01,आनंदनगर 03, समर्थनगर02, लक्कडकोट04,खडकपुरा 03 अशा एकुण 19 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील नळगल्ली 01, संजोग नगर 01, क्रांती नगर 01,यशोधरा नगर 01, खडकपुरा 05,अंबड रोड जालना 01, मंगळबाजार 02,रहेमान गंज 15, योगेश नगर 01, सत्यनारायण चाळ 01,मस्तगड 01,दानाबाजार 10,पानशेंद्रा ता. जालना येथील 01,भारज बु ता जाफ्राबाद येथील 01, अशा एकूण 42 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–4012 असुन  सध्या रुग्णालयात-130,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1563, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–46, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5063 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–42 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-504, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4503 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-52, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1420.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–03, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1255, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-33, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-213, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-43, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-130, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-58, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-19, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-336, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-142 तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-13087, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे.आजसंस्थासत्मवक अलगीकरणात असलेल्या0 व्यखक्तींबची संख्या  213 असून /संस्थारनिहाय माहिती पुढील प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_03,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37,बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-13,मॉडेल स्कूल परतुर-10,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01,शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-16,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी _02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-17,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-20, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल टेंभुर्णी ता.जाफ्राबाद 20,जे बी के विद्यालय टेंभुर्णी 00,शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 00,आय टी आय  महविद्यालय जाफ्राबाद 12.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 888 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 49 हजार 530 असा   एकुण 4 लाख 76 हजार 338 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  

जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीसाठी बंद - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी


जालना,ब्युरोचीफ :- कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायययोजना नियम 2020 मधील तरतुदीनुसार जालना शहरातील नवीन जालना ते जुना जालना येथे होणारी नागरिकांची वाहतुक बंद करण्याच्या अनुषंगाने जालना शहरातील लक्कडकोट, मस्तगड, रामतिर्थ व राजमहाल टॉकीज येथील पुल नागरिकांच्या रहदारीस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येऊन पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

बाजार गेवराई येथील नवतरूण शेतकऱ्यांची आत्महात्या..!


बदनापूर,ब्युरोचीफ :- बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई येथे दिनांक 28 सकाळी 03:00 दरम्यान जोरदार पावसामुळे सदर शेतकऱ्याच्या कापुस बाजरी आदी पिके वाहुन गेल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटामुळे निराश होऊन सदर शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले  व आपल्या राहात्या घरी विषारी औषध प्राशन केले नातेवाईकांनी उपचारासाठी औरंगाबाद रूग्णालयात नेत असताना  रस्त्याच प्राणज्योत मावळली सदर शेतकऱ्यांच्या  नवतरूण शेतकरी बळीराम ज्ञानेश्वर कान्हेरे वय 24 राहात्या  दिनांक 28 संकाळी: 11:00 वाजेदरम्याण घरी असलेल्या मोनोसिल नावचे मागिल वर्षीची आणलेल्या औषध प्राशन केले सदर शेतकऱ्यांचे  वडील  अशिक्षित असल्याने सदर बळीराम हा  शेती व अथिंक  व्यवहारात हा नवतरूण शेतकरी करत होता सदर  त्याच्या पश्चात आई वडील भाऊ आजी असा परिवार आहे.

बदनापूर शहरासहित लागत असलेल्या गावावर पुन्हा धोधो पाऊस


नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत भर


बदनापूर,ब्युरोचीफ :-  बदनापूर शहरासह लगत असलेले गावावर पावसाचा पुन्हा मारा आज दु. 03: 45 वाजेला पावसाची सुरुवात झाली असून आधीच अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यात पुन्हा पावसाचा भर पडला पुन्हा नदीनाले एक झाल्याचे चित्र निर्माण झाले शेतामध्ये पाणी साचल्याने तलावाच स्वरूप निर्माण झाले. दुधा नदीचा आणखीन ओघ वाढला तर अधिक पाऊस झाल्याने आता शेतकऱ्यांना थोडी पावसाने दिलासा द्यायला हवा जेणेकरून शेतकरी हा शेतात पेरलेल्या पिकांचं नुकसान होणार नाही अशीच चर्चा सर्वसामान्य शेतकऱ्यांची गावागावातून व चव्हाट्यावर होत आहे.काळ्या आईच्या गर्भात नुकतेच पेरणी करून मोकळा झालेला बळीराजा आता चिंतेत आहे.की पेरलेलं पीक उगतका नाही जमिनीतच सोडून जाते असे चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे. म्हणून तरी पावसाने थोडा दिलासा द्यायला हवा अशी ही आता चर्चाला उधाण आल आहे.

अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मनसेचे जिल्हा अध्यक्ष गजानन गीते यांनी दिले रोहयो मंत्र्यांना निवेदन.


बदनापूर,ब्युरोचीफ:- तालुक्यातिल अतिवृषटी झालेल्या गावाना रो.ह.यो.मंत्री मा.संदीपानजी भुमरे साहेब भेट दिली अस्ता मनसे जालना जिल्हया च्या वतिने निवेदन दिले व तालुक्यातिल सर्व शेतकरया चे नुक़सान झालेली माहीती सांगीतली व मंत्री महोदयानी पूर्ण निवेदन वाचले व उद्याच्या क़ॅबीनेट मधे ही सर्व माहीती देउन तत्क़ाळ मदत जाहीर करतो या  दौरया वेळी सोबत मा. माज़ी मंत्री सन्नमांनिय अर्जुनरावजी भाऊ खोतकर ,आमदार नारायणरावजी कुचे साहेब,मा.आमदार संतोष जी सांबरे साहेब ,शिवसेना जिल्हा प्रमुख मा.भास्कररावजी अंबेकर साहेब,जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे साहेब,मनसे चे ज़िल्हाध्यक्ष गजानन गिते ,कॅाग्रेंस चे जेष्ट नेते भिमराव जी आबा डोंगरे साहेब , भानुदासरावजी घुगे नाना,सभापती जयप्रकाश दादा चव्हान ,भाऊसाहेबजी पाऊलबुधे ,सरपंच राजुबापू जर्हाड,शिवसेना तालुका संघटक नंदुभाउ दाभाडे,बालाभाऊ परदेशी,निव्रती महाराज डाके,शेतकरी संघटनेचे संतोष आबा चव्हान,राष्ट्रवादी चे नारायण राव अवघड़,शिवाजीराव कराड़ ,मनसे चे गोविंद काळे,तहसीलदार छ्याया ताई पवार ,व शासन प्रशासनातील सर्व अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षाचे नेते व पत्रकार बांधव उपस्थित होते..


जालना औरंगाबाद रोडवर सारथी पेट्रोलपंप समोर बाप लेकाचा अपघात


बापचा जाग्यावर मृत्यू तर मुलगा जखमी.

बदनापूर ब्युरोचीफ :- बदनापूर मधील पाडळी येथील साधारण कुटुंबातील आप्पा लक्ष्मण सिरसाठ व परमेश्वर आप्पा साहेब सिरसाठ हे दोघे बाप लेक जालना औद्योगिक वसाहतीत रुपम स्टील कंपनी मध्ये अनेक वर्षांपासून मजुरी कामानिमित्त दुचाकीवरून जाय ये करत असे परंतु  काल काळाने घाला घातला आणि होत्याच नव्हतं झाल.
  दि.27: वार शनिवार रोजी दोघे बाप लेक कामा वरून घराकडे येत असताना सायंकाळी 8:00 वाजता  औरंगाबाद- जालना रोडवरील महिको कंपनी च्या लगत असणारा सारथी पेट्रोपम वर दुचाकीत पेट्रोल टाकून निघाले आणि काही हाकेच्या आंतरावर हावे रोड वरती अचानक पाठीमाघून येणाऱ्या अनोळखी गाडीने धडक दिली त्यात  अप्पासाहेब लक्ष्मण सिरसाठ यांना डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर  अवस्थेत जाग्यावर मृत्यू झाला तर मुलगा परमेश्वर आप्पासाहेब शिरसाट हा  जखमी अवस्थेत असताना जालना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते.
अप्पासाहेब लक्ष्मण शिरसाट यांना जालना सिविल हॉस्पिटल  येथे दाखल करण्यात आले परंतु डॉ यांनी मृत्यू झाले असे सांगितले येथे पीएम करण्यात आले असता दि.28 रोजी आज सकाळी 11:30 वाजता पाडळी गावी येथे त्यांच्या पार्थिवर अंतिम संस्कार करण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी दोन सुना आहे..
तर संपूर्ण पाडळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची पत्रकार परिषद संपन्न


कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा


जालना,ब्युरोचीफ :-  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती देत कोरोनाला जालना जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी जनतेने प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क, सॅनिटायजरचा सातत्याने वापर करण्याबरोबर सामाजिक अंतराचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेमधील मुद्दे

·         जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची एकुण संख्या 504 एवढी झाली असुन आजपर्यंत 317 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.  13 रुग्णांचा मृत्यू झाला असुन आजघडीला जिल्ह्यात 174 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

·         केवळ अर्ध्या तासामध्ये कोरोनाविषाणुने व्यक्ती बाधित आहे किंवा नाही हा अहवाल देणाऱ्या अँटीजेन टेस्टसाठी 50 हजार किटसची मागणी नोंदविण्यात आली आहे.

·         जिल्ह्यामध्ये अँटीबॉडी टेस्टसाठी 100 किटस उपलब्ध असुन या माध्यमातुन शास्त्रोक्त पद्धतीने  व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे.

·         नवीन जालन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक असुन त्यामानाने जुन्या जालन्यामध्ये संख्या कमी आहे. विनाकारण नागरिक नवीन जालना व जुन्या जालनमध्ये गर्दी करत असल्यामुळे होणारी  गर्दी टाळण्यासाठी जुन्या व नवीन जालन्याला जोडणारे पुल काही काळासाठी बंद करण्यात येत असुन या पुलावरुन केवळ रुग्णवाहिकेला वाहतुकीची परवानगी असणार आहे.

·         पालकमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने जालना जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब उभारणीस मंजुरी दिली असुन या लॅबचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.  येत्या काही दिवसात लॅबचे काम पुर्ण होऊन सुसज्ज व अद्यावत अशी लॅब सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले असुन या लॅबसाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

·         कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर्स, आरोग्य सेविका यांचे मनोबल कायम रहावे यासाठी मानसोपचार तज्ज्ञांमार्फत या कर्मचाऱ्यांचे समुपदेश करण्यावर भर देण्यात येत आहे.

·         पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 29 दिवसामध्ये कोव्हीड हॉस्पीटलची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी 40 व्हेंटीलेटर बरोबरच सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्या आल्या आहेत.  पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

·         ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

·         60 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व मधुमेह, ऱ्हदयरोग, रक्तदाब यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचे घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना संक्रमितांच्या संपर्कात आलेला अथवा कंन्टेन्टमेंट झोनमध्ये असतील अशा व्यक्तींना तातडीने उपचार करण्यात येणार आहेत.

·         कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतराचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायजरचा वापर अथवा साबणाने वारंवार हात धुणे या बाबींची सवय अंगिकारावी.

·         समाजातील प्रत्येक नागरिकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहाराबरोबर प्राणायाम, व्यायाम  सारख्या बाबींचा अवलंब करण्याबरोबरच मानसिक स्वास्थ टिकुन राहण्यासाठीही प्रयत्न करण्याची गरज.

·         पल्स ऑक्सीमीटरच्या माध्यमातुन एसपीओ2, ब्लड सॅच्युरेशनचे प्रमाण कळत असल्याने प्रत्येक नागरिक घरातल्या घरात तपासणी करु शकतो.  94 पेक्षा लेव्हल असेल व आपल्याला सर्दी, खोकला किंवा ताप यासारखी लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयास संपर्क साधावा.

·         सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली खरी माहिती द्या. जेणेकरुन आपल्याला काही त्रास असल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल.

·         जालना जिल्हयात एकुण 119 कंन्टेन्टमेंट झोन होते. त्यापैकी 37 झोन ॲक्टीव्ह असुन या झोनमधुन एकही व्यक्ती बाहेर जाणार नाही अथवा या झोनमध्ये येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.

·         प्रत्येक कंन्टेन्टमेंट झोनमध्ये 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला असुन या ठिकाणी पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी बारीक लक्ष ठेऊन आहेत.

·         सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणे तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच नगर पालिकेमार्फत कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींकडून १२ लक्ष रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.  तसेच सामाजिक अंतर न पाळणाऱ्या 309 व्यक्तींवर तर दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 263 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

·         जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये हाय व लोरिस्क सहवासितांचा अचुकपणे शोध घेण्यात येत आहे.

7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या। सबबीखाली शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आदेश जारी.


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीककर्ज मिळण्यासाठी बँकांकडे प्रस्ताव सादर करण्यात येत आहेत.  परंतू संबंधितास तहसिल कार्यालयाकडून 7/12,8-अ व फेरफार नक्कल सादर करण्यासाठी बँकांकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी तहसिल कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असुन सद्य:स्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असुन अशा परिस्थितीत होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आदेश निर्गमित करुन सर्व सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी पीककर्जासाठी बँकेत आलेल्या शेतकऱ्यांचे 7/12,8-अ किंवा फेरफार जोडलेला नाही या त्रुटीच्या सबबीखाली त्यांचे पीककर्ज प्रस्ताव नाकारु नयेत, तसेच अशा शेतकऱ्यांचे कागदपत्रे मिळण्यासाठी गावनिहाय यादी करुन संबंधित बँक शाखेने संबंधित तहसिल कार्यालयास खास दुतामार्फत किंवा शाखा समन्वयकामार्फत दररोज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, व्यापारी व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अथवा समन्वयकामार्फत 7/12,8-अ व फेरफार नक्कलसाठी प्राप्त यादीनुसार आवश्यक ती कागदपत्रे  संबंधित बँकांना संबंधित तलाठ्यामार्फत प्राप्त करुन घेऊन नि:शुल्क उपलब्ध करुन देण्याचेही निर्देश दिले आहे.

घडीपुस्तिकेचे रोहयो मंत्री श्री भुमरे यांच्या हस्ते विमोचन रोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे


जालना,ब्युरोचीफ :- रोजगार हमी योजना विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वृक्ष लागवड विषयी योजनांची माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे विमोचन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते अंबड तालुक्यातील पाहणी दौऱ्याप्रसंगी करण्यात आले. अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाने योग्य रीतीने पार पाडण्याबरोबरच योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे आवाहन रोहयो मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी केले. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर,उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.घडीपत्रिकेमध्ये दि. 12 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयानुसार मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत व दि. 30 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीमार्फत रोपवन संरक्षण व संगोपनाबाबत (बिहार पॅटर्न) विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  तसेच मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्यासाठी पात्र लाभार्थी, वृक्षलागवड करण्यायोग्य प्रजाती, वृक्षलागवड मुदत, कलमे/रोपे पुरवठा तसेच लाभार्थ्यांची जबाबदारी इ. विषयी  व ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या रोपवणाचे संरक्षण, देखभाल व संगोपन विविध पद्धतीने करून जिवंत रोपांची टक्केवारी वाढविण्याचा शासनाचा उद्देश असून संगोपनाचा कालावधी, कुटुंबाच्या गटाची निवड व त्यांची कामे,  मजुरीचे निकष, रोजगाराची गणना आदीविषयी  घडीपत्रिकेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वृक्षलागवड करण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेकडून संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.अधिक माहितीसाठी तालुकास्तरावरील सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी तसेच विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, जालना यांचे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडून पहाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.


जालना,ब्युरोचीफ :- बदनापुर व अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दि. 27 जुन रोजी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन केली.  झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्यात मंत्री महोदयांसमवेत आमदार नारायण कुचे, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे,भाऊसाहेब पाऊल बुद्धे, अशोक बर्डे, दिनेश काकडे, सिद्धेश्वर उबाळे, उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक माईनकर, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आदींची उपस्थिती होती.
यावेळी रोहयोमंत्री श्री भुमरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांच्या सुचनेनुसार बदनापुर व अंबड तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यात आली असल्याचे सांगत पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याच्या प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येणार असुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचेही मंत्री श्री भुमरे यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री महोदयांनी अंबड तालुक्यातील हरतखेडा, बठाण खुर्द, बदनापुर तालुक्यातील नानेगाव, बाजार वाहेगाव वाकुळणी, धोपटेश्वर व रोशनगाव या गावांना भेटी देऊन पहाणी केली.

शनिवार, २७ जून, २०२०

शहरात अवैध तांदूळ   व गावठी दारूधंदा खुलेआम सुरू प्रशासनाचा  सोयीस्करपणे काणाडोळा

 
धर्माबाद (भगवान कांबळे) :- धर्माबाद तालुक्यासह शहरातही अवैध व्यवसायाचा धुमाकूळ सुरू आहे  पेट्रोल ,गावठी दारू, शिंदी ,अवैद्य गूटखा व अनेक अवैद्य धंदा खुलेआम सुरू आहेत.प्रशासन मात्र आपल्या  सोयीस्करपणे काणाडोळा करीत आहे. महाराष्ट्रात गूटख्यावर बंदी असुन धर्माबाद शहरात व तालुक्यात गूटखा येतोच कसा आणतो कोण गूटखा आणते वेळी प्रशासनाने चे आधीकारी जाताता कुठे सध्या तर रेल्वे गाड्या बंद आहेत व महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या  धर्माबाद शहराला जोडणा-या   तिन्हीही सिमा चेक पोस्ट बनवलेले आहेत ऐव्हढा तगडा बंदोबस्त असुन देखील शिंदी गूटखा हे शहरात येतात कसे हा देखील मोठा संशयित  प्रश्न  आहे; मात्र धर्माबाद शहरात व तालुक्यात  धंदे मात्र तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. अवैध धंदेवाल्यांनावर कारवाई केली जात नसल्याने जनतेची प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.   देशात कोरोना ची महामारी सुरू आहे  व नांदेड जिल्ह्यातील कोरोणा बाधीत रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता व राज्य सरकारच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी साहेबांच्या आदेशानुसार  नांदेड जिल्ह्यात सकाळी 8ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या व्यवसाय करुन संध्याकाळी 5 वाजता सर्व दुकाने बंद करा आसा आदेश आहे पण 5 वाजल्यानंतर देखील  दारूविक्री चोरुन चढ्या भावाने  छुप्या पद्धतीने अवैध पद्धतीने दारूविक्रीचा काळाधंदा तालुक्यात जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक देशी व विदेशी दारूविक्रीचा धंदा करणाऱ्या मंडळींनी छुप्या पद्धतीने चढ्या दराने दारू शिंदी  विक्री करीत आहे.  प्रशासन  आणि अवैद्यव्यवसाय करणा- यांच्या संगनमताने हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.  धर्माबाद  शहरात मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे  वाढल्याने या व्यवसायाची चलती आहे. तसेच, दारू व जुगार यामुळे अनेक घरांत कलह वाढले आहेत, धर्माबाद शहरातील काही बारचे  मालक बारच्या मागच्या दारातून  दारु बियर  प्लॅस्टिसक च्या  पिशवीत आणून सर्रास विक्री करत आहे. यामध्ये रोज लाखो रुपायांची उलाढाल होते. रत्नाळी जवळील पोचमा माता मंदिराच्या आवारात कायम तळीरामाचा अड्डा असतो. या परिसरात सर्वत्र रिकाम्या दारूच्या बाटल्या व गावठी दारु रिकाम्या झालेल्या पिशव्या शिंदी  पडल्या आहेत.  शासनाने गरिब जनतेला तिन महिने मोफत  कोपीन वाटप करा आसा आदेश दिले पण कोपीन दुकानदार मात्र कमी वाटप करुन मापात पाप केले आहेत व करत आहेत   शासनाने  धर्माबाद ला राशन (कोटा) पाठवले खरे पण कोपीन वाटप करणारे हे प्रशासनाच्या  अधिका-यांशी हात मिळवणी करुन हजारो किंन्टल तांदूळ  हे शहरातील अनेक राईस मील ला पाठवत आहेत व  त्याच तांदूळाला पाॅलीस करुन जनतेला चढ्या भावाने विक्री करत आहेत.  धर्माबाद शहरात तेलंगण्यातुन चोरट्या रस्ताने येत आसलेला तेलंगण्यातील तांदूळ विक्री करण्यासाठी  खुर्ची टाकून खरेदी चा  व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहे.हे दारु विक्रेता  व अवैद्य तांदूळ खरेदी करणारे भुसार दुकानदार हे  धनदांडगे व त्यांचे राजकीय लोकांचा नातेवाईक असल्याने कोणीही पोलिसांत तक्रार देत नाही. खुलेआम चालणारा धर्माबाद तालुक्यातील अवैद्य  व्यवसाय व गावठी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरत आहे. एकीकडे शासन अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कायदा करते, त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत मात्र सखोल चौकशी होत नाही. त्यामुळे अशा धंद्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व तालुक्यातील आसलेल्या कार्यालयातील काही अधिकारी सोडले तर अधिकारी आर्थिक तडजोडी शिवाय कामाची फाईल पुढे सरकत नाही. सामान्य नागरिकांनी मदत मागावी कोणाकडे या संभ्रमात आहे.

रासायनिक खत माफिया नामांकित कंपन्यांच्या खातात भेसळयुक्त,खत निर्माण करून. शेतकऱ्यांना विक्री करत आहेत. या रासायनिक खत माफियांना कृषी अधिकाऱ्यांचे व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठबळ सहकार्य करत असल्यामुळे यांच्यावर सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे - प्रकाश सोळंके


जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षा पासून रासायनिक खत माफिया शेतकऱ्यांना फसवत आहेत. रासायनिक खत माफियांना कायमस्वरूपी काळाबाजार बंद हवा. यासाठी खासबाब म्हणून एक वर्षासाठी पोलिसांना अधिकार द्यावेत. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षा पासून रासायनिक खत माफिया भेसळयुक्त रासायनिक खत शेतकऱ्यांना विक्री होत असल्यामुळे उत्पन्नात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रासायनिक खतात भेसळ करून विक्री रासायनिक खत माफिया जालना जिल्ह्यात खुप वर्षापासून सक्रिय आहे. या रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या मालकीच्या काही रासायनिक खत निर्माण करणाऱ्या कंपन्या मालकीच्या असल्यामुळे, नामांकित रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ प्रक्रीया यांच्या मालकीच्या कंपनी मध्ये भेसळ करून हे भेसळयुक्त बोगस विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध असते. यांच्याच संबंधातील जवळच्या लोकांना नामवंत कंपन्याच्या अधिकृत (डीलरशिप) भेटल्यामुळे या रासायनिक खताच्या बॅगमध्ये सहज भेसळ करून अनेक वर्षापासून हे भेसळयुक्त रासायनिक खत माफिया खत विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत.या रासायनिक खताच्या बॅगमध्ये भेसळ होत असल्याची संपूर्ण माहिती नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना व कृषी अधिकाऱ्यांना माहिती असेल परंतु हि यंत्रणा रासायनिक खतात भेसळ करून विकणाऱ्या टोळी कडे  दुर्लक्ष आहेत. रासायनिक खत भेसळ करणाऱ्या टोळीचे व नामांकित कंपन्यांच्या अधिकृत विक्रीत्यांच्या आर्थिक संबंध आसल्यामुळे भेसळयुक्त रसायन खत माफिया सहज विक्री उपलब्ध करून विक्री करतात.तसेच भेसळ रासायनिक खत विक्री करण्यात मोठमोठ्या नामवंत कंपन्यांच्या खताच्या बॅगमध्ये भेसळ करून जशास तसे लेबल सील करून अधिकृत विक्रेत्या मार्फत विक्री होते. उदाहरणार्थ: ही टोळी भेसळ कशी करते एखाद्या नामवंत कंपनीची खताची बॅग ५० किलो वजनाचे असते. त्या बॅगमध्ये २५ मूळ मात्रा असल्याले खत ठेवतात व २५ किलो खराब दाणेदार खत किंवा वाळु मिश्रण करून जशास तसे लेबल सील करून भेसळयुक्त रासायनिक खत विक्रीसाठी मार्केटमध्ये उपलब्ध होते.म्हणून प्रत्येक चांगल्या नामवंत कंपनीच्या खतात भेसळ करतात कारण या नामवंत कंपनीच्या खताला शेतकऱ्यांची मोठी मागणी असते. याचा गैरफायदा घेऊन हि टोळी खत मिश्रण करून कोट्यावधी रुपयांची कमाई करुन घेतात. या खत माफिया यांना कृषी अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे खत माफिया कोणालाही काही जुमानत नाहीत.म्हणून या वर्षी रासायनिक खताचे प्रत्येक डीलरच्या गोडाऊन मधून सॅम्पल घेऊन ५ ठिकाणी क्रॉस तपासणीसाठी पाठवावेत. या रासायनिक खत माफियांचा काळ्याबाजाराला आळा बसेल. रासायनिक खतांचा बॅग भेसळ असते हे कधीच कोणाच्या लक्षात येण्यासारखा नाही.कारण बिचारा शेतकरी विश्वासाने रासायनिक खत खरेदी करून सरळ शेतात घेऊन जातो, म्हणून याची कोणाच्याही मनात शंका पण येत नाही. खत माफिया रासायनिक खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून.  खत माफिया रासायनिक खताचा काळाबाजार सुरू करतात.पण या मध्ये सगळ्यात जास्त नुकसान मोठे शेतकर्‍यांचे होते.कारण  शेतकरी अधिकचे पैसे देऊन शेतकरी खत माफियांच्या जाळ्यात गुतुन जातो. हे खत माफिया अनेक वर्षापासून रसायनी खताचा काळाबाजार चालवत आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळ्या घराण्यातील मुख्यमंत्री मिळाल्यामुळे आपल्याकडून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वेगळी अपेक्षा आहे. एक वर्षासाठी भेसळयुक्त रासायनिक खत विक्रीवर करणाऱ्या रासायनिक खत माफिया टोळीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयोगिक तत्वावर खासबाब म्हणून पोलीस यंत्रणेकडे अधिकार द्या.या रासायनिक खतावर नियंत्रण ठेवणाऱ्या कृषी अधिकारी व संबंधित नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे सरकारमार्फत दाखल करण्यात यावेत. रसायनिक खताच्या सर्व डीलर यांच्या गोडाऊन मधून सॅम्पल घेऊन ठिकाणी क्रॉस तपासणीसाठी पाठवावे. खत माफिया जिल्हा कृषी अधिकारी यांची निडर सक्षम, निस्वार्थी अधिकारी व पोलीस चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना निवेदना मार्फत केली आहे.


अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या तसेच वारंवार निवेदन तक्रारी देऊन, देखील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर कारवाई न करता. अवैध वाळु, मुरुम ,दगड, चोऱ्या करणाऱ्या माफिया यांच्यावर कारवाई  करणार्या  बेजबाबदार मंठा तहसीलदार यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात यावी- प्रकाश सोळंके

  

जालना, ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आपल्याच महसूल विभागाचे अधिकारी कुठेतरी आपल्या विभागाला मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत .असाच एक प्रकार म्हणजे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील भ्रष्टाचारी तहसीलदार यांच्या कडुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या न जाता. तालुक्यात अवैध धंदे करणार्या लोकांच्या वर कारवाई करण्याऐवजी सर्वार्थाने अप्रत्यक्षपणे सहकार्य करित आहे. यात मंठा तालुक्यातील तळणी मंडळ अधिकारी सज्जा अंतर्गत तसेच गोसावी पांगरी सज्जा अंतर्गत  येणाऱ्या नदीपात्रातून वाळु उपसा बेसुमार केल्या जात आहे. पुर्णा नदीपात्रातून लिलाव झालेला नसताना देखील राजरोसपणे वाळु चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचे अणेक वेळा मंठा तसीलदार यांना सबळ पुरावे यांना दिलेले असताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी यांच्या कडुन रेती माफिया विरुद्ध कारवाई केली जात नाही. या अधिकाऱ्यांचे संबंधित रेती माफिया यांच्या बरोबर हफ्ते खाऊ धोरण नेहमीचे असल्याने कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे हायवा, टिपर टकटर द्वारे वाळु बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, या परिसरातील भागात विक्री केली जाते, तसेच जालना, परतुर, अंबड, इतर ठिकाणी जाते. या दोन्ही तालुक्यात वाळूमाफियांनी वाळूचा साठा करून.हायवा,टिपर, टकटर , एका हायवा ची किंमत ३५ ते ४० आहे. ही वाहने भरायला मजूर असतात. वाहनांचे इतर ठिकाणी जाणे-येणे असल्यामुळे कोरोना रुग्ण वाढू शकतात म्हणून.मंठा तालुक्यातील नागरिकांमध्ये भिंतचे वातावरण पसरले आहे. तसेच बाहेरील जिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी  महसुल विभागाचया वतिने व्यवस्था करण्यात हलगर्जीपणा केला .गावात तलाठी,मंडळ अधिकारी असताना मंठा तालुक्यातील ९०% ठिकाणी कार्यालय फक्त कागदावरच अधोरेखित केले आहे. वस्तुस्थिती मध्ये मंडळ अधिकारी तलाठी कार्यालय अस्तित्वात नाही. हि बाब सत्य आहे. यामुळे मंठा तालुक्यातील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेरुन आलेल्या लोकांची तलाठी मंडळ अधिकारी गैरहजर असल्याने गैरसोय झाली होती.यामुळे गावात येणार्या लोकांना कवारनटाईन करण्याचे शासनाच्या आदेशानुसार कामकाज होत नसल्याचे चित्र होते, जिल्हाधिकारी जालना यांनी गावपातळीवर कृति समिती गठीत केली आहे त्याचे अध्यक्ष तलाठी आहेत. स्वस्त धान्य दुकानदार यांच्या कडुन काळाबाजार रोखण्यासाठी माञ तलाठी धान्य वाटप करताना गैरहजर असतात, तलाठी मंडळ अधिकारी सज्जा ठिकाणी निवासी न राहता जालना, औरंगाबाद, लोणार , परभणी अशा ठिकाणी राहतात यामुळे तलाठी मंडळ अधिकारी असुन नसल्याचे गत आहे. अनेक तलाठी वाळू घाटात १० वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांची बदली झाली नाही. मागे पाणी टंचाई निर्माण झाली होती यांवर उपाययोजना तहसीलदार यांच्या कडुन केल्या गेलेल्या नव्हत्या. सर्व मंठा तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे होत आहे. तसेच शेगाव ते पंढरपूर महामार्गाच्या कामामध्ये करोडाचा मुरुम मेघा इंजिनिअरिंग कंपनी हैदराबाद यांच्या कडुन चोरी केला गेला यास जबाबदार मंठा तहसीलदार यांनी कारवाई केली नाही. विशेष म्हणजे शासनाच्या परिपञका प्रमाणे गायरान जमिनीवर उत्खनन मुरुम बेकायदेशीर आहे, माञ मेघा इंजिनिअरिंग कंपनी हैदराबाद यांच्या कडुन उत्खनन केले गेले परंतु तहसीलदार यांनी अप्रत्यक्षपणे सहकार्य करुन मेघा इंजिनिअरिंग कंपनी ला सहकार्य करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. तलाठी मंडळ अधिकारी यांच्या वर तहसीलदार यांचा अंकुश नसल्याने तलाठी मनमर्जी कारभार करित आहे. याचा परिणाम मंठा तालुक्यातील नागरिकांना भोगावा लागत आहे. यामुळे  साहेब आपण या विषयांचे गांभिर्याने दखल घ्यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या तहसीलदार मंठा यांच्या विरुद्ध कारवाई करुन त्यांना तातडीने निलंबित करुन‌.मंठा तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून तसेच साहेब जशी आपली प्रतिमा स्वच्छ आहे तसाच आपला महसूल विभाग देखील स्वच्छ करावा आशा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यावर कारवाई करून. १० वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या मंठा तालुक्यातील मंडळा आधिकारी व तलाठी यांच्या जालना जिल्ह्यात इतर ठिकाणी बदल्या कराव्यात यामुळे काळ्या धंदेवाल्यांना आळा बसेल. म्हणून बदली करून कारवाई  करावी अशी मागणी
प्रकाश सोळंके महाराष्ट्र नवनिर्माण सेना,जिल्हाध्यक्ष जालना यांनी. महुसलमंत्री यांना निवेदना मार्फत केली आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...